मुख्य बातम्या

शिरूर शहरातील तहसील कार्यालयासमोरील रस्त्यावर सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना

सामाजिक कार्यकर्त्यांच्या मागणीला प्रशासनाची ग्वाही

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील वाढत्या वाहतूक कोंडी आणि तहसिल कार्यालया समोरील रस्त्यावर अपघातांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. सामाजिक कार्यकर्ते निलेश मंदा यशवंत वाळुंज यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद देत शिरूर नगरपरिषद व संबंधित विभागीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून तातडीच्या कामांसाठी ग्वाही दिली.

तहसील कार्यालयासमोरील पुणे–अहिल्यानगर महामार्गावरील धोकादायक ठिकाणी वाहतूक सुरक्षेसाठी खालील उपाययोजना करण्यात येणार आहेत. दुभाजक उभारणी बाबत निविदा प्रक्रिया दोन ते तीन दिवसांत सुरू होणार असून, कार्यारंभ आदेशानंतर पुढील दीड महिन्यात काम पूर्ण होईल.

दिशादर्शक फलक बाबत आठ ते दहा दिवसांत तयार होतील व दुभाजक उभारणीनंतर त्वरित बसवले जातील.सिग्नल दिवे बसवण्याबाबत दुभाजकाच्या कामासोबतच उभारले जातील. शास्त्रीय गतिरोधक पावसाची उसंत मिळताच बसवले जाणार आहे.झेब्रा क्रॉसिंग तहसील व पंचायत समिती चौकात पावसानंतर करण्यात येईल.स्वच्छता व झाडांची छाटणी दोन दिवसांत पूर्ण होऊन दुभाजक बसवेपर्यंत तात्पुरत्या उपाययोजना सुरू राहतील.

शिरूर नगरपरीषदेचे बांधकाम अभियंता समाधान मुंगसे आणि कंत्राटी अभियंता सागर बडगुजर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून ही माहिती दिली.पाहणीवेळी ग्राहक पंचायतचे तालुका अध्यक्ष अरुणकुमार मोटे, सा.बां. विभागाचे गाडेकर, शिरूर पोलीस ठाण्याचे अमोल गारुडी आदी मान्यवर उपस्थित होते.

सामाजिक कार्यकर्ते वाळुंज यांनी तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांची स्वतंत्र भेट घेऊन कामांच्या प्रगतीबाबत चर्चा केली. तहसीलदारांनी यापूर्वीच नगरपरिषदेला पत्रव्यवहार करून आवश्यक सूचना दिल्याचे सांगून, पुन्हा एकदा अधिकाऱ्यांशी बोलून कामे तातडीने मार्गी लावली जातील, अशी ग्वाही दिली.शिरूरकरांसाठी ही सकारात्मक घडामोड ठरणार असून लवकरच शहरातील वाहतूक सुरक्षेत लक्षणीय सुधारणा दिसून येणार आहे.

बऱ्याच दिवसांपासून या विषयावर पाठपुरावा सुरू होता. तहसीलदार, गटविकास अधिकारी व पोलिस निरीक्षक यांनीही नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नगरपालिकेला पत्रव्यवहार केला होता. आता अधिकारींनी दिलेली आश्वासने वेळेत, दर्जेदार व शास्त्रीय पद्धतीने पूर्ण होणे आवश्यक आहे. जनहितासाठी या कामांवर सातत्याने लक्ष ठेवणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे.

निलेश मंदा यशवंत वाळुंज (सामाजिक कार्यकर्ते/व्हिसल ब्लोअर)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर सरकारचा बुलडोझर; जीआर मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरू; अतुल लोंढे

सरळ सेवा भरतीचे प्रमाण कमी करून लाखो स्पर्धा परीक्षार्थींवर अन्याय; काँग्रेसचा सरकारला इशारा मुंबई: एमपीएससीमार्फत…

5 तास ago

पोटात होणाऱ्या या समस्येमुळे मेंदुवर पडतो वाईट प्रभाव, जाणून घ्या कसा कराल बचाव

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, अनेक गंभीर आजारांची सुरूवात ही पोटापासूनच होते. त्यामुळेच पोटाचं आरोग्य…

6 तास ago

आल्याचा वापर करून शरीरातील Uric Acid करू शकता कमी

आजकाल शरीरात यूरिक अ‍ॅसिड वाढणं ही एक कॉमन समस्या झाली आहे. खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी…

6 तास ago

बेलाचे सरबत आरोग्यासाठी फायदेशीर

पचन सुधारते: बेलाच्या सरबतात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे पचन सुधारते आणि गॅस, अतिसार आणि…

6 तास ago

ठाण्यातील ९०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे काम फास्टट्रॅकवर पूर्ण करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ९००…

6 तास ago

अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिर परिसराच्या विकासाला गती; ५०० कोटींच्या आराखड्यासाठी म्हाडा विशेष नियोजन प्राधिकरण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता; रस्ते, वाहनतळ, पालखी मार्ग आणि सार्वजनिक सुविधांचा होणार सर्वांगीण विकास…

6 तास ago