पुणे: ग्रामपंचायत सदस्य किंवा सरपंच होण्यासाठी उमेदवार किमान *सातवी पास* असण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला असून गावाचे कारभार पाहण्यासाठी शैक्षणिक अर्हतेची मर्यादा घालण्यात आली आहे.
राज्याच्या ग्रामविकास विभागाने सरपंच अथवा सदस्यांचा शैक्षणिक अर्हतेबाबत आदेश जारी केल्यानुसार, 1 जानेवारी 1995 नंतर जन्मलेल्या व्यक्तीला ग्रामपंचायत सरपंच अथवा सदस्य होण्यासाठी किमान *सातवी पास* असणे आवश्यक आहे.
सातवी पासचे प्रमाणपत्र द्यावं लागणार
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना, सातवी पास असल्याचे सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाणित केलेले प्रमाणपत्र इच्छूक उमेदवारांना सादर करावे लागणार आहे. अर्थात, ज्यांचा जन्म 1995 पूर्वी झालेला असेल, त्यांना मात्र ही शैक्षणिक अट लागू नसेल.
दरम्यान, राज्यात सध्या सुमारे 7751 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम सुरु असून, सध्या उमेदवारी अर्ज भरण्याची रणधुमाळी चालली आहे. त्यामुळे ऐन थंडीत गावचे राजकीय वातावरण तापले आहे. सरपंच निवड थेट जनतेतून होणार असल्याने चुरस आणखी वाढली आहे.
१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…
मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा…
मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार…
ठाणे: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात भारतातही पंतप्रधान Narendra Modi यांच्यावर…
मुंबई: राज्यात वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांबाबत करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या…
शिरूरमध्ये कामाठीपुरा येथील आश्रमशाळेत खळबळ; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथील कामाठीपुरा…