कारेगाव (तेजस फडके) सध्या राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार करत हत्या करण्याचे प्रकार सुरु असताना शिरुर तालुक्यात एका व्यक्तीस दाखल असलेल्या गुन्ह्याबाबत चर्चा करायची आहे अस सांगत एका ठिकाणी बोलावून घेत नंतर बंदूकिचा धाक दाखवत त्याचे अपहरण करत त्याच्यावर जीवघेणा हल्ला करुन त्यानंतर त्याला अष्टविनायक महामार्गावर कवठे-पारगाव रस्त्यावरील लाखणगाव वनविभागाच्या क्षेत्रात नेऊन टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असुन हि घटना रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन हद्दीत घडली आहे.
रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:30 ते दुपारी 3:30 वाजण्याच्या दरम्यान रांजणगाव गणपती ते बाभुळसर खुर्द या अष्टविनायक महामार्गावर फिर्यादी अजित हनुमंत ढेरंगे (रा. कुरुंद, हमालवस्ती, ता. पारनेर, जि. अहमदनगर) याला आरोपी प्रविण वाळके, समीर ऊर्फ सोन्या तिरखुंडे, सागर तिरकुंडे, हर्षद गोसावी, जासुद या सर्वांनी फिर्यादी अजित ढेरंगे याला तुझ्या जुन्या केसच्या संदर्भात बोलायचं आहे असं सांगत अष्टविनायक महामार्गावर बोलून घेतले.
त्यानंतर त्याला बंदुकीचा धाक दाखवत वरील सर्वांनी त्याला जबरदस्तीने चारचाकी गाडीत बसवत भांबर्डे येथील डोंगरावर घेऊन गेले. त्यानंतर लाकडी दांडके तसेच कोयत्याने डोक्यात व हातावर वार करत जीवघेणा हल्ला करत गंभीर जखमी केले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीला नंतर कवठे येमाई-पारगाव (ता. आंबेगाव) पोलीस स्टेशनच्या हद्दीत नेऊन गंभीर अवस्थेत सोडून दिले. ही घटना एका प्रत्यक्षदर्शी पाहणाऱ्याने त्वरीत पारगाव पोलिस स्टेशनला संपर्क केला. त्यानंतर जखमी फिर्यादीला मंचर येथे वैद्यकीय ऊपचारासाठी पाठवण्यात आले.
याबाबत रांजणगाव MIDC पोलिसमध्ये वरील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मनोज नवसारे या घटनेचा सखोल तपास करत आहेत.
शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील करडे परिसरात अवघ्या दिड महिन्याच्या कालावधीत गोळीबाराच्या दोन…
दौंड: घरातून रुसून आंध्र प्रदेशातील रेणुगुंठा रेल्वे स्थानकावरून मदुराई–मुंबई एक्स्प्रेसमध्ये बसून निघालेल्या पवन भाटी या…
सराईत गुन्हेगारांचा गावात सशस्त्र धुडगूस; प्रतिबंधक कारवाया कागदावरच राहिल्या का...? शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत असतानाच करडे गावात घडलेल्या गोळीबाराच्या…
बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…
मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…