Categories: इतर

TET पेपरफुटीची निष्पक्ष चौकशी करा; दोषींवर कठोर कारवाई करा, अन्यथा…

मुंबई: महाराष्ट्रात रविवारी (२८ जून) होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटीच्या वृत्तांवरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. पेपरफुटीची तात्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा विद्यार्थ्यांच्या हितासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

सपकाळ म्हणाले की, भाजपा सरकारला कोणतीही परीक्षा पेपरफुटीशिवाय पार पाडता येत नाही. नीट परीक्षेच्या पेपरफुटीचे प्रकरण ताजे असतानाच आता TET परीक्षेचा पेपर फुटल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर आणि भविष्यावर पाणी फेरले जात असून, पेपरफुटी रॅकेटला नेमके कुणाचे राजकीय संरक्षण आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

विद्यार्थी अभ्यास करण्याऐवजी पेपर आधीच कुणाकडे पोहोचतोय याची चिंता करत आहेत. हा प्रकार प्रामाणिक आणि होतकरू विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा असून, पेपरफुटीच्या संपूर्ण रॅकेटची पाळेमुळे शोधून काढून कठोर कारवाई करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.

नीट परीक्षेच्या पेपरफुटीप्रकरणी देशभर संताप व्यक्त झाला, मात्र अद्याप केंद्रीय शिक्षण मंत्र्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. विद्यार्थी आणि शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराकडे भाजपा सरकार डोळेझाक करत असल्याचा आरोपही सपकाळ यांनी केला.तरुण हे देशाचे भविष्य असून त्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात काँग्रेस तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही त्यांनी दिला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

तिरंग्याच्या प्रेमामागे भाजपा-आरएसएसचा कावा नसावा’; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अनेक वर्षे तिरंगा ध्वजाला विरोध केला, स्वातंत्र्य चळवळीत त्यांचा सहभाग नव्हता…

10 तास ago

आर. ए. पोद्दार आयुर्वेदिक रुग्णालयाला सचिन अहिरांची सदिच्छा भेट; आरोग्य सुविधांचा घेतला आढावा

मुंबई : आयुर्वेदिक वैद्यकीय क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या वरळी येथील आर. ए. पोद्दार आयुर्वेदिक रुग्णालयाला…

15 तास ago

लाल किल्ल्यावरून मोदींचा ‘वंदे मातरम्’चा जयघोष; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना थेट सल्ला

मुंबई : स्वातंत्र्यलढ्यात असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी ‘वंदे मातरम्’चा जयघोष करत देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. याच…

15 तास ago

संसद परिसरात प्रियंका गांधी आणि भाजप खासदार आमनेसामने;

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या आठवड्यातही सरकार आणि विरोधकांमधील संघर्ष कायम आहे. मंगळवारी…

17 तास ago

‘अंधारे आल्या अन् शिवसेनेचं अस्तित्वच संपलं’; भाजप आमदारांचा हल्लाबोल, ‘नैराश्यातून बडबड सुरू’

सोलापूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या तथा संपर्कप्रमुख सुषमा अंधारे यांनी पालकमंत्री जयकुमार…

17 तास ago

अण्णासाहेब पाटील महामंडळात मोठा फेरबदल; नरेंद्र पाटलांच्या मागणीला यश, एमडी विजयसिंह देशमुखांची बदली

मुख्यमंत्री फडणवीसांकडून मागणीची दखल; अविनाश रणखांब यांची नव्या एमडीपदी नियुक्ती मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक…

17 तास ago