शिरूर तालुका

सुसाट ड्रायव्हिंगमुळे युवा पिढी बरबाद

मांडवगण फराटा (संपत कारकूड): वेगवान ड्रायव्हिंग आणि बेजबाबदारपणे वाहन चालवून युवा पिढी रस्त्याच्या दुर्घटनेमध्ये आपले आयुष्य गमावत असून दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत जात असलयामुळे अनेक कुटुंबाला अकाली निराधार होण्याची वेळ आली आहे. नशेची सवय, गुन्हेगारीकडे होणारे अधिकचे आकर्षण यामध्ये तरुण आपले जीवन घालवीत असून देशामध्ये १ लाख तरुण आपले प्राण गमावत आहेत. शेतात काबाड कष्ट करुन रात्रंदिवस मेहनत आणि नोकरी करुन आई-वडिलांना २५ वर्ष लागतात एका तरुण मुलाला घडविण्यामध्ये परंतु वेगवान वाहन चालवून २५ मिनटात आयुष्य गमवण्याच्या घटना घडत असल्याने पालकांवर आता आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.

आधुनिकतेचा मोठा परिणाम युवा पिढीमध्ये दिसत असून ग्रामीण भागातील शाळा, कॉलेजमध्ये संस्कृतीचा अभाव दिसून येत आहे. कॉलेज फक्त पाट्या टाकायचा विषय झाला असून शिक्षणाचे बाजारीकरण झाले आहे. मोठ्या-मोठ्या इमारती उभारुन उभ्या केलेल्या शाळा, कॉलेज, शिक्षण संस्था, अकादमीमध्ये संस्कृतीचे शिक्षण देण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. केवळ पैसा कमविण्याच्या हव्यासापोटी संस्कृती दिवसेंदिवस लोप पावताना दिसत आहे. जी काही थोडीफार टिकून आहे, तीही अत्यंत वेगाने नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. संस्कृती नसली तर नुसते शिक्षण देऊन काय उपयोग. गुरुकुल शाळा उभ्या करुन हा ऱ्हास थांबवणे शक्य होईल का…?

शिरूर तालुका टीम

Recent Posts

काँग्रेसला मोठा धक्का; साहेबराव कांबळेंसह यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई: राज्यभरात शिवसेनेच्या विस्ताराला वेग मिळत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून यवतमाळ जिल्ह्यात…

10 तास ago

पिंपळे खालसा येथील माऊली शेळके यांचे निधन

शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील प्रगतशील शेतकरी माऊली जगन्नाथ शेळेके (वय ६४) यांचे…

17 तास ago

राजकारणातील सुसंस्कृत, विकासाभिमुख नेतृत्व हरपले; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव…

2 दिवस ago

भंडाऱ्याचा रंग पिवळा, पण मनसुबा काळा! खंडोबाच्या नावावर रसायनांचा बाजार

श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: "येळकोट येळकोट जय मल्हार!" या घोषणेने…

2 दिवस ago

मालवणी समितीच्या शिफारशींचे काय झाले? पुणे विषारी दारू प्रकरणावर सरकारला सचिन सावंत यांचा सवाल

मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि…

2 दिवस ago

विधान परिषद निवडणुकीत पैशांचा वापर; सखोल चौकशीची मागणी – विजय वडेट्टीवार

नागपूर: विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते Vijay Wadettiwar…

2 दिवस ago