शिंदोडी (तेजस फडके) शिरुरच्या पुर्व भागातील घोड धरणात गेल्या तीन महिन्यांपासुन प्रचंड मोठया प्रमाणात यांत्रिक बोटींच्या साह्याने बेसुमार वाळू उपसा चालु असुन याबाबत व्हिडीओ करुन तो सोशल मिडियावर व्हायरल केल्याचा राग आल्याने वाळू माफियांनी गुनाट येथील शेतकरी भिवसेन कोळपे यांना फोनवर धमकी देत त्यांच्या शेतीतील मोटारीसह, बोअरवेल व केबलची तोडफोड करत लाखों रुपयांचे नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकरी भयभीत झाले असुन या मुजोर वाळु माफीयांवर महसुल व पोलिस विभाग आता कारवाईचा बडगा उगारणार का…? अशी सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.
गुनाट (ता. शिरुर) येथील शेतकरी भिवसेन कोळपे यांनी काही दिवसांपुर्वी गुनाट येथील कोळपेवस्ती येथे घोड धरणातुन बेकायदेशीररीत्या वाळू उपसा होत असल्याबाबत व्हिडिओ करुन तो सोशल मिडीयावर व्हायरल केला होता. याचाच राग मनात धरुन मुजोर झालेल्या वाळू माफियांनी कोळपे यांना फोन करुन ‘वाळू माफियांच्या नादाला लागू नकोस’ अशी धमकी देत शनिवार (ता १९) रोजी २४३, १५८, १६३ या तीनही गटातील दहा अश्वशक्तीचे दोन विद्युत पंप नदीपात्रात टाकून दिले. तर शेतातील बोअरवेल आणि शेतातील पाइपलाइनची मोडतोड केली.
घोड धरणातील वाळूमाफियांकडून शेतमालाच्या होणाऱ्या नुकसानीबाबत संबंधित यांनी पोलिस व महसुल प्रशासनाकडे सातत्याने दाद मागत असल्यानेच हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत भीवसेन कोळपे (रा. गुनाट, ता. शिरुर) या शेतकऱ्याने शिरुर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पुर्व भागातील राजकीय पदाधिकारी गप्प का…?
शिरुरच्या पुर्व भागात निमोणे येथील कुऱ्हाडवाडी तसेच गुनाट येथील कोळपेवस्ती तसेच चिंचणी येथील घोड धरणाच्या परिसरातून सर्रास बेकायदेशीरपणे वाळू उपसा तसेच वाळू वाहतुक चालु असताना या गावांतील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी नक्की काय करतात हा मोठा यक्षप्रश्न आहे. तसेच महसूल विभाग, पोलिस तसेच वाळू माफियांशी संगनमत करत याच राजकीय पुढाऱ्यांनी त्यांना वाळू उपशासाठी या भागात आणले असल्याचीही दबक्या आवाजात जोरदार चर्चा सुरु असुन घोड धरणातील बेकायदेशीर वाळू उपशासाठी दहशत निर्माण करणारे वाळू माफिया घोड धरणातील ‘काळ सोनं’ मिळविण्यासाठी शेतकरी व सर्वसामान्य लोकांच्या जीवावर उठतात की काय…? अशी सध्या परिस्थिती निर्माण झाली आहे.
घोड धरणातील वाळू माफियांनी वाळू वाहतुकीसाठी आमच्याच शेतातून रस्ते करायचे, त्यामुळे होणारे नुकसानही आम्हीच सहन करायचे असा सध्या प्रकार सुरु असुन वाळुमाफियांमुळे आम्हाला ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ सहन करावा लागत आहे. माझ्या शेती साहित्याचे नुकसान केले, त्या रात्री त्या परिसरात कोणाकोणाचे मोबाईल कार्यान्वित होते. कोण कोणाच्या संपर्कात होते, हे तपासल्यास खरे गुन्हेगार सापडतील.
भिवसेन कोळपे
नुकसानग्रस्त शेतकरी
शिरुर-आंबेगाव मतदार संघातील बारा गावच्या पाणीप्रश्नामुळे वळसे पाटलांवर शेतकरी नाराज…?
शिरुर; आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार:- संगीता राजापूरकर
शिरुर-आंबेगावच्या ‘वाल्या’ चा वाल्मिकी जयंतीच्या दिवशीच देवदत्त निकम यांनी घेतला खरपूस समाचार
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…
नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…