बुध्दगया मंदिर कायदा बिहार सरकारने रद्द करुन महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे
नवीदिल्ली: बुध्दगया मंदिर कायदा 1949 बिहार सरकारने रद्द करुन महाबोधी महाविहार संपूर्णपणे बौध्दांच्या ताब्यात द्यावे असा ठराव रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणी बैठकीत मंजुर करण्यात आला अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी आज दिली.
महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा आहे.महाबोधी महाविहार बौध्दांच्या ताब्यात मिळविण्याचा ना.रामदास आठवले यांनी निर्धार केला असुन त्यासाठी दि.28 मार्च पासुन 3 दिवस ना.रामदास आठवले बुध्दगयेत ठाण मांडणार आहेत.बुध्दगया मंदिर कायदा रद्द करण्यासाठी निर्धाराने प्रयत्न करणार असल्याबद्दल ना.आठवले यांच्या पाठिशी संपूर्ण देशभरातील रिपब्लिकन पक्ष खंबीरपणे उभा असल्याचे सांगत त्यांच्या बुध्दगया दौऱ्याला यश लाभो अशा शुभेच्छा रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत ना.रामदास आठवले यांना देण्यात आल्या.
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेत नवी दिल्ली येथे झालेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत देशभरातील रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख नेते आणि राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
देशभरात येत्या वर्षभरात रिपब्लिकन पक्षाचे एक कोटी सदस्य जोडावेत आणि रिपब्लिकन पक्षाच्या तालुका; जिल्हा ;राज्य सर्व कार्यकारणी मध्ये दलित आदिवासी सोबत,ओबीसी,अल्पसंख्याक आणि सवर्णं जातसमुहांच्या कार्यकर्त्यांचा समावेश करावा. रिपब्लिकन पक्ष हा सर्व जातीधर्मीयांचा पक्ष आहे असा संदेश समाजात पोहोचवण्यासाठी सर्व जातीधर्मांना रिपब्लिकन पक्षाशी जोडण्याचे निर्देश ना.रामदास आठवले यांनी या बैठकीत दिले.
दलित आदिवासी आणि ओबीसीना खाजगी क्षेत्रात शिक्षण आणि नोकरीत आरक्षण लागू करावेत असा महत्वाचा ठराव या बैठकीत मंजुर करण्यात आला अशी माहिती ना.रामदास आठवले यांनी दिली आहे.
अहिल्यानगर: शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरात विक्रीस असलेल्या चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर…
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…
दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…
ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…
मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे.…
मुंबई : राज्यातील जमिनीच्या आणि मालमत्तेच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता, सुरक्षितता आणि मालकी हक्क अधिक बळकट करण्यासाठी…