महाराष्ट्र

सीमा भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीसाठी शासन प्रशिक्षण केंद्र उभारणार का

मुंबई: महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक व उच्च शिक्षण परीक्षांची तयारी करण्यासाठी शासन सीमा भागात प्रशिक्षण केंद्र निर्माण करणार का? असा सवाल भाजपा विधानपरिषद गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी सभागृहात उपस्थित केला.

सभागृहात सदस्य निरंजन डावखरे यांनी सीमा भागाबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी या चर्चेत सहभाग घेत आ. दरेकर म्हणाले कि, महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील विद्यार्थ्याना तलाठी भरतीत शासनाने संधी उपलब्ध करून दिलीय त्याप्रमाणे इतर पदांच्या भरतीबाबत शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील विद्यार्थ्यांना संधी प्रदान करणार का? महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण व स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारी करण्यासाठी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागात प्रशिक्षण केंद्र तसेच कौशल्य विकास केंद्र निर्माण करण्याबाबत शासन कार्यवाही करणार का? मविआ सरकारने महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागाची गरज लक्षात घेऊन मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाकडून नवीन सरकारी महाविद्यालये स्थापन करण्याची घोषणा केली होती.

तत्कालीन कुलगुरू यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. मात्र पुढे काही झाले नाही. महायुतीचे सरकार महाविद्यालय उघडण्याबाबत तातडीने पावले उचलणार का? असे तीन प्रश्न दरेकर यांनी उपस्थित केले. यावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हो असे सकारात्मक उत्तर दिले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मेळघाटातील कुपोषणाचे भीषण वास्तव; वर्षभरात ९२ बालकांचा मृत्यू

अमरावती: राज्यातील प्रगत विकासाच्या दाव्यांना छेद देणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट…

58 मिनिटे ago

तुम्हीही रात्री मोबाईल उशीखाली घेऊन झोपता त्याचे होऊ शकतात गंभीर परिणाम

फोन आजकाल लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. फोन नसेल तर अनेकांची कामे रखडतात. सकाळी…

1 तास ago

अंगात कॅल्शियम कमी, हाडं कमजोर आहेत हे ५ पदार्थ खा, कॅल्शियम कधीच कमी पडणार

दूध एक कप्लीट फूड आहे ज्यात वेगवेगळ्या प्रकारचे न्युट्रिएंट्स असतात म्हणून आई-वडील लहानपणा पासूनच दूध…

1 तास ago

जांबुत ग्रामपंचायतीत सरपंचाविरोधात अविश्वास ठरावाची मागणी; आठ सदस्यांचा तहसीलदारांकडे अर्ज

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील जांबुत ग्रामपंचायतीचे सरपंच दत्तात्रय रामचंद्र जोरी यांच्याविरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास…

2 तास ago

शिक्रापूर-मलठण रस्त्याचे काम फक्त कागदावरच सुरू आहे काय?

संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com शिरूर : शिक्रापूर ते मलठण रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू होऊन दोन महिने…

4 तास ago

अतिरिक्त आयुक्तांना ई-मेलद्वारे इशारा; ‘खड्डेमुक्ती’च्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा?

मुंबई: 27 एप्रिल २०२६, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांना ‘खड्डेमुक्ती’ अभियानातील गंभीर अनियमितता…

20 तास ago