महाराष्ट्र

महिला सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; महिला आयोगाच्या कार्यक्षमतेवर टीका तीव्र

मुंबई: राज्यात महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांमुळे महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विविध घटनांच्या पार्श्वभूमीवर आयोग अधिक सक्षम व संवेदनशील पद्धतीने काम करण्याची गरज व्यक्त होत आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगाव पान परिसरात सहावीत शिकणाऱ्या ११ वर्षीय विद्यार्थिनीवर अज्ञात व्यक्तीने ॲसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. आरोपी अद्याप फरार असल्याने पोलिसांच्या तपासावरही प्रश्न उपस्थित होत आहेत.

दरम्यान, नाशिकमध्ये तथाकथित ‘कॅप्टन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीवर महिलांना फसवून लैंगिक शोषण केल्याचा आरोप समोर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून संबंधिताला अटक केली असून, तपासादरम्यान काही आक्षेपार्ह पुरावेही जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणामुळे महिलांच्या सुरक्षिततेबाबत आणखी चिंता व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या भूमिकेबाबत चर्चा सुरू झाली आहे. आयोगाने तक्रारींचे तत्काळ व प्रभावी निराकरण करणे, तसेच महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये सक्रिय हस्तक्षेप करणे आवश्यक असल्याची मागणी विविध स्तरांतून होत आहे.काही राजकीय नेत्यांनी आयोगाच्या अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर टीका केली असून, या पदावर पूर्णवेळ व निष्पक्ष व्यक्तीची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. तर आयोगाच्या वतीने मात्र प्राप्त तक्रारींवर कारवाई केल्याचा दावा करण्यात आला आहे.

तज्ज्ञांच्या मते, महिलांच्या सुरक्षेसाठी केवळ योजनांची घोषणा न करता, प्रत्यक्ष अंमलबजावणी, पोलीस यंत्रणेची तत्परता आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना यांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. ॲसिड विक्रीवर नियंत्रण, सीसीटीव्ही यंत्रणा, तसेच जनजागृती यांसारख्या उपायांची अंमलबजावणी प्रभावीपणे होणे आवश्यक आहे.राज्यात महिलांना सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी महिला आयोगासह सर्व संबंधित यंत्रणांनी अधिक जबाबदारीने काम करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ठाणे अंतर्गत मेट्रोबाबतचे गैरसमज दूर करा; नागरिकांशी संवाद साधा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महारेलला जनजागृती, चर्चासत्रे आणि तीन आठवड्यांत पर्यायी मार्गाचा अभ्यास करण्याचे निर्देश ठाणे : ठाणे अंतर्गत…

6 तास ago

म्हाडाचे घर देण्याच्या आमिषाने निवृत्त बँक अधिकाऱ्याची 29 लाखांची फसवणूक; शिवाजी पार्क पोलिसांत गुन्हा

सहा वर्षे आश्वासनांची मालिका, 'स्टॉप पेमेंट' धनादेशांचा धक्का; तिघांविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे व संगनमताचे गंभीर…

9 तास ago

आज ना उद्या माझा पुतण्या भारताचा पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांबद्दल काकांचा मोठा दावा

'देवाभाऊ' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बाळासाहेब फडणवीस यांचे वक्तव्य; चंद्रकांत पाटील यांच्याकडूनही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचे कौतुक पुणे…

9 तास ago

एफडीएची राज्यभर धडक मोहीम! 88 कारवाया, 9.50 कोटींचा बनावट औषधसाठा जप्त; 10 आरोपी गजाआड

मुंबई: अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) जून-जुलै 2026 या कालावधीत राज्यभर बनावट औषधे, विनापरवाना उत्पादन-विक्री,…

9 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी काँग्रेसची ‘मंडल यात्रा’; सरकारला वडेट्टीवारांचा इशारा

नागपूर: भंडारा येथून सुरू झालेल्या विदर्भातील ११ जिल्ह्यांच्या 'मंडल यात्रा'च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय…

9 तास ago

‘इथेनॉल घोटाळ्याप्रकरणी नितीन गडकरींचा राजीनामा घ्या; मोदींनी देशाची माफी मागावी’; हर्षवर्धन सपकाळ

ई-२० धोरण घाईत राबवले; वाहनधारकांचे नुकसान झाल्याचा काँग्रेसचा आरोप, फडणवीसांच्या दिल्लीवारीवरही निशाणा मुंबई: पेट्रोलमध्ये इथेनॉल…

9 तास ago