मांडवगण फराटा (संपत कारकूड): वेगवान ड्रायव्हिंग आणि बेजबाबदारपणे वाहन चालवून युवा पिढी रस्त्याच्या दुर्घटनेमध्ये आपले आयुष्य गमावत असून दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत जात असलयामुळे अनेक कुटुंबाला अकाली निराधार होण्याची वेळ आली आहे. नशेची सवय, गुन्हेगारीकडे होणारे अधिकचे आकर्षण यामध्ये तरुण आपले जीवन घालवीत असून देशामध्ये १ लाख तरुण आपले प्राण गमावत आहेत. शेतात काबाड कष्ट करुन रात्रंदिवस मेहनत आणि नोकरी करुन आई-वडिलांना २५ वर्ष लागतात एका तरुण मुलाला घडविण्यामध्ये परंतु वेगवान वाहन चालवून २५ मिनटात आयुष्य गमवण्याच्या घटना घडत असल्याने पालकांवर आता आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.
आधुनिकतेचा मोठा परिणाम युवा पिढीमध्ये दिसत असून ग्रामीण भागातील शाळा, कॉलेजमध्ये संस्कृतीचा अभाव दिसून येत आहे. कॉलेज फक्त पाट्या टाकायचा विषय झाला असून शिक्षणाचे बाजारीकरण झाले आहे. मोठ्या-मोठ्या इमारती उभारुन उभ्या केलेल्या शाळा, कॉलेज, शिक्षण संस्था, अकादमीमध्ये संस्कृतीचे शिक्षण देण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. केवळ पैसा कमविण्याच्या हव्यासापोटी संस्कृती दिवसेंदिवस लोप पावताना दिसत आहे. जी काही थोडीफार टिकून आहे, तीही अत्यंत वेगाने नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. संस्कृती नसली तर नुसते शिक्षण देऊन काय उपयोग. गुरुकुल शाळा उभ्या करुन हा ऱ्हास थांबवणे शक्य होईल का…?
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील संविदणे गावात भरदिवसा झालेल्या धाडसी घरफोडीने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण…
शिरूर (अरुणकुमार मोटे) : भारतात सायबर गुन्हेगारीने धोकादायक स्वरूप धारण केले असून, ऑनलाइन फसवणुकीतून उकळलेली…
शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपळसुटी येथे बुधवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने…
नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…
ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…
शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…