शिरूर तालुका

शिक्रापूर ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा मुलगा बनला पोलीस

भटक्या समाजातील युवकाने दिला युवकांना अनोखा संदेश

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे अनेक दिवसांपूर्वी भटक्या समाजातून वास्तव्यास आलेल्या परिवारातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा मुलगा रोहित तुळजाराम माने परिस्थितीवर मात करत पोलीस दलात भरती झाला, तर भटक्या समाजातील युवकाने जिद्दीचा अनोखा संदेश दिला असल्याने त्याच्यावर परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथे भटक्या गोंधळी समाजातील शंकर माने यांचे कुटुंब काही वर्षांपूर्वी स्थाईक झाले. भटकंती करत फिरत्या पद्धतीने भांडी विक्रीचा व्यवसाय करत कुटुंबाचा गाडा हाकत असताना असताना माने कुटुंबातील तुळजाराम माने ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून काम करु लागला कुटुंबात कोणी शिक्षित नसताना तुळजाराम याने मुलांना चांगले शिक्षण देऊ केली.

तुळजाराम यांचा मुलगा रोहित बारावी नंतर पुढील शिक्षक घेत असताना त्याने गावातील गुरुकुल अभ्यासिका मध्ये अभ्यास करत पोलीस भरतीची तयारी सुरु केली कोरोना नंतर पोलीस भरतीची परीक्षा दिली. मात्र 2 मार्काने अपयश आले. मात्र रोहितने पुढे जिद्दीने अभ्यास करत नुकत्याच झालेल्या परीक्षेत जिद्दीने अभ्यास केला असता नुकत्याच जाहीर झालेल्या निकालातून रोहित तुळजाराम माने पुणे शहर पोलीस दलात भरती झाला असल्याने माने कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला असून रोहित याने भटक्या समाजातून पोलीस बनत कुटुंबाचे नाव उज्वल केले.

रोहित पोलीस झाल्याचे कळताच पुणे जिल्हा आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती मंगलदास बांदल, जिजामाता बँकेचे संचालक आबाराजे मांढरे, माजी सैनिक जालिंदर सासवडे, उद्योजक जनार्दन दोरगे यांसह आदींनी त्याचा सन्मान केला असून ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा मुलगा परिस्थितीवर मात करत पोलीस झाल्याने रोहितच्या यशा बद्दल त्याचे परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

परिस्थितीची जाणीव असल्याने जिद्दीने अभ्यास करत होतो, मला वडील तुळजाराम माने, चुलते लक्ष्मन माने व नातेवाईक निखील भिसे यांची मोठी साथ मिळाली असून जिद्द ठेवल्यास काहीही अश्यक्य नाही असे रोहित माने याने सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

4 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

7 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

7 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

8 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

8 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

8 तास ago