केसांच्या समस्या टाळण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं कढीपत्त्याचा वापर केला जातो कढीपत्त्यात अनेक पोषक तत्व असतात. ज्यामुळे केसांच्या वाढीत मदत होते. कढीपत्त्यात व्हिटामीन सी, व्हिटामीन बी, प्रोटीन आणि एंटी ऑक्सिडेंट्स असतात. या पानांमुळे केसांना अनेक फायदे मिळतात. कढीपत्ता केसांना लावण्याच्या विविध पद्धतीही माहित करून घ्यायला हव्यात.
केसांचे गळणं थांबवण्यासाठी कढीपत्त्याची चटणी कशी फायदेशीर ठरते
कढीपत्त्याच्या पानांमध्ये ए, बी, सी, ई व्हिटामीन्स असतात. यात एंटी ऑक्सिडेंट्स असतात. कढीपत्त्यातील व्हिटामीन सी, कोलाजन प्रोडक्शन वाढवते. ज्यामुळे केस सरळ राहण्यास मदत होते. कढीपत्त्यात एंटी इन्फ्लामेटरी गुणधर्म असतात. ज्यामुळे हेअर फॉलिकल्सचे डॅमेज रोखता येते. कढीपत्त्याच्या सेवनानं केसांमध्ये मॉईश्चर टिकून राहते. ज्यामुळे स्काल्पचा ड्रायनेस कमी होतो आणि नवीन केसांची वाढ होते.
कढीपत्त्याची चटणी बनवण्यासाठी तुम्हाला कढीपत्त्याची ४ ते ५ पानं घ्यावी लागतील. त्याव्यतिरिक्त २ चमचे तूप, एक चमचा चणा डाळ, अर्धा कप भाजलेले शेंगदाणे, ५ ते ६ लाल सुक्या मिरच्या, २ चमचे मोहोरीच दाणे, २ चमचे जीरं आणि गरजेनुसार मिठाची आवश्यकता असेल. ही चटणी करण्यासाठी सगळ्यात आधी कढईत तूप गरम करायला ठेवा. त्यानंतर त्यात कढीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत शिजवून घ्या.
नंतर यात चण्याची डाळ घाला मग मोहोरीचे दाणे, मिरची घालून शिजवा. नंतर सर्व मसाले घालून तसंच कढीपत्त्याची पानं ब्लेडरमध्ये घालून पावडर बनवून घ्या. आहारतज्ज्ञ सांगतात की जेव्हा तुम्ही ही चटणी खाल तेव्हा दह्यात मिसळून खाऊ शकता. केसांबरोबरच आरोग्यालाही याचे फायदे मिळतात. ही चटणी खाल्ल्यानं केस गळण्याची समस्या टाळण्यास मदत होते.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…
नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…