महाराष्ट्र

खडकवासला धरण परिसरात सतर्क सुरक्षारक्षकामुळे युवती सुरक्षित घरी

पुणे: खडकवासला धरण परिसरात रात्री नऊच्या सुमारास १५ ते १६ वर्षांच्या एका युवतीला तिचा मित्र एकटीला सोडून निघून गेल्याची घटना घडली. अंधारात ती एकटी उभी असताना धरण परिसरातील सुरक्षारक्षक हरिदास कुंडलिकराव वऱ्हाड यांच्या सतर्कतेमुळे तिला वेळेवर मदत मिळाली आणि पोलिसांच्या माध्यमातून ती सुखरूप घरी पोहोचली.

मिळालेल्या माहितीनुसार, ही युवती गुरुवारी (ता. १२) आपल्या चुलतभावासोबत धरण परिसरात आली होती. त्यावेळी तिच्या मित्राने ‘दोन मिनिटे थांब, मी काहीतरी खाण्यासाठी घेऊन येतो’ असे सांगून तेथून निघून गेला. मात्र बराच वेळ उलटूनही तो परत न आल्याने युवती धरणाच्या कडेला झाडाखाली अंधारात एकटीच उभी होती. ही बाब सुरक्षारक्षक वऱ्हाड यांच्या निदर्शनास आली.

त्यांनी तत्काळ तिच्याकडे जाऊन विचारपूस केली. वऱ्हाड यांनी त्या मुलाचा मोबाईल क्रमांक घेऊन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याचा मोबाईल बंद असल्याचे आढळले. संबंधित युवतीकडे स्वतःचा मोबाइलही नव्हता.

परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन वऱ्हाड यांनी तिला सुरक्षितपणे घरी पाठवण्यासाठी ऑटोरिक्शाची व्यवस्था करून देण्याची तयारी दर्शवली. मात्र, तिने घरातील कौटुंबिक अडचणी असल्याचे सांगत घरी जाण्यास नकार दिला. यानंतर वऱ्हाड यांनी तातडीने ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली.

काही वेळातच स्थानिक पोलिस कर्मचारी दीपक सपकाळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी युवतीला सुरक्षितपणे तिच्या नांदेड सिटी परिसरातील घरी पोहोचवले. या संवेदनशील आणि तत्पर कृतीबद्दल वऱ्हाड यांचा रोटरी क्लब ऑफ सिंहगड रस्ता यांच्या वतीने इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

2 तास ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

2 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

2 तास ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

2 तास ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

4 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

4 तास ago