महाराष्ट्र

आता कोल्हापुरात उच्च न्यायालयाचं खंडपीठ, दीर्घ लढ्याला मोठं यश

कोल्हापूर: मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाचे नोटिफिकेशन जारी करण्यात आलं असून येत्या 18 ऑगस्टपासून खंडपीठाचं काम सुरू होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्तींकडून 1 ऑगस्ट रोजी याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. यामुळे कोल्हापूर, सांगलीसह सहा जिल्ह्यांच्या 40 वर्षांच्या लढ्याला यश मिळालं आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशांनीही त्याची माहिती सर्वप्रथम माजी खासदार संभाजीराजेंना दिल्याचंही समोर आलं.

कोल्हापूरमध्ये उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे ही मागणी अनेक वर्षांपासून मागणी होती. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांना त्याचा फायदा होणार होता. परंतु याचा निर्णय होत नव्हता. त्यासाठी अनेक आंदोलनं करण्यात आली. आता या लढ्याला मोठं यश मिळालं आहे.

संभाजीराजेंची पोस्ट

दरम्यान, दिल्ली ते नागपूर असा प्रवास करताना भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई हे विमानात शेजारी होते. त्यावेळी सरन्यायाधीशांनी आपल्याला ही आनंदाची बातमी दिली. सरन्यायाधीश म्हणाले ‘की, राजे, पहिली आनंदाची बातमी तुम्हालाच देतो, कोल्हापूरचे खंडपीठ… सर्किट बेंच आजच नोटिफाय झालेले आहे’ असं संभाजीराजेंनी म्हटलं आहे.

कोल्हापूर व पश्चिम महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी; अनेक वर्षांच्या लढ्याला यश…

आज दिल्ली येथून नागपूरला हवाई प्रवास करत असताना योगायोगाने भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे व माझे विमानातील आसन लगतच होते. यावेळी भेट होताच माननीय सरन्यायाधीश महोदय अत्यंत आनंदाने मला म्हणाले की न्यायालयीन प्रक्रियेमध्ये होणारा विलंब टाळण्यासाठी कोल्हापुरातील खंडपीठ महत्त्वाचं आहे. त्यामुळे सहा जिल्ह्यांतील नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे. वेळेसोबत पैशाचीही बचत त्यामुळे होणार आहे. कोल्हापुरातील खंडपीठाचे नोटिफिकेशन जाहीर झाल्यानंतर त्याचे सर्व स्तरातून स्वागत केलं जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अल्पवयीन मुलांना ऑनलाइन जाळ्यात ओढून ब्लॅकमेलिंग; नीलम गोऱ्हेंचे राज्यपालांना निवेदन

मुंबई: राज्यातील अल्पवयीन मुला-मुलींना ऑनलाईन गेमिंग, सोशल मीडिया आणि चॅटिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जाळ्यात ओढून ब्लॅकमेलिंग, लैंगिक…

3 तास ago

वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल; जातनिहाय जनगणना, ओबीसी आरक्षण आणि कुंभमेळ्याच्या खर्चावरून निशाणा

मुंबई: काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जातनिहाय जनगणना, ओबीसी आरक्षण, मनोहर भिडे यांच्या वक्तव्यांसह…

3 तास ago

आरोग्यसेवा हीच ईश्वरसेवा; महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकापर्यंत दर्जेदार उपचार पोहोचवणार; एकनाथ शिंदे

मुंबई: “हे सरकार केवळ आदेश देणारे नाही, तर जनतेच्या दारात जाऊन प्रश्न सोडवणारे सरकार आहे.…

3 तास ago

शिंदेसेनेला भाजपाची धास्ती? राऊतांचा फडणवीसांना इशारा; मुंडेंच्या काँग्रेस प्रवेशाचा गौप्यस्फोट ते सपकाळांची टीका

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सत्ताधारी महायुतीतील अंतर्गत मतभेदांपासून विरोधकांच्या सरकारवरील टीकेपर्यंत विविध मुद्द्यांवरून राजकीय…

3 तास ago

महाराष्ट्रातील 10 प्रमुख MIDC; पुणे ठरतेय औद्योगिक केंद्र, उद्योजकांच्या स्थलांतराने राजकारण तापले

मुंबई : महाराष्ट्रातील औद्योगिक विकासाचा विचार केला तर पुणे जिल्ह्याचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. पुण्याला…

3 तास ago

उरळगावात दोन शेतकऱ्यांच्या बोअरमधील मोटारींसह केबलची चोरी; १७ हजारांचा मुद्देमाल लंपास

न्हावरे (अक्षय टेमगिरे): उरळगाव (ता. शिरुर) येथील गट क्रं १६५ मधील दोन बोअरवेलमधून अज्ञात चोरट्याने…

3 तास ago