शिरूर तालुका

कासारीच्या पाणीपुरवठ्याला तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर

शिक्रापूर (शेरखान शेख): कासारी (ता. शिरुर) गावासाठी शासनाच्या जलजीवन मिशन योजने अंतर्गत पाणी पुरवठ्यासाठी 3 कोटी सोळा लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती प्रथम लोकनियुक्त सरपंच सुनिता भुजबळ यांनी सांगितले आहे.

कासारी (ता. शिरुर) या गावची लोकसंख्या 4 हजार च्या आसपास असून सदर गावासाठी जलजीवन मिशन अंतर्गत निधी देण्याची मागणी शासकीय पातळीवर करण्यात येत असताना शासनाकडून जलजीवन मिशन योजने अंतर्गत पाणी पुरवठ्यासाठी 3 कोटी सोळा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याने गावातील पाणी प्रश्न सुटणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. सदर योजनेमुळे गावातील प्रत्येक वाड्या वस्त्यांवर घरोघरी नळ जोडणी करुन घरोघरी पाणी मिळणार असल्याने महिला वर्गात आनंद व्यक्त करण्यात येत आहे

याबाबत बोलताना सदर योजनेसाठी आम्ही सतत पाठपुरावा करत होतो तसेच गावातील इतर सुख सोयींसाठी आम्ही संबंधित विभागांशी पाठपुरावा करत आहोत असल्याचे सांगत या कामासाठी ग्रामविकास अधिकारी वसंत पवार, माजी सरपंच सुखदेव भूजबळ, उपसरपंच रोहिणी रासकर, संभाजी भुजबळ, माजी उपसरपंच किरण रासकर, गोपाळ भुजबळ, गणपतराव काळकुटे, स्नेहल भुजबळ, स्वाती नवले, सुनिता दगडे, पुनम नवले या सर्वांसह गावातील विविध पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभल्याचे प्रथम लोकनियुक्त सरपंच सुनिता भुजबळ यांनी सांगितले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

16 तास ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

16 तास ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

16 तास ago

ब्रिटानिया कंपनीतील दुर्घटनेत टेम्पोचालकाचा मृत्यू; पत्नीला १४ लाखांची मदत अन् कायमस्वरुपी नोकरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…

16 तास ago

विविधतेतून गुणवत्तेकडे; विकसित भारतासाठी नव्या शिक्षणव्यवस्थेची गरज; दिनेश शिंदे

मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…

21 तास ago

पेपरफुटीला पूर्णविराम… हाच पारदर्शक परीक्षांचा नवा आरंभ!

पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…

21 तास ago