Categories: इतर

केसांच गळण थांबवण्यासाठी कढीपत्त्याची चटणी कशी फायदेशीर ठरते

केसांच्या समस्या टाळण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं कढीपत्त्याचा वापर केला जातो कढीपत्त्यात अनेक पोषक तत्व असतात. ज्यामुळे केसांच्या वाढीत मदत होते. कढीपत्त्यात व्हिटामीन सी, व्हिटामीन बी, प्रोटीन आणि एंटी ऑक्सिडेंट्स असतात. या पानांमुळे केसांना अनेक फायदे मिळतात. कढीपत्ता केसांना लावण्याच्या विविध पद्धतीही माहित करून घ्यायला हव्यात.

केसांचे गळणं थांबवण्यासाठी कढीपत्त्याची चटणी कशी फायदेशीर ठरते

कढीपत्त्याच्या पानांमध्ये ए, बी, सी, ई व्हिटामीन्स असतात. यात एंटी ऑक्सिडेंट्स असतात. कढीपत्त्यातील व्हिटामीन सी, कोलाजन प्रोडक्शन वाढवते. ज्यामुळे केस सरळ राहण्यास मदत होते. कढीपत्त्यात एंटी इन्फ्लामेटरी गुणधर्म असतात. ज्यामुळे हेअर फॉलिकल्सचे डॅमेज रोखता येते. कढीपत्त्याच्या सेवनानं केसांमध्ये मॉईश्चर टिकून राहते. ज्यामुळे स्काल्पचा ड्रायनेस कमी होतो आणि नवीन केसांची वाढ होते.

कढीपत्त्याची चटणी बनवण्यासाठी तुम्हाला कढीपत्त्याची ४ ते ५ पानं घ्यावी लागतील. त्याव्यतिरिक्त २ चमचे तूप, एक चमचा चणा डाळ, अर्धा कप भाजलेले शेंगदाणे, ५ ते ६ लाल सुक्या मिरच्या, २ चमचे मोहोरीच दाणे, २ चमचे जीरं आणि गरजेनुसार मिठाची आवश्यकता असेल. ही चटणी करण्यासाठी सगळ्यात आधी कढईत तूप गरम करायला ठेवा. त्यानंतर त्यात कढीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत शिजवून घ्या.

नंतर यात चण्याची डाळ घाला मग मोहोरीचे दाणे, मिरची घालून शिजवा. नंतर सर्व मसाले घालून तसंच कढीपत्त्याची पानं ब्लेडरमध्ये घालून पावडर बनवून घ्या. आहारतज्ज्ञ सांगतात की जेव्हा तुम्ही ही चटणी खाल तेव्हा दह्यात मिसळून खाऊ शकता. केसांबरोबरच आरोग्यालाही याचे फायदे मिळतात. ही चटणी खाल्ल्यानं केस गळण्याची समस्या टाळण्यास मदत होते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे; करड्यात आठ जणांकडून तरुणावर गोळीबार

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत असतानाच करडे गावात घडलेल्या गोळीबाराच्या…

6 तास ago

दिवंगत अजितदादा पवारांना अभिवादन; विधानमंडळाची स्मृतीपत्रे सुनेत्रा अजित पवार यांच्या स्वाधीन.

बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…

16 तास ago

२०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य; ‘देवगिरी ते देवराई’ अभियानाचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…

16 तास ago

पिंपळे जगतापच्या पाषाण तलावात तरुणाचा मृतदेह; LCB सह विविध तपास पथके घटनास्थळी

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील पाषाण तलावात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून…

16 तास ago

‘ईशान सेतू’ने महाराष्ट्र-ईशान्य भारत जोडला; मणिपूरमध्ये सिद्धिविनायकाची प्रतिकृती उभारणार; एकनाथ शिंदे

ईशान्य भारतातील भाषांमध्ये रामायण, गीता, हनुमान चालीसाचे प्रकाशन; पवित्र ग्रंथांच्या मोफत वितरणाचा खर्च उचलण्याची शिंदेंची…

16 तास ago

मोदींनी सोनम वांगचुकांची भेट का घेतली नाही?; राम मंदिर चोरीवर भाजप-आरएसएसवर सपकाळांचा हल्लाबोल

मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केंद्र सरकार, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक…

17 तास ago