महाराष्ट्र

सीमा भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीसाठी शासन प्रशिक्षण केंद्र उभारणार का

मुंबई: महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक व उच्च शिक्षण परीक्षांची तयारी करण्यासाठी शासन सीमा भागात प्रशिक्षण केंद्र निर्माण करणार का? असा सवाल भाजपा विधानपरिषद गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी सभागृहात उपस्थित केला.

सभागृहात सदस्य निरंजन डावखरे यांनी सीमा भागाबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी या चर्चेत सहभाग घेत आ. दरेकर म्हणाले कि, महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील विद्यार्थ्याना तलाठी भरतीत शासनाने संधी उपलब्ध करून दिलीय त्याप्रमाणे इतर पदांच्या भरतीबाबत शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील विद्यार्थ्यांना संधी प्रदान करणार का? महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण व स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारी करण्यासाठी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागात प्रशिक्षण केंद्र तसेच कौशल्य विकास केंद्र निर्माण करण्याबाबत शासन कार्यवाही करणार का? मविआ सरकारने महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागाची गरज लक्षात घेऊन मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाकडून नवीन सरकारी महाविद्यालये स्थापन करण्याची घोषणा केली होती.

तत्कालीन कुलगुरू यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. मात्र पुढे काही झाले नाही. महायुतीचे सरकार महाविद्यालय उघडण्याबाबत तातडीने पावले उचलणार का? असे तीन प्रश्न दरेकर यांनी उपस्थित केले. यावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हो असे सकारात्मक उत्तर दिले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यात सामाईक इलेक्ट्रिक मोटारच्या वादातून सख्ख्या भावाकडून मारहाण

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील गुनाट गावात सामाईक वापरातील इलेक्ट्रिक मोटारच्या वादातून सख्ख्या…

2 मिनिटे ago

शिरुर तालुक्यातील भीषण अपघातात पत्नीच्या मृत्यू प्रकरणी; पतीवर गुन्हा दाखल

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील न्हावरे-निर्वी अष्टविनायक महामार्गावर झालेल्या भीषण कार अपघातात एका महिलेचा मृत्यू…

37 मिनिटे ago

भाजलेल्या हरभऱ्याचे फायदे

चणे हा प्रथिनांचा समृद्ध स्रोत आहे. रोज भाजलेले हरभऱ्याचे सेवन केल्यास शरीराला अनेक आरोग्य समस्यांपासून…

4 तास ago

जेवण केल्यावर लगेच टॉयलेटला जावं लागतं का? वाचा ‘हे’ नॉर्मल की एखाद्या आजाराचा संकेत

सकाळी टॉयलेटला जाऊन पोट साफ करणं ही एक नॅचरल प्रोसेस आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी ही…

6 तास ago

पावसाळ्यात मुंबईत शून्य जिवितहानीचे उद्दिष्ट; यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: पावसाळ्यात मुंबई आणि महानगर परिसरात शून्य जिवितहानी हे उद्दिष्ट ठेवून सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम…

6 तास ago

विद्याधाम विद्यालयात प्रवेशोत्सवाचा उत्साहपूर्ण जल्लोष

शिक्षण सहसंचालक हरून आतार यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन पाबळ (सुनिल जिते): नवशैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी कान्हूर मेसाई…

7 तास ago