शिरूर तालुका

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्काराने नाथाभाऊ शेवाळे सन्मानित

कारेगाव (तेजस फडके): जनता दल सेक्युलर पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी धर्मपीठ यांच्यातर्फे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार २०२४’ ने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या सामाजिक व राजकीय जीवनातील आजवरच्या कार्यासाठी अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार समितीने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली. वाय. बी. चव्हाण सेंटर, मुंबई या ठिकाणी तेलंगणाचे राज्यपाल महामहीम मा. श्री. जिष्णु देव वर्मा जी यांच्या हस्ते त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

या पुरस्कार सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून प्रा. राम शिंदे जी (सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद), डॉ. मुरहरी केळे जी (ज्येष्ठ साहित्यिक, मा. अध्यक्ष, त्रिपुरा राज्य विद्युत मंडळ), आसिफ भामला जी (अध्यक्ष – भामला फाउंडेशन, मुंबई), सागर धापटे पाटील (आयोजक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार समिती) आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रजेला सुखी करणं हाच राजधर्म मानणाऱ्या मायाळू तरीही कर्तव्यकठोर अशा धुरंधर आणि पराक्रमी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने पुरस्कारित होणे, हे मी माझं मोठं सदभाग्य समजतो. आयुष्यभर आपण ज्या समाजसुधारकांच्या विचारांवर चालण्याचा प्रयत्न करतोय त्यांच्या नावाने पुरस्कार मिळणे, ही मला आजवर मिळालेली सर्वात मोठी पोचपावती आहे.

नाथाभाऊ शेवाळे

प्रदेशाध्यक्ष- जनता दल सेक्युलर, महाराष्ट्र

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

4 तास ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

4 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

4 तास ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

4 तास ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

6 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

6 तास ago