महाराष्ट्र

अखेरचा श्वास सोबत घेतला, मैत्रीचा धागा तुटला; नाशिकात एकाचवेळी निघाली २ मित्रांची अंत्ययात्रा

त्र्यंबकेश्वर: त्र्यंबकेश्वरकडून नाशिक शहराच्या दिशेने मंगळवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास परतीचा प्रवास करताना कारवरील ताबा सुटल्याने कार (एमएच १२ एलजे १४१६) अंजनेरीजवळच्या बेझे फाट्यावर त्र्यंबकरोडवरील दुभाजकावर जाऊन आदळली.

पंकज दिलीप दातीर (वय ३०), अभिषेक ज्ञानेश्वर घुले (वय २८, दोघे रा. अंबड) या दोघा मित्रांचा या अपघातात मृत्यू झाला. या घटनेने अंबड गावात शोककळा पसरली आहे.

त्र्यंबकेश्वरला पंकज आणि अभिषेक हे कारने मंगळवारी सकाळी गेले होते. रात्री ते परतीचा प्रवास करत असताना अचानकपणे कारच्या चालकाचा ताबा सुटला. यामुळे कार दुभाजकावर आदळून कोलांटउड्या खात उलटली. त्यात गाडीचा चक्काचूर झाला आहे. अपघात झाल्याचे समजताच गावकऱ्यांनी फाट्यावर धाव घेत पोलिसांना कळवले. त्र्यंबकेश्वरचे पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, हवालदार रुपेश मुळाणे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांच्या मदतीने दोघा जखमींना मोटारीतून बाहेर काढून रुग्णालयात हलवले. मात्र तिथे वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले.

अखेरचा श्वास सोबत घेतला…

पंकज दातीर हे एका खासगी कंपनीत नोकरीला होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, बहीण आणि सहा वर्षाचा मुलगा असा परिवार आहे. तर अभिषेक घुले हा अविवाहित होता. त्याच्या पश्चात आई वडील, भाऊ-बहीण असा परिवार आहे. दोन्ही कुटुंबातील तरुण मुले गेल्याने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पंकज आणि अभिषेक हे दोघेही जीवलग मित्र होते. दोघांनी सोबतच अखेरचा श्वास घेतला. अंबड गावातील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, पंकज आणि अभिषेक हे दोघे पहिलीपासून एकाच वर्गात होते. त्यांची ही मैत्री बालपणापासून घट्ट होती. दोघे कायम सोबत असायचे. त्यांचा परिसरात चांगला संपर्कही होता. त्यामुळे दोघांच्या निधनाची बातमी कळताच त्यांच्या अंत्ययात्रेला मोठी गर्दी लोटली होती.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

2 तास ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

2 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

2 तास ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

3 तास ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

4 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

4 तास ago