क्राईम

प्रेमाविवाह केलेल्या दाम्पत्याला मारहाण-अपहरणाची घटना; अवघ्या 24 तासात प्रकरणाला वेगळं वळण

पुणे: पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खरपुडी गावात आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्यावर हल्ला झाल्याची आणि पत्नीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर, या प्रकरणात एक मोठे वळण आले आहे. अपहरण झालेली पत्नी प्राजक्ता गोसावी ही स्वतः तिच्या कुटुंबीयांसोबत खेड पोलीस स्टेशनला हजर झाली.

या प्रकरणी पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल मांडवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राजक्ताने पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “माझे अपहरण झाल्यानंतर कुटुंबीयांनी मला समजावले. आता आमच्यातील कटुता संपली असून, ते माझ्या पतीला स्वीकारतील.” या विधानामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये समेट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नेमकी काय घडली होती घटना?

या प्रकरणातील पीडित पती विश्वनाथ गोसावी आणि प्राजक्ता यांनी आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर ते दोघे खरपुडी येथे राहत होते. रविवारी सायंकाळी प्राजक्ताचे कुटुंबीय आणि इतर काही लोकांनी गावात येऊन विश्वनाथला जबर मारहाण केली आणि प्राजक्ताचे अपहरण केले होते. या घटनेनंतर खेड पोलीस ठाण्यात प्राजक्ताचा भाऊ, आई आणि इतर मिळून एकूण 15 जणांविरोधात अपहरण आणि गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार

प्राजक्ताने स्वतः हजर होऊन समेटाची भूमिका घेतली असली, तरी पोलिसांनी कायद्यानुसार पुढील कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला आहे. अपहरणाच्या तक्रारीनुसार, संबंधित आरोपींना उद्या न्यायालयात हजर केले जाईल. त्यानंतर न्यायालय जो निर्णय देईल, त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे, उद्याच या दाम्पत्याचा लग्नाचा वाढदिवस आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूरमध्ये डिजिटल ‘पोर्टर’ अ‍ॅपमधून ‘एमडी’ चा पुरवठा; लाखोंचा मुद्देमाल जप्त, तिघे जेरबंद…

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात ड्रग्स माफियांनी आता थेट डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार घेतला असुन त्यामुळे…

4 तास ago

शिरूर शहरात महिलेची रस्त्यातच प्रसूती; माणुसकीचे घडले दर्शन पण…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात प्रसूतीच्या कळांनी विव्हळणाऱ्या एका मातेला रुग्णालयापर्यंत पोहोचणेही कठीण झाले असताना,…

6 तास ago

विधानसभा निवडणूक २०२४!  ‘परिशिष्ट ४४’च्या प्रती तातडीने द्या; काँग्रेसची मागणी

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान प्रक्रियेवर उपस्थित होत असलेल्या शंका आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर,…

11 तास ago

‘खाकी’च्या बळावर विकासाला गती; महाराष्ट्र पोलीसांना ग्लोबल बनवण्याचा शिंदेंचा निर्धार

मुंबई: राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत असेल तरच विकासाला खरी गती मिळते, असा ठाम संदेश देत उपमुख्यमंत्री…

11 तास ago

पद्म पुरस्कार 2027 साठी राज्यस्तरीय समिती स्थापन

मुंबई: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्यासाठी राज्य…

11 तास ago

पुण्यात महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी बस सुविधांमध्ये सुधारणा; लवकरच उच्चस्तरीय बैठक; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देत बस सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी लवकरच…

11 तास ago