सविंदणे (अरुणकुमार मोटे): सध्या शिरुर तालुक्यात (दि. १७) रोजी रात्रीच्या सुमारास मोठा मुसळधार पाऊस पडला असून ओढया नाल्यांना मोठे महापूर आले आहेत.
सविंदणे येथे लोणी- धामणीवरुन वाहणाऱ्या ओढयावर सविंदणे गावच्या उत्तर बाजूला भोरवस्ती, पडवळमळा, मडके आळी, किठेमळा, प्रगती नगर अशा लोकवस्त्या शेताच्या ठिकाणी सोईनुसार मोठया प्रमाणात विखुरल्या आहेत. अनेक वर्षापासून येथे पुलाची मागणी होती. परंतू या ओढयावर अदयापपर्यंत मोठा पुल नसल्यामुळे ग्रामस्थांनी स्वखर्चातून नळया टाकून छोटे -छोटे पुल तयार केले होते.
मुसळधार झालेल्या पावसाने ओढयाला महापूर आल्याने हे सर्व छोटे पुल वाहून गेल्याने तेथील नागरीकांना गावामध्ये येण्याचा मार्गच बंद झाला आहे. तसेच यामुळे विदयार्थ्यांना शाळेत येता आले नसून दुग्ध वाहतुकही ठप्प झाली आहे. तसेच नागरीकांचे दळणवळणासाठी पुल नसल्याने प्रंचड हाल होत असून ओढयांवरील पुलाचे काम करण्यासाठी नागरीकांची मागणी आता जोर धरु लागली आहे.
बऱ्याच दिवसापासून अनेक पुलांची, विकास कामांची मागणी होत असताना तसेच जिल्हा परिषद, पंचायत समितीवर राष्ट्रवादीची सत्ता असताना राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या सविंदणे गावात या ओढयावर पुल होऊ शकला नाही. या भागात राष्ट्रवादी पक्षाचे एक युवक अध्यक्ष राहत असून त्यांच्या बऱ्याच दिवसापासून पुलाच्या मागणीला केराची टोपली दाखवली जात आहे. या भागात राजकिय उदासिनता दिसून येत असून सविंदणे गावाला नेहमीच अपूरा निधी उपलब्ध होत असल्याची खंत ऊपसरपंच भाऊसाहेब लंघे यांनी व्यक्त केली आहे.
घटनास्थळी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पोपटराव गावडे, प्रदिप दादा वळसे पाटील, डॉ. सुभाष पोकळे,राजेंद्र गावडे यांनी भेट दिली असून आता कधी पुल बनतोय की पुलाच्या होण्याच्या घोषणा हवेत विरतात हे पाहणे महत्वाचे ठरेल.
बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…
मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…
शिक्रापुर (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील पाषाण तलावात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून…
ईशान्य भारतातील भाषांमध्ये रामायण, गीता, हनुमान चालीसाचे प्रकाशन; पवित्र ग्रंथांच्या मोफत वितरणाचा खर्च उचलण्याची शिंदेंची…
मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केंद्र सरकार, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक…
बारामती : अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील ७५ आणि महाराष्ट्रातील बारामती व नांदुरा या दोन…