CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), quality = 75?
पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) २०२३ मधील पोलिस उपनिरीक्षक (PSI) परीक्षेत मुलींमध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळवणारी अश्विनी बाबुराव केदारी (वय ३०) यांचा एका दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला. नाशिक येथे PSI प्रशिक्षण घेत असताना गणेशोत्सवासाठी दोन दिवसांच्या सुट्टीवर गावी आलेल्या अश्विनीवर काळाने घाला घातला.
२८ ऑगस्ट रोजी सकाळी आंघोळीसाठी पाणी गरम करताना हिटरमुळे झालेल्या अपघातात ती ८० टक्के भाजली, आणि उपचारादरम्यान दहा दिवसांनी तिचा मृत्यू झाला. या घटनेने खेड तालुका आणि स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
नेमकं काय घडल
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पाळू या दुर्गम गावातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अश्विनीने आपल्या जिद्दीने आणि हुशारीने PSI परीक्षेत यश मिळवले होते. नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस अकादमीत तिचे प्रशिक्षण सुरू होते. गणेशोत्सवासाठी ती २७ ऑगस्टला गावी आली. दुसऱ्या दिवशी, २८ ऑगस्टला सकाळी माघारी जाण्याच्या तयारीत ती आंघोळीसाठी पाणी गरम करत होती.
पाण्यात हिटर लावून ती पुन्हा झोपी गेली. जाग आल्यानंतर पाणी उकळत असल्याचे पाहून तिने हिटर बंद केले आणि गरम पाण्याची बादली उचलण्याचा प्रयत्न केला. याचवेळी तिचा पाय घसरला, आणि उकळत्या पाण्याची बादली तिच्या अंगावर सांडली. या अपघातात ती ८० टक्के भाजली.
अपघातानंतर अश्विनीला तातडीने मोशी येथील धनश्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. नंतर तिच्यावर पिंपरी-चिंचवड येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात पुढील उपचार सुरू झाले. सुमारे दहा दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या अश्विनीवर रुग्णालयात कसून उपचार करण्यात आले. स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी तिच्या उपचारांसाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले, आणि अनेकांनी पुढाकार घेत मदतही केली. मात्र, सर्व प्रयत्नांना अपयश आले, आणि उपचारादरम्यान अश्विनीचा मृत्यू झाला.
जिल्हाधिकारी होण्याचं स्वप्न धूसर
अश्विनी ही सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी होती, पण तिची बुद्धिमत्ता आणि मेहनत यामुळे तिने PSI परीक्षेत मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. तिचे स्वप्न केवळ PSI बनण्यापुरते मर्यादित नव्हते; तिला उपजिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी होण्याची इच्छा होती. त्या दिशेने ती अथक परिश्रम करत होती. तिच्या यशाने खेड तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली होती. मात्र, एका छोट्या अपघाताने तिचे स्वप्न आणि आयुष्य अपूर्ण राहिले.
अश्विनीच्या मृत्यूने पुन्हा एकदा हिटरद्वारे पाणी तापवण्याच्या धोकादायक पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ग्रामीण भागात अजूनही अनेक ठिकाणी हिटरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो, पण यामुळे होणाऱ्या अपघातांबाबत पुरेशी जनजागृती नाही. अश्विनी ही अशा अपघाताची पहिली बळी नाही; यापूर्वीही अनेकांनी हिटरमुळे जीव गमावला आहे. या घटनेने प्रशासन आणि समाजाला सुरक्षित पर्याय आणि जनजागृतीच्या गरजेची आठवण करून दिली आहे.
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…
नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…