महाराष्ट्र

अखेरचा श्वास सोबत घेतला, मैत्रीचा धागा तुटला; नाशिकात एकाचवेळी निघाली २ मित्रांची अंत्ययात्रा

त्र्यंबकेश्वर: त्र्यंबकेश्वरकडून नाशिक शहराच्या दिशेने मंगळवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास परतीचा प्रवास करताना कारवरील ताबा सुटल्याने कार (एमएच १२ एलजे १४१६) अंजनेरीजवळच्या बेझे फाट्यावर त्र्यंबकरोडवरील दुभाजकावर जाऊन आदळली.

पंकज दिलीप दातीर (वय ३०), अभिषेक ज्ञानेश्वर घुले (वय २८, दोघे रा. अंबड) या दोघा मित्रांचा या अपघातात मृत्यू झाला. या घटनेने अंबड गावात शोककळा पसरली आहे.

त्र्यंबकेश्वरला पंकज आणि अभिषेक हे कारने मंगळवारी सकाळी गेले होते. रात्री ते परतीचा प्रवास करत असताना अचानकपणे कारच्या चालकाचा ताबा सुटला. यामुळे कार दुभाजकावर आदळून कोलांटउड्या खात उलटली. त्यात गाडीचा चक्काचूर झाला आहे. अपघात झाल्याचे समजताच गावकऱ्यांनी फाट्यावर धाव घेत पोलिसांना कळवले. त्र्यंबकेश्वरचे पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, हवालदार रुपेश मुळाणे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांच्या मदतीने दोघा जखमींना मोटारीतून बाहेर काढून रुग्णालयात हलवले. मात्र तिथे वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले.

अखेरचा श्वास सोबत घेतला…

पंकज दातीर हे एका खासगी कंपनीत नोकरीला होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, बहीण आणि सहा वर्षाचा मुलगा असा परिवार आहे. तर अभिषेक घुले हा अविवाहित होता. त्याच्या पश्चात आई वडील, भाऊ-बहीण असा परिवार आहे. दोन्ही कुटुंबातील तरुण मुले गेल्याने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पंकज आणि अभिषेक हे दोघेही जीवलग मित्र होते. दोघांनी सोबतच अखेरचा श्वास घेतला. अंबड गावातील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, पंकज आणि अभिषेक हे दोघे पहिलीपासून एकाच वर्गात होते. त्यांची ही मैत्री बालपणापासून घट्ट होती. दोघे कायम सोबत असायचे. त्यांचा परिसरात चांगला संपर्कही होता. त्यामुळे दोघांच्या निधनाची बातमी कळताच त्यांच्या अंत्ययात्रेला मोठी गर्दी लोटली होती.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दिड महिन्यात दुसऱ्यांदा गोळीबार; पोलिसांचा धाक संपलाय का…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील करडे परिसरात अवघ्या दिड महिन्याच्या कालावधीत गोळीबाराच्या दोन…

14 मिनिटे ago

घरातून रुसून निघालेल्या अल्पवयीन मुलाचा दौंड रेल्वे स्थानकावर सुखरूप शोध; समन्वयातून मोठी दुर्घटना टळली

दौंड: घरातून रुसून आंध्र प्रदेशातील रेणुगुंठा रेल्वे स्थानकावरून मदुराई–मुंबई एक्स्प्रेसमध्ये बसून निघालेल्या पवन भाटी या…

2 तास ago

शिरूर! करडे गावात मध्यरात्री पिस्तुलातून तीन राऊंड फायर; गुन्हा दाखल; पाहा नावे…

सराईत गुन्हेगारांचा गावात सशस्त्र धुडगूस; प्रतिबंधक कारवाया कागदावरच राहिल्या का...? शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह…

8 तास ago

शिरुर तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे; करड्यात आठ जणांकडून तरुणावर गोळीबार

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत असतानाच करडे गावात घडलेल्या गोळीबाराच्या…

16 तास ago

दिवंगत अजितदादा पवारांना अभिवादन; विधानमंडळाची स्मृतीपत्रे सुनेत्रा अजित पवार यांच्या स्वाधीन.

बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…

1 दिवस ago

२०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य; ‘देवगिरी ते देवराई’ अभियानाचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…

1 दिवस ago