मांडवगण फराटा (संपत कारकूड): वेगवान ड्रायव्हिंग आणि बेजबाबदारपणे वाहन चालवून युवा पिढी रस्त्याच्या दुर्घटनेमध्ये आपले आयुष्य गमावत असून दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत जात असलयामुळे अनेक कुटुंबाला अकाली निराधार होण्याची वेळ आली आहे. नशेची सवय, गुन्हेगारीकडे होणारे अधिकचे आकर्षण यामध्ये तरुण आपले जीवन घालवीत असून देशामध्ये १ लाख तरुण आपले प्राण गमावत आहेत. शेतात काबाड कष्ट करुन रात्रंदिवस मेहनत आणि नोकरी करुन आई-वडिलांना २५ वर्ष लागतात एका तरुण मुलाला घडविण्यामध्ये परंतु वेगवान वाहन चालवून २५ मिनटात आयुष्य गमवण्याच्या घटना घडत असल्याने पालकांवर आता आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.
आधुनिकतेचा मोठा परिणाम युवा पिढीमध्ये दिसत असून ग्रामीण भागातील शाळा, कॉलेजमध्ये संस्कृतीचा अभाव दिसून येत आहे. कॉलेज फक्त पाट्या टाकायचा विषय झाला असून शिक्षणाचे बाजारीकरण झाले आहे. मोठ्या-मोठ्या इमारती उभारुन उभ्या केलेल्या शाळा, कॉलेज, शिक्षण संस्था, अकादमीमध्ये संस्कृतीचे शिक्षण देण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. केवळ पैसा कमविण्याच्या हव्यासापोटी संस्कृती दिवसेंदिवस लोप पावताना दिसत आहे. जी काही थोडीफार टिकून आहे, तीही अत्यंत वेगाने नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. संस्कृती नसली तर नुसते शिक्षण देऊन काय उपयोग. गुरुकुल शाळा उभ्या करुन हा ऱ्हास थांबवणे शक्य होईल का…?
कल्याण: कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कायमची सोडवण्यासाठी सॅटीस (SATIS) प्रकल्पाला गती देण्याचे…
मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपावर जोरदार टीका करत सरकारला थेट चर्चेचे आव्हान दिले आहे.…
सातारा: “मी उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर या मातीचा भूमिपुत्र म्हणून आलो आहे; जिथे कोणी जात…
मुंबई: महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवरून भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ता ॲड.…
मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर…
नागपूर: Vijay Wadettiwar यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या कालच्या भाषणावर जोरदार टीका करत ते भाषण…