शिरुर (अरुणकुमार मोटे): पिंपरखेड (ता. शिरुर) येथे बिबट्याने महिलेवर हल्ला केलेल्या परिसरात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात 6 ते 7 वर्षाची मादी जातीचा बिबट्या जेरबंद झाला आहे. एक बिबट जेरबंद झाला असला तरी ‘भय इथले संपत नाही’ अशी परीस्थिती येथील परिसरात कायम असून बिबट्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने बिबट्यांचा बंदोबस्त करण्याचे मोठे आव्हान वनविभागासमोर उभे टाकले आहे.
बुधवार (दि. 1) रोजी रात्री पुजा जालिंदर जाधव (वय २२) या महिलेवर बिबट्याने हल्ला केला होता यामध्ये या महिलेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पिंपरखेड येथील बोंबे- कुऱ्हाडे वस्तीच्या परिसरात वनविभागाकडून पिंजरे लावण्यात आले आहे. घटना घडलेल्या ठिकाणापासून 350 फुटावर विकास साहेबराव बोंबे यांच्या शेतात लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात रविवारी (दि. ५) पहाटे 4 वाजता 1 बिबट्या अडकला.
पिंजऱ्यात अडकलेला मादी बिबट शांत वाटत असल्याने कैद झालेला बिबट हा नरभक्षक वाटत नसल्याची शक्यता नागरिक व्यक्त करत आहे. या परिसरातील नागरिक प्रंचड दहशतीखाली आहेत.पिंजऱ्यात कैद झालेल्या बिबट्याची माणिकडोह बिबट निवारण केंद्रात रवानगी करण्यात आली असल्याचे वनविभागाचे वनरक्षक लहू केसकर, महेंद्र दाते यांनी सांगितले.
घटनास्थळी लावण्यात आलेल्या पिंजऱ्याच्या बाजूला स्वंयचलित कॅमेरा ट्रॅपमध्ये ही मादी कैद झाली होती.तेथील हालचालीचे निरिक्षण पहाता हा हल्ला करणारा बिबट्या आहे. पकडलेल्या बिबट्याचे ठसे आणि हल्ला करणाऱ्या बिबट्याचे ठसे वनविभागाचे संबंधित तज्ञ, वैद्यकीय अधिकारी यांच्या कडून तपासणी केल्यानंतर तो नरभक्षक आहे का ते निश्चित होईल, असे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी सांगितले.
शिरूर (तेजस फडके) : नवीन खरेदी केलेल्या शेतजमिनीच्या वादातुन एकाने आपल्या साथीदारांच्या मदतीने एका चुलत…
शिक्रापुर (ओंकार भोरडे) शिरुर तालुक्यातील वरूडे गावात घराबाहेर झोपलेल्या व्यक्तीच्या निर्घृण हत्येचा उलगडा अवघ्या 36…
मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि नाशिक कुंभमेळ्यानिमित्त तपोवन विकासासाठी आर्थिक…
नागपूर: महायुती सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही सरसकट नसून अनेक जाचक अटी-शर्तींनी युक्त असल्याने…
मुंबई: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत निर्माता…
मुंबई: "नेत्रदान हे मानवतेचे श्रेष्ठदान असून एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दृष्टीहीनांच्या आयुष्यात नवी पहाट निर्माण होऊ…