लातूर: लातूर शहरातील श्यामनगर परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. पती घरी उशिरा परतल्याच्या रागातून एका आईने आपल्या दीड वर्षांच्या चिमुरडीची निर्दयीपणे हत्या केल्याने संपूर्ण लातूर शहर हादरले आहे.
अश्विनी चौगुले (वय अंदाजे २५) असे आरोपी महिलेचे नाव असून, तिने नंदिनी नावाच्या आपल्या १८ महिन्यांच्या मुलीवर चाकूने सपासप वार करत तिचा जीव घेतला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, समाजातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
१७ वेळा चाकूने वार; घटनास्थळीच मृत्यू
ही भीषण घटना १९ जानेवारी रोजी सकाळी घडली. घरातील कौटुंबिक वादानंतर रागाच्या भरात अश्विनीने आपल्या चिमुरडीवर तब्बल १७ वेळा चाकूने वार केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. इतकेच नव्हे तर मुलीच्या तोंडातही चाकू खुपसण्यात आल्याचे उघड झाले असून, या अमानुष हल्ल्यात नंदिनीचा जागीच मृत्यू झाला.
चार वर्षांच्या भावासमोरच बहिणीची हत्या
या घटनेचा सर्वात धक्कादायक भाग म्हणजे आरोपी महिलेचा चार वर्षांचा मुलगा राजवीर याने हे संपूर्ण दृश्य आपल्या डोळ्यांसमोर पाहिले. आईकडूनच लहान बहिणीची हत्या होताना पाहिल्याने त्या बालमनावर खोल आघात झाला आहे.
मानसिकदृष्ट्या सक्षम; न्यायालयीन कोठडी सुनावली
या प्रकरणात पोलिसांनी अश्विनी चौगुले हिला तात्काळ अटक करून मंगळवारी न्यायालयात हजर केले. तिच्या मानसिक स्थितीची तपासणी करण्यासाठी तिला सुमारे ३० तास मानसोपचार तज्ज्ञांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. वैद्यकीय अहवालानुसार आरोपी महिला मानसिकदृष्ट्या पूर्णपणे सक्षम असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मानसिक आजारामुळे नव्हे, तर केवळ रागाच्या भरात तिने हे कृत्य केल्याचे निष्पन्न झाल्याने न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
उदरनिर्वाहासाठी लातूरमध्ये स्थलांतर
चौगुले कुटुंब मूळचे हासेगाव येथील असून रोजगाराच्या शोधात ते लातूरमध्ये आले होते. कुटुंबप्रमुख विक्रम चौगुले हे उसाच्या ट्रॅक्टरवर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. विक्रम घरी परतले असता घराचा उंबरठा रक्ताने माखलेला आणि मुलगी मृतावस्थेत पडलेली असल्याचे दृश्य पाहून ते हादरून गेले.
पोलिस तपास सुरू; कठोर कारवाईची मागणी
या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण लातूर जिल्ह्यात शोककळा पसरली असून, आरोपी महिलेविरुद्ध कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, बाल संरक्षण यंत्रणाही या प्रकरणात लक्ष घालत आहे.
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…
मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…
मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…
मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…
मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…