परळी : परळी येथे पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाच्या कोनशिला समारंभ आणि भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. यावेळी पशुसंवर्धन तसेच पर्यावरण व वातावरण बदल मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री धनंजय मुंडे, आमदार नमिता मुंदडा आणि माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्याबाबत बोलताना सूचक आणि महत्त्वाचे विधान केले. “मथुरेवर सतत अतिक्रमण केल्यामुळे कृष्णाला द्वारका उभी करावी लागली. आपसातल्या संघर्षामुळे विकासाचा खून होतो. मी मंचावरून सांगते की, आमचा संघर्ष नाही,” असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.
‘संघर्षाची शिकवण मुंडे साहेबांनी दिली’
पंकजा मुंडे म्हणाल्या, “मुंडे साहेबांनी आम्हाला संघर्षाची शिकवण दिली. मला अजितदादांच्या शोकसभेत विधानसभेत बोलायचे होते. इथे देवा भाऊंच्या लाडक्या बहिणीदेखील आल्या आहेत. आता मुख्यमंत्री लोकार्पण सोहळ्यासाठी येणार आहेत. आपल्याला काम लवकर करायचे आहे. हा शासनाचा पैसा आहे, तो व्यवस्थित वापरला गेला पाहिजे. येथील विद्यार्थ्यांनी ‘मी शिकलो’ असे अभिमानाने सांगितले पाहिजे.”
यावेळी त्यांनी ग्रामीण उद्योजकांसाठी सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाचाही उल्लेख केला. “मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे. ग्रामीण उद्योजकांसाठी आता ५० टक्के सबसिडी मिळणार आहे,” असे त्या म्हणाल्या.
‘सुनेत्रा वहिनींसोबत अजितदादांचा आशीर्वादही आला’
सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीचा उल्लेख करताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “आज इथे सुनेत्रा वहिनीच नाही आल्या, तर अजितदादांचा आशीर्वाददेखील इथे आला आहे. राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या मराठवाड्याच्या आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे.”
“कधी काळी एकमेकांच्या विरोधात असलेली दोन कुटुंबे युतीमुळे एकत्र आली. आम्ही एकमेकांच्या विरोधात प्रचार केला. मात्र दादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आम्ही अनेकदा सोबत प्रवास केला आणि बऱ्याच गप्पाही मारल्या,” असेही पंकजा मुंडे यांनी सांगितले.
दरम्यान, “मुंडे साहेबांनी शून्यातून विश्व निर्माण केले आहे,” असे म्हणत पंकजा मुंडे यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या कार्याचा गौरव केला. परळीतील या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुंडे कुटुंबातील संबंध, महायुतीतील राजकीय समीकरणे आणि विकासाच्या मुद्द्यावर पंकजा मुंडे यांनी केलेल्या विधानांची चर्चा सुरू झाली आहे.
बीड : केज तालुक्यातील टाकळी येथील हॉटेल चालक विलास घुले यांच्या हत्या प्रकरणात खासदार बजरंग…
नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करून देशाला संबोधित केले.…
पुणे: पुणे जिल्ह्यातील चाकण आणि लगतच्या परिसरातील वाढते औद्योगिकीकरण तसेच पायाभूत सुविधांवरील वाढता ताण लक्षात…
सांगली : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सांगली शहरात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने ‘हिंदवी स्वातंत्र्य दिन’ पदयात्रेचे…
आयुर्वेदानुसार विसर्ग काळात म्हणजे सुर्याचे दक्षिणायन सुरु झाल्यावर म्हणजेच पावसाळ्यात शरीरात वात दोष शरीरात बळावतो…
अनेकदा किचनमध्ये काम करत असताना, स्वयंपाक करत असताना गरम भांड्यांना हात लावल्यावर किंवा चपात्या भाजताना…