सांगली : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सांगली शहरात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने ‘हिंदवी स्वातंत्र्य दिन’ पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. संभाजी भिडे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या पदयात्रेत मोठ्या संख्येने धारकरी सहभागी झाले होते. मात्र, पदयात्रेत ‘हिंदुस्थानचा ध्वज भगवा’ असा संदेश असलेले पोस्टर्स आणि भगवे ध्वज दिसून आल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
पदयात्रेत सहभागी धारकऱ्यांच्या हातात भगवे ध्वज तसेच भारतमाता, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमा होत्या. काही जणांकडे बाळासाहेब ठाकरे यांचे फोटोही दिसून आले. त्यामुळे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी राष्ट्रध्वजाच्या मुद्द्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
अखंड हिंदुस्थानच्या संकल्पनेचा प्रचार
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माहितीनुसार, अखंड भारताच्या संकल्पनेचा प्रचार आणि स्वातंत्र्यानंतरही अखंड हिंदुस्थानचे स्वप्न पुढे नेण्याचा संदेश देण्यासाठी ही पदयात्रा काढण्यात आली. दरम्यान, पदयात्रेशी संबंधित एक पोस्टर सोशल मीडियावर चर्चेत आले असून त्यातील मजकुरामुळे भगवा ध्वज आणि राष्ट्रध्वजाच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला आहे.
काँग्रेसकडून भिडेंवर टीका
या पदयात्रेवरून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी संभाजी भिडे यांच्यावर निशाणा साधला. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी राष्ट्रध्वजाचा अवमान होत असल्याचा आरोप त्यांनी केला. वंदे मातरमच्या कथित अवमानाबाबत कारवाईची भूमिका घेतली जाते, मग राष्ट्रध्वजाच्या कथित अवमानाबाबत वेगळी भूमिका का, असा सवाल सावंत यांनी उपस्थित केला.
भाजपची भूमिका स्पष्ट
दरम्यान, भाजप नेते आणि मंत्री जयकुमार गोरे यांनी या वादावर भूमिका स्पष्ट केली. कोण काय म्हणते याला महत्त्व नसून तिरंगाच भारताचा राष्ट्रध्वज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. भगवा हा हिंदू समाजाचा स्वाभिमान असल्याचे सांगतानाच देशाचा अधिकृत राष्ट्रध्वज तिरंगाच असल्याचे गोरे यांनी नमूद केले.सांगलीतील या पदयात्रेनंतर भगवा ध्वज, राष्ट्रध्वज आणि अखंड हिंदुस्थानच्या संकल्पनेवरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
मुंबई: माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला…
बीड : केज तालुक्यातील टाकळी येथील हॉटेल चालक विलास घुले यांच्या हत्या प्रकरणात खासदार बजरंग…
नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करून देशाला संबोधित केले.…
पुणे: पुणे जिल्ह्यातील चाकण आणि लगतच्या परिसरातील वाढते औद्योगिकीकरण तसेच पायाभूत सुविधांवरील वाढता ताण लक्षात…
परळी : परळी येथे पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाच्या कोनशिला समारंभ आणि भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात…
आयुर्वेदानुसार विसर्ग काळात म्हणजे सुर्याचे दक्षिणायन सुरु झाल्यावर म्हणजेच पावसाळ्यात शरीरात वात दोष शरीरात बळावतो…