मुख्य बातम्या

शिरूर शहरातील तहसील कार्यालयासमोरील रस्त्यावर सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना

सामाजिक कार्यकर्त्यांच्या मागणीला प्रशासनाची ग्वाही

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील वाढत्या वाहतूक कोंडी आणि तहसिल कार्यालया समोरील रस्त्यावर अपघातांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. सामाजिक कार्यकर्ते निलेश मंदा यशवंत वाळुंज यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद देत शिरूर नगरपरिषद व संबंधित विभागीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून तातडीच्या कामांसाठी ग्वाही दिली.

तहसील कार्यालयासमोरील पुणे–अहिल्यानगर महामार्गावरील धोकादायक ठिकाणी वाहतूक सुरक्षेसाठी खालील उपाययोजना करण्यात येणार आहेत. दुभाजक उभारणी बाबत निविदा प्रक्रिया दोन ते तीन दिवसांत सुरू होणार असून, कार्यारंभ आदेशानंतर पुढील दीड महिन्यात काम पूर्ण होईल.

दिशादर्शक फलक बाबत आठ ते दहा दिवसांत तयार होतील व दुभाजक उभारणीनंतर त्वरित बसवले जातील.सिग्नल दिवे बसवण्याबाबत दुभाजकाच्या कामासोबतच उभारले जातील. शास्त्रीय गतिरोधक पावसाची उसंत मिळताच बसवले जाणार आहे.झेब्रा क्रॉसिंग तहसील व पंचायत समिती चौकात पावसानंतर करण्यात येईल.स्वच्छता व झाडांची छाटणी दोन दिवसांत पूर्ण होऊन दुभाजक बसवेपर्यंत तात्पुरत्या उपाययोजना सुरू राहतील.

शिरूर नगरपरीषदेचे बांधकाम अभियंता समाधान मुंगसे आणि कंत्राटी अभियंता सागर बडगुजर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून ही माहिती दिली.पाहणीवेळी ग्राहक पंचायतचे तालुका अध्यक्ष अरुणकुमार मोटे, सा.बां. विभागाचे गाडेकर, शिरूर पोलीस ठाण्याचे अमोल गारुडी आदी मान्यवर उपस्थित होते.

सामाजिक कार्यकर्ते वाळुंज यांनी तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांची स्वतंत्र भेट घेऊन कामांच्या प्रगतीबाबत चर्चा केली. तहसीलदारांनी यापूर्वीच नगरपरिषदेला पत्रव्यवहार करून आवश्यक सूचना दिल्याचे सांगून, पुन्हा एकदा अधिकाऱ्यांशी बोलून कामे तातडीने मार्गी लावली जातील, अशी ग्वाही दिली.शिरूरकरांसाठी ही सकारात्मक घडामोड ठरणार असून लवकरच शहरातील वाहतूक सुरक्षेत लक्षणीय सुधारणा दिसून येणार आहे.

बऱ्याच दिवसांपासून या विषयावर पाठपुरावा सुरू होता. तहसीलदार, गटविकास अधिकारी व पोलिस निरीक्षक यांनीही नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नगरपालिकेला पत्रव्यवहार केला होता. आता अधिकारींनी दिलेली आश्वासने वेळेत, दर्जेदार व शास्त्रीय पद्धतीने पूर्ण होणे आवश्यक आहे. जनहितासाठी या कामांवर सातत्याने लक्ष ठेवणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे.

निलेश मंदा यशवंत वाळुंज (सामाजिक कार्यकर्ते/व्हिसल ब्लोअर)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एसटीचा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…

18 तास ago

‘डुबता महाराष्ट्र’ करण्याचे पाप महायुती सरकारचे; जनता माफ करणार नाही;  हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील वाढत्या ड्रग्ज प्रकरणांवरून काँग्रेसने महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन…

18 तास ago

एपस्टीन फाइल्समुळेच महिला विधेयक? गाडगीळ यांचा संशय

मुंबई: जनगणनेचा अहवाल २०२७ मध्ये पूर्ण होणार असताना, वर्षभरात उपलब्ध होणाऱ्या ताज्या आकडेवारीऐवजी ११ वर्षांपूर्वीच्या…

18 तास ago

महिला सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी सर्व सेवा एकाच छताखाली आणण्याचा निर्णय; निलम गोऱ्हे

मुंबई: राज्यातील महिला सुरक्षेशी संबंधित शासकीय यंत्रणा आणि सामाजिक संस्थांमध्ये अधिक प्रभावी समन्वय साधून महिलांना…

18 तास ago

बिहारचा ‘चाणक्य’ की पडद्यामागचा दिग्दर्शक?

बिहारच्या राजकारणात सध्या जे काही सुरू आहे, ते पाहून जुन्या नाटककारांना देखील लाज वाटावी! पडद्यावर…

18 तास ago

मुंबईत ‘तिसरे दशावतारी नाट्यसंमेलन’; दिग्गज कलावंतांच्या उपस्थितीत रंगणार दशावताराचा सोहळा

मुंबई: आरती आर्ट अकादमी (मुंबई), वेताळ प्रतिष्ठान (वेंगुर्ले) आणि अखिल भारतीय दशावतारी नाट्य परिषद व…

18 तास ago