शिरूर तालुका

चासकमानला जमिनी जाऊनही सणसवाडीकर पाण्यापासून वंचित

सणसवाडी पाझर तलावासह विहिरी देखील कोरड्या ठणठणीत

शिक्रापूर (शेरखान शेख): चासकमान कळव्यासाठी ज्या ज्या गावातील शेतकऱ्यांच्या व गावच्या जमिनी गेल्या आहे. त्या गावांना व शेतकऱ्यांना चासकमानचे पाणी मिळणे गरजेचे असताना देखील सणसवाडीत शेकडो एकर जमिनी चासकमान साठी जाऊन देखील सणसवाडीकर चासकमानच्या हक्काच्या पाण्यापासून वंचित राहत आहे.

सणसवाडी (ता. शिरुर) येथे सन १९६२ साली शासनाच्या रोजगार हमी योजनेतून तलाव बांधण्यात आलेला असून सदर तलावातंर्गत तब्बल 60 विहिरी असून त्यामाध्यमातून शेजारील शेतकऱ्यांच्या शेतींचे सिंचन होते, तर जवळच नागरिकांना पाणी पुरवठा करणारी सहकारी पाणी वाटप संस्था आहे.

सणसवाडी गावातील शेकडो एकर जमिनी चासकमान प्रकल्पासाठी संपादित झालेल्या आहेत, चासकमानला जमिनी गेल्याने सणसवाडी ग्रामस्थांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळणे गरजेचे आहे. सध्या उन्हाळा वाढत असल्याने गावात पाणी टंचाई वाढलेली असताना शेतकऱ्यांची पिके जळून चाललेली आहे. त्यामुळे येथील तलावाला चासकमानचे पाणी सोडण्याची मागणी माजी उपसरपंच नवनाथ हरगुडे यांसह आदी ग्रामस्थांनी चासकमान विभागाकडे केली असून सणसवाडीच्या तलावात पाणी येणार का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

चासकमान धरणात साठा नसल्याने पाणी देणे शक्य नाही…

सणसवाडी (ता. शिरुर) येथील ग्रामस्थांच्या पाणी मागणी बाबत चासकमान विभागाचे शाखा अभियंता महेंद्र गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता सणसवाडी ग्रामस्थांनी पंधरा दिवसांपूर्वी पाण्याची मागणी करणे गरजेचे होते मात्र त्यांनी दोन दिवसात मागणी केली असून सध्या धरणात फक्त दहा टक्के पाणीसाठा असल्याने आता कोणाला पाणी देणे शक्य नसल्याचे चासकमान विभागाचे शाखा अभियंता महेंद्र गायकवाड यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

बहिणीच्या डोळ्यांसमोर भावाची पंचगंगेत उडी; रक्षाबंधनाची राखी हातातच

कोल्हापूर: घरगुती वादातून रागाच्या भरात घराबाहेर पडलेल्या ३२ वर्षीय तरुणाने बहिणीच्या डोळ्यांसमोर रुई येथील पंचगंगा…

5 तास ago

‘कुणाचाही हक्क न काढता मराठा समाजाला न्याय देणार’; शिंदेंचा निर्धार, परभणीत उबाठाला मोठा धक्का

परभणी: मराठा समाजाला न्याय देतानाच ओबीसी, बहुजन, आदिवासी आणि इतर सर्व समाजघटकांच्या हक्कांचे संरक्षण करून सर्वसमावेशक…

5 तास ago

खासगी विद्यापीठांच्या शुल्कावर नियंत्रण आणा; अन्यथा रस्त्यावर उतरू!

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ॲड. अमोल मातेले यांचा सरकारला इशारा; ‘उशिरा सुचलेले शहाणपण’ म्हणत जोरदार…

5 तास ago

शिर्डीत पराभव झाला नसता तर आजही शरद पवारांसोबत असतो; रामदास आठवले यांची खंत

पवारांसोबत राहिलो असतो तर नुकसान झाले असते; खडसेंच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात जुन्या राजकीय आठवणींना उजाळा…

21 तास ago

डीसीसी निवडणुकीत भाजपची ताकद वाढणार? सुभाष देशमुखांचा ठराव; शहाजी पवारही मैदानात

सोलापूर: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (डीसीसी) आगामी संचालक मंडळाच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून…

21 तास ago

भावाची प्रकृती पाहण्यासाठी गेले; भेट ठरली अखेरची! एकाच दिवशी सख्ख्या भावांचा मृत्यू

निलंगा : भावाची प्रकृती खालावल्याचे समजताच त्याची विचारपूस करण्यासाठी गेलेल्या धाकट्या भावाची ती भेटच दोघांची…

21 तास ago