मुंबई: महाराष्ट्रात रविवारी (२८ जून) होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटीच्या वृत्तांवरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. पेपरफुटीची तात्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा विद्यार्थ्यांच्या हितासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
सपकाळ म्हणाले की, भाजपा सरकारला कोणतीही परीक्षा पेपरफुटीशिवाय पार पाडता येत नाही. नीट परीक्षेच्या पेपरफुटीचे प्रकरण ताजे असतानाच आता TET परीक्षेचा पेपर फुटल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर आणि भविष्यावर पाणी फेरले जात असून, पेपरफुटी रॅकेटला नेमके कुणाचे राजकीय संरक्षण आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
विद्यार्थी अभ्यास करण्याऐवजी पेपर आधीच कुणाकडे पोहोचतोय याची चिंता करत आहेत. हा प्रकार प्रामाणिक आणि होतकरू विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा असून, पेपरफुटीच्या संपूर्ण रॅकेटची पाळेमुळे शोधून काढून कठोर कारवाई करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
नीट परीक्षेच्या पेपरफुटीप्रकरणी देशभर संताप व्यक्त झाला, मात्र अद्याप केंद्रीय शिक्षण मंत्र्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. विद्यार्थी आणि शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराकडे भाजपा सरकार डोळेझाक करत असल्याचा आरोपही सपकाळ यांनी केला.तरुण हे देशाचे भविष्य असून त्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात काँग्रेस तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही त्यांनी दिला.
मुंबई: शिक्षक पात्रता परीक्षा (TET) रद्द होण्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)चे प्रदेश प्रवक्ते…
मुंबई: NEET नंतर आता शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटीची घटना समोर आल्याने महाराष्ट्रातील परीक्षा व्यवस्थेवरील…
शिरूर : शिरूर तालुक्यातील मांडवण फराटा येथील गोकुळनगर परिसरात एका महिलेवर बिबट्याने जीवघेणा हल्ला केला.…
मुंबई: जागतिक एमएसएमई (MSME) दिनानिमित्त महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ (MSSIDC) तर्फे शनिवारी (27 जून) वाशी…
पुणे: उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी शुक्रवारी श्रीक्षेत्र आळंदी येथे भेट…
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघर्षातून नेतृत्व घडवत स्वतंत्र राजकीय स्थान निर्माण केल्याची…