शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील गांजेवाडी, गणेशनगर परीसरात बुधवारी (दि.२०) सकाळी उसाच्या शेतात एक धक्कादायक घटना उघडकीस आली. फाकटे (ता. शिरूर) येथील देवराम नानाभाऊ टेके (वय अंदाजे ५०) यांचा मृतदेह आढळून आला असून त्यांच्या मृत्यूमागे खूनाचा संशय व्यक्त केला जात आहे. हा खुण झाला असेल तर तो कोणत्या कारणामुळे व का करण्यात आला याचा शोध शिरूर पोलिस करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टेके मंगळवारी (दि.१९) सकाळी नऊ वाजता घराबाहेर पडले होते. नातेवाईकांच्या मते सकाळी पावणेदहा वाजेपर्यंत त्यांचा फोन सुरू होता; मात्र त्यानंतर फोन बंद झाला. दिवसभर ते घरी परतले नाहीत किंवा संपर्कही झाला नाही. त्यामुळे मुलांनी व नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला.
दरम्यान, फाकटे येथील एका युवकाने मंगळवारी टेके यांना गणेश नगर–गांजेवाडी रस्त्याने जाताना पाहिल्याचे सांगितले. बुधवारी सकाळी नातेवाईकांनी त्या रस्त्याने जात शोध घेतला असता कवठे येमाई येथील गांजेवाडी रोडवरील पोल्ट्री शेजारी त्यांची दुचाकी सापडली. त्यानंतर दुचाकीपासून अर्धा किलोमीटर अंतरावर ऊसाच्या शेताच्या कडेला त्यांचा मृतदेह आढळून आला.
मृतदेहाच्या डोक्याला व मानेजवळ गंभीर जखमा असून प्राथमिक पाहणीत खूनाचा संशय व्यक्त होत आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शिरूर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच शिरूरचे पोलीस उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कारंडे, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण व पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास वेगाने सुरू आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ माजली असून या मयताबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे.
मुंबई: शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण तापले असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील दादर येथील ऐतिहासिक ‘राजगृह’ परिसरातील परिस्थितीवरून काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते…
मुंबई: महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ मर्यादिततर्फे महाराष्ट्र शासनाच्या ‘रॅम्प’ (रायझिंग अँड ॲक्सेलेरेटिंग एमएसएमई परफॉर्मन्स) उपक्रमांतर्गत…
शिरूर : अवैध धंदे बंद करण्यासाठी व इतर मागण्यांसाठी शिरूरमध्ये निलेश वाळुंज यांचे सत्याग्रह आंदोलन…
मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…
मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…