भटक्या समाजातील युवकाने दिला युवकांना अनोखा संदेश
शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे अनेक दिवसांपूर्वी भटक्या समाजातून वास्तव्यास आलेल्या परिवारातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा मुलगा रोहित तुळजाराम माने परिस्थितीवर मात करत पोलीस दलात भरती झाला, तर भटक्या समाजातील युवकाने जिद्दीचा अनोखा संदेश दिला असल्याने त्याच्यावर परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथे भटक्या गोंधळी समाजातील शंकर माने यांचे कुटुंब काही वर्षांपूर्वी स्थाईक झाले. भटकंती करत फिरत्या पद्धतीने भांडी विक्रीचा व्यवसाय करत कुटुंबाचा गाडा हाकत असताना असताना माने कुटुंबातील तुळजाराम माने ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून काम करु लागला कुटुंबात कोणी शिक्षित नसताना तुळजाराम याने मुलांना चांगले शिक्षण देऊ केली.
तुळजाराम यांचा मुलगा रोहित बारावी नंतर पुढील शिक्षक घेत असताना त्याने गावातील गुरुकुल अभ्यासिका मध्ये अभ्यास करत पोलीस भरतीची तयारी सुरु केली कोरोना नंतर पोलीस भरतीची परीक्षा दिली. मात्र 2 मार्काने अपयश आले. मात्र रोहितने पुढे जिद्दीने अभ्यास करत नुकत्याच झालेल्या परीक्षेत जिद्दीने अभ्यास केला असता नुकत्याच जाहीर झालेल्या निकालातून रोहित तुळजाराम माने पुणे शहर पोलीस दलात भरती झाला असल्याने माने कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला असून रोहित याने भटक्या समाजातून पोलीस बनत कुटुंबाचे नाव उज्वल केले.
रोहित पोलीस झाल्याचे कळताच पुणे जिल्हा आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती मंगलदास बांदल, जिजामाता बँकेचे संचालक आबाराजे मांढरे, माजी सैनिक जालिंदर सासवडे, उद्योजक जनार्दन दोरगे यांसह आदींनी त्याचा सन्मान केला असून ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा मुलगा परिस्थितीवर मात करत पोलीस झाल्याने रोहितच्या यशा बद्दल त्याचे परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
परिस्थितीची जाणीव असल्याने जिद्दीने अभ्यास करत होतो, मला वडील तुळजाराम माने, चुलते लक्ष्मन माने व नातेवाईक निखील भिसे यांची मोठी साथ मिळाली असून जिद्द ठेवल्यास काहीही अश्यक्य नाही असे रोहित माने याने सांगितले.
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…
नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…