महाराष्ट्र

खडकवासला धरण परिसरात सतर्क सुरक्षारक्षकामुळे युवती सुरक्षित घरी

पुणे: खडकवासला धरण परिसरात रात्री नऊच्या सुमारास १५ ते १६ वर्षांच्या एका युवतीला तिचा मित्र एकटीला सोडून निघून गेल्याची घटना घडली. अंधारात ती एकटी उभी असताना धरण परिसरातील सुरक्षारक्षक हरिदास कुंडलिकराव वऱ्हाड यांच्या सतर्कतेमुळे तिला वेळेवर मदत मिळाली आणि पोलिसांच्या माध्यमातून ती सुखरूप घरी पोहोचली.

मिळालेल्या माहितीनुसार, ही युवती गुरुवारी (ता. १२) आपल्या चुलतभावासोबत धरण परिसरात आली होती. त्यावेळी तिच्या मित्राने ‘दोन मिनिटे थांब, मी काहीतरी खाण्यासाठी घेऊन येतो’ असे सांगून तेथून निघून गेला. मात्र बराच वेळ उलटूनही तो परत न आल्याने युवती धरणाच्या कडेला झाडाखाली अंधारात एकटीच उभी होती. ही बाब सुरक्षारक्षक वऱ्हाड यांच्या निदर्शनास आली.

त्यांनी तत्काळ तिच्याकडे जाऊन विचारपूस केली. वऱ्हाड यांनी त्या मुलाचा मोबाईल क्रमांक घेऊन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याचा मोबाईल बंद असल्याचे आढळले. संबंधित युवतीकडे स्वतःचा मोबाइलही नव्हता.

परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन वऱ्हाड यांनी तिला सुरक्षितपणे घरी पाठवण्यासाठी ऑटोरिक्शाची व्यवस्था करून देण्याची तयारी दर्शवली. मात्र, तिने घरातील कौटुंबिक अडचणी असल्याचे सांगत घरी जाण्यास नकार दिला. यानंतर वऱ्हाड यांनी तातडीने ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली.

काही वेळातच स्थानिक पोलिस कर्मचारी दीपक सपकाळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी युवतीला सुरक्षितपणे तिच्या नांदेड सिटी परिसरातील घरी पोहोचवले. या संवेदनशील आणि तत्पर कृतीबद्दल वऱ्हाड यांचा रोटरी क्लब ऑफ सिंहगड रस्ता यांच्या वतीने इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अष्टविनायक यात्रा म्हणजे श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाचा अनोखा संगम; जाणून घ्या आठही गणरायांचे महत्त्व

Pपुणे : महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेत अष्टविनायक यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रीगणेशाची आठ…

2 मिनिटे ago

धनुष्यबाण गोठवण्याची मागणी करणाऱ्यांवर शिंदेंची खरमरीत टीका; ‘उबाठा’वर निशाणा

नवी दिल्ली: “बाळासाहेब ठाकरे यांना धनुष्यबाण प्राणाहून प्रिय होता. ते देव्हाऱ्यात धनुष्यबाणाची पूजा करायचे. मात्र, २०१९…

46 मिनिटे ago

राज्यभरात २९ सप्टेंबरला ‘रोजगार महाकुंभ’; महाविद्यालयांनी पुढाकार घ्यावा; चंद्रकांत पाटील

मुंबई: राज्यातील युवक-युवतींना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्ये आणि क्षमतेनुसार रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी…

49 मिनिटे ago

युद्धजन्य परिस्थितीतही भारताची अर्थव्यवस्था ७.८ टक्के दराने वाढतेय; एकनाथ शिंदे

ठाणे : जगातील अनेक देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असताना आणि त्याचा विविध अर्थव्यवस्थांवर परिणाम…

57 मिनिटे ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून सपकाळांचा सरकारवर हल्लाबोल

नाशिक : आदिवासी विद्यार्थी गेल्या १५ ते २० दिवसांपासून विविध मागण्यांसाठी उपोषण आणि आंदोलन करत…

1 तास ago

वरळीत कचरा अन् दुर्गंधीचे साम्राज्य; शिवसेना ॲक्शन मोडवर, वर्षभर ‘स्वच्छ वरळी’ अभियान

मुंबई : स्थानिक आमदारांच्या दुर्लक्षामुळे वरळी परिसरात कचरा आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरल्याचा आरोप करत शिवसेनेने…

1 तास ago