महाराष्ट्र

वाल्मिक कराडने आतापर्यंत २५ खून केले, एका १४ वर्षांच्या मुलालाही संपवल

बीड: संतोष देशमुख खून प्रकरणातला मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा किती निर्दयी खुनी होता, हे आता पुढे येत आहे. एका माजी पोलिस अधिकाऱ्याने आणखी एक दावा केला असून वाल्मिकने आतापर्यंत २५ तरी खून केले असतील आणि त्यात एका १४ वर्षांच्या मुलाचा समावेश आहे, असं ते म्हणाले आहेत.

सेवेतून बडतर्फ केलेले पोलिस उपनिरीक्षक रणजित कासले यांनी हा नवा दावा केला आहे. ते म्हणाले की, वाल्मिक कराडने कमीत कमी २५ तरी मर्डर केले असतील. एका १४ वर्षांच्या मुलाचाही खून त्याने केला. त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत.

कासले पुढे म्हणाले, वाल्मिकने काही लोकांना बॉयलरमध्ये टाकून संपवलं, काहींचे तुकडे करुन नदीमध्ये फेकून दिलं.. तो अतिशय विकृत माणूस आहे. आजही त्याचा मुलगा श्री कराड मला फोन करुन त्रास देतोय. १४ वर्षांच्या मुलाला मारल्याचे पुरावे मी लवकरच देणार आहे, असं कासले म्हणाले.

दरम्यान, वाल्मिक कराडने केलेले खून आणि एकूणच परळीमध्ये झालेले खून; या सगळ्या प्रकरणांसाठी एकत्रित एसआयटी स्थापन करावी, अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांची आहे. ते मुख्यमंत्र्यांकडे याबाबत निवेदन देणार आहेत. परळीतली दहशत आता संपत आलेली असली तरी यापूर्वी जे खून झालेले आहेत, त्यांचा ससेमीरा धनंजय मुंडे आणि त्यांच्या जवळच्या लोकांमागे लागणार आहे. दुसरीकडे महादेव मुंडे खून प्रकरणात स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीमध्ये ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या मागणीनुसार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी तातडीने तसे आदेश दिले होते.

एसआयटीमध्ये कोण?

पूर्वी बीडमध्ये डीवायएसपी म्हणून असलेले आणि सध्या अमरावतीचे अपर पोलिस अधीक्षक असलेले पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये पोलिस निरीक्षक संतोष साबळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सपकाळ यांचा समावेश करण्यात आला आहे. कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन केल्याने या प्रकरणाचा तपास वेगाने होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे बाहेरचे गुंड आणून दहशत करत फोडले जेसीबी मशिन

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…

11 तास ago

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत ॲग्रीबिझनेस अभ्यासक्रम सुरु; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…

17 तास ago

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता

मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…

17 तास ago

शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…

17 तास ago

शिरूर शहरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…

18 तास ago

एसटीचा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…

2 दिवस ago