मुख्य बातम्या

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार करत त्यांना मध्यप्रदेशतील त्यांच्या कुटुंबाकडे पुनः सोपवण्यात आल्याने महीलांसह कुटुंबीयांनी माहेर संस्थेचे आभार मानले यातील एका महिलेला मृत समजुन तिच्या कुटुंबीयांनी तर महिलेला मृत समजून सर्व विधीही केले होते. परंतु माहेर संस्थेमुळे या दोनही महिलांची पुन्हा कुटुंबासोबत भेट झाली.

 

शिरुर तालुक्यातील वढु बुद्रुक येथे गेल्या सत्तावीस वर्षांपासुन माहेर संस्था निराधार, परीतक्ता, अनाथ महिला, मुले, पुरुष वयोवृध्द तसेच मानसिक संतुलन बिघडलेल्या महिला व पुरुष यांच्यासाठी गाव पातळीवर विविध प्रकल्पात कार्यरत असते. सध्या माहेरचे कार्य सात राज्यांमध्ये चालू आहे .त्यातील माहेर संचलित ‘वात्सल्यधाम प्रकल्प’ ज्यांचे मानसिक संतुलन बिघडलेल्या महिला ज्या की बेवारस अवस्थेत रस्त्यावर फिरताना मिळून आलेल्या असतात त्यासाठी कार्यरत आहे.

 

या प्रकल्पातील दोन महिलांचे मध्यप्रदेश येथे जाऊन माहेरच्या कर्मचारी रुपाली त्रिभुवन व अजय वानखेडे यांनी पुनर्वसन केले. प्रवेशिता अंजली कोल या ६ फेब्रुवारी २०२३ रोजी लोणीकंद पोलिसांमार्फत संस्थेत प्रवेशित झाल्या होत्या. प्रवेशा दरम्यान अंजली या अतिशय बिकट अवस्थेत होत्या. सुरुवातीला कोणतीही माहिती सांगता येत नव्हती. औषधोपचार वर सतत समुपदेशन करण्यात आले.

 

यावेळी समुपदेशन दरम्यान त्यांनी मध्यप्रदेशमधील खेरानी गाव जिल्हा कटनी असा पत्ता सांगितला. त्यानंतर तिला त्या पत्यावर घरी नेऊन सोडण्यात आले. त्या महिलेच्या घरी गेल्यावर समजले की अंजली या सहा वर्षांपासून घरातुन निघुन गेल्या होत्या. कुटुंबीयांनी दोन वर्षे त्यांचा शोध घेतला. परंतु त्यानंतर तिला मृत समजून त्यांनी आशा सोडली आणि ती मृत झाल्याचे समजुन सर्व धार्मिक विधी पार पाडले. परंतु तिला भेटल्यावर सर्व कुटुंबाच्या डोळ्यात आनंदाश्रु दिसुन आले.

 

तसेच दुसरी प्रवेशिता सुमित्रा साहू ही दिनांक २६ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रवेशित झाली होती. त्यांच्याशी संवाद साधून तसेच औषधोपचाराने त्यांना पतीचा फोन नंबर आठवला. त्या फोन क्रमांकावर संपर्क साधत त्यांचा पतीसोबत संवाद झाला. त्या दरम्यान माहिती समजली की त्यांचे पती अपंग असल्यामुळे एवढ्या लांब येऊ शकत नाही. त्यामुळे माहेरच्या कर्मचाऱ्यांनी मध्यप्रदेश येथे जात त्यांचे पुनर्वसन केले. सुमित्रा या तीन वर्षापासून घरातून बेपत्ता होत्या. त्यांना त्यावेळेस तीन महिन्याचे बाळ होते. त्यांचा त्यांच्या कुटुंबियाने आनंदाने स्वीकार केला. या दोन्ही कुटुंबाने माहेर संस्था आणि संस्थेच्या संस्थापिका लुसी कुरियन यांचे आभार मानले.

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे-अहमदनगर महामार्गावरील दिशादर्शक फलकाचा जाहिरातीसाठी सर्रास वापर

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भीमाशंकरहून परतताना शिंदेंचा ताफा थेट आंबेगावात; आढळरावांच्या घरी अचानक भेट

पुणे : पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संभाव्य राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ…

11 तास ago

धनुष्यबाणावरून सुप्रीम कोर्टात मोठा ट्विस्ट; शिंदे गटाकडून ठाकरे गटाला घेरणारी कागदपत्रे सादर

मुंबई : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या मालकीवरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत सर्वोच्च…

11 तास ago

राहुल गांधींच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचे प्रशिक्षण शिबिर संपन्न; संघटन विस्ताराचा दिला मंत्र

नाशिक: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानाअंतर्गत’ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून…

11 तास ago

SIR मोहिमेवर काँग्रेस आक्रमक; दावे-हरकतींसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढीची मागणी

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार…

13 तास ago

साखर कारखान्यांसाठी ‘सॉफ्ट लोन’ योजना; एफआरपी वेळेत देण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…

15 तास ago

१७ सप्टेंबरला बीड–पुणे रेल्वे धावणार; डिसेंबरअखेर बीड–मुंबई सेवाही सुरू करण्याचे उद्दिष्ट

मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…

15 तास ago