त्रिमंदिरातून विश्वशांतीचा संदेश; ठाण्यात धार्मिक एकतेचा नवा अध्याय सुरू
ठाणे: धर्माच्या विविध वाटा अखेरीस मानवतेच्या, अहिंसेच्या आणि शांततेच्या एकाच ध्येयाकडे नेतात, असा संदेश देणाऱ्या ठाण्यातील भव्य त्रिमंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याने शहरात धार्मिक एकतेचा आणि आध्यात्मिक जागृतीचा नवा अध्याय सुरू केला आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
ठाणे महावीर जैन ट्रस्टच्या वतीने उभारण्यात आलेल्या या त्रिमंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास 1 फेब्रुवारी 2026 रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी मंदिरात दर्शन घेत भाविकांशी संवाद साधला आणि या पवित्र उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.
मंत्रोच्चार, विधी-विधान आणि भक्तिमय वातावरणात हा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. या वेळी जैन समाजातील सदस्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक तसेच देश-विदेशातून आलेले भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “हे केवळ मंदिर नसून संपूर्ण विश्वासाठी आध्यात्मिक एकतेचे प्रतीक आहे. अहिंसा, सत्य, आत्मशुद्धी आणि मोक्षप्राप्ती ही सर्व धर्मांची समान मूल्ये या त्रिमंदिरातून अधोरेखित होतात.”
त्रिमंदिरात एकाच छताखाली सीमंधर स्वामीजी, योगेश्वर श्रीकृष्ण भगवान आणि भगवान शिवलिंग यांचे दर्शन घडते. या अनोख्या संकल्पनेमुळे कोणताही भाविक येथे आला तरी ‘हे माझेच मंदिर आहे’ अशी भावना त्याच्या मनात निर्माण होते, असे शिंदे यांनी नमूद केले.
या मंदिरामुळे ठाण्याची ओळख केवळ औद्योगिक किंवा सांस्कृतिक शहर म्हणून नव्हे, तर धार्मिक व आध्यात्मिक केंद्र म्हणून अधिक दृढ झाली आहे. “हा सोहळा ठाण्यासह महाराष्ट्र आणि देशासाठी अभिमानाचा क्षण आहे,” असेही त्यांनी सांगितले.
दादा भगवान यांच्या प्रेरणेतून आणि दादा भगवान फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आलेल्या या त्रिमंदिराचा उद्देश विज्ञानाच्या माध्यमातून शांती, एकता आणि शाश्वत आनंदाचा प्रसार करणे हा आहे.
या प्रकल्पासाठी दीपकभाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या अथक परिश्रमांचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विशेष कौतुक केले. भाविकांच्या सोयीसुविधांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा, स्वच्छता आणि परिसर विकासासाठी शासन कटिबद्ध राहील, असे आश्वासनही त्यांनी दिले.
कार्यक्रमाच्या शेवटी मंदिर उभारणीत योगदान देणाऱ्या सर्व सेवक, स्वयंसेवक आणि भाविकांचे आभार मानण्यात आले. ठाण्यातून विश्वशांती, धार्मिक एकता आणि मानवतेचा संदेश दूरवर पोहोचल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील करंदी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीदरम्यान झालेल्या अपघातात प्रकाश…
१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…
मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा…
मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार…
ठाणे: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात भारतातही पंतप्रधान Narendra Modi यांच्यावर…
मुंबई: राज्यात वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांबाबत करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या…