राजकीय

धनुष्यबाण गोठवण्याची मागणी करणाऱ्यांवर शिंदेंची खरमरीत टीका; ‘उबाठा’वर निशाणा

नवी दिल्ली: “बाळासाहेब ठाकरे यांना धनुष्यबाण प्राणाहून प्रिय होता. ते देव्हाऱ्यात धनुष्यबाणाची पूजा करायचे. मात्र, २०१९ मध्ये बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्व आणि महाराष्ट्रातील जनतेचे बहुमत गोठवले. आता धनुष्यबाण गोठवण्याची मागणी केली जात आहे. बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्वाची भूमिका आणि धोरण पुसण्याचे काम सुरू आहे,” अशी खरमरीत टीका शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उबाठा)वर केली.

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री शिंदे मंगळवारी नवी दिल्ली येथे दाखल झाले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी उबाठावर निशाणा साधला.

सर्व प्रश्नांना उत्तर दिले जाईल’

सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीबाबत शिंदे म्हणाले, “राज्यघटना, पक्षाची घटना आणि निवडणूक आयोगाचे अधिकार या सर्व बाबी या प्रकरणात महत्त्वाच्या आहेत. शिवसेनेच्या वतीने युक्तिवाद सुरू झाल्यानंतर त्यांच्या प्रश्नांना उत्तर दिले जाईल.”

दरम्यान, दिल्लीत शिवसेनेच्या राज्यप्रमुखांची बैठक होणार असून त्यामध्ये संघटनात्मक विषयांवर चर्चा केली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

मोदींशी शिवरायांची तुलना आवडणार नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत बोलताना शिंदे म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांचा दैवतासमान आदर केला आहे. नौदलाच्या ध्वजावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा प्रस्थापित करण्याचे कामही त्यांनी केले. मात्र, शिवरायांशी केलेली तुलना पंतप्रधानांनाही आवडणार नाही.”

सरकारी कार्यालयांमध्ये शिष्टाचारानुसार राष्ट्रपती आणि पंतप्रधानांचे फोटो लावले जातात, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

मराठा समाजाबाबत सरकार सकारात्मक; आंदोलकांनीही सकारात्मक भूमिका घ्यावी

मराठा समाजाला १० टक्के आरक्षण, कुणबी प्रमाणपत्राच्या प्रश्नासाठी आयोगाची स्थापना, सारथी तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून बिनव्याजी कर्ज अशा अनेक योजना मुख्यमंत्री असताना राबविल्या. आताही इतर कोणत्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला न्याय देण्याची महायुती सरकारची भूमिका आहे. जे कायदेशीर आणि न्याय्य आहे, ते देण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. त्यामुळे उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनीही सकारात्मक भूमिका घ्यावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

SIR मोहिमेवर काँग्रेस आक्रमक; दावे-हरकतींसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढीची मागणी

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार…

2 तास ago

साखर कारखान्यांसाठी ‘सॉफ्ट लोन’ योजना; एफआरपी वेळेत देण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…

3 तास ago

१७ सप्टेंबरला बीड–पुणे रेल्वे धावणार; डिसेंबरअखेर बीड–मुंबई सेवाही सुरू करण्याचे उद्दिष्ट

मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…

3 तास ago

शिंदे गटाला निकालाआधीच टेन्शन? ‘धनुष्यबाण ठाकरेंनाच मिळणार’; असीम सरोदे यांचा मोठा दावा

मुंबई: सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील सुनावणी निर्णायक टप्प्यात पोहोचली असून, आजपासून शिंदे…

3 तास ago

अष्टविनायक यात्रा म्हणजे श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाचा अनोखा संगम; जाणून घ्या आठही गणरायांचे महत्त्व

Pपुणे : महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेत अष्टविनायक यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रीगणेशाची आठ…

3 तास ago

राज्यभरात २९ सप्टेंबरला ‘रोजगार महाकुंभ’; महाविद्यालयांनी पुढाकार घ्यावा; चंद्रकांत पाटील

मुंबई: राज्यातील युवक-युवतींना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्ये आणि क्षमतेनुसार रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी…

4 तास ago