नांदेड: नांदेडमध्ये एका नवविवाहितेचा हुंड्यासाठी बळी गेला. ताऊबाई चव्हाण नावाच्या एका महिलेला तिच्या सासरच्या लोकांनी विष देऊन मारल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत पतीसह सासू-सासऱ्याला अटक केली आहे. लग्नाच्या अवघ्या काही दिवसातच ही धक्कादायक घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
हुंड्यात सांगितलेली रक्कम दिली नसल्याने विवाहितेला संपवलं
मुखेड तालुक्यातील वसुर तांडा येथील ताऊबाईचा विवाह २ जुलै रोजी राठोडवाडीच्या सुधाकर राठोडसोबत झाला होता. लग्नात हुंडा म्हणून ठरलेली रक्कम पूर्ण न दिल्याने सासरच्या लोकांनी तिला त्रास देण्यास सुरुवात केली, असा आरोप आहे. ताऊबाईच्या माहेरच्या लोकांनी सांगितलं की, लग्नाच्या वेळी ६ लाख रुपये हुंडा देण्याचं ठरलं होतं. त्यांनी ५ लाख रुपये दिले सुद्धा. मात्र, उर्वरित १ लाख रुपयांसाठी ताऊबाईला विष पाजण्यात आलं.
९ जुलै रोजी ताऊबाईला उलट्या होऊ लागल्या. तिला आधी मुखेडमध्ये आणि नंतर हैदराबादमध्ये उपचारासाठी दाखल केलं. परंतु, १३ जुलै रोजी तिचा मृत्यू झाला.
हुंड्यात कमी दिलेल्या १ लाखासाठी लेकीला मारलं, कुटुंबियांचा आरोप
ताऊबाईच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितलं की, हुंड्यासाठीच तिला विष देऊन मारण्यात आलं. या प्रकरणी मुखेड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत ताऊबाईचा पती, सासू आणि सासरे अशा तिघांना अटक केली आहे. पोलीस अधीक्षक अविनाशकुमार यांनी सांगितलं की, विवाहितेला विष पाजन्यात आलं? का तिने स्वतः विष प्राशन केलं याचा तपास सुरु आहे.
ताऊबाईच्या वडिलांनी कर्ज काढून तिच्या लग्नासाठी पैसे जमा केले होते. मात्र, केवळ एका लाख रुपयांसाठी तिच्या सासरच्या लोकांनी तिचा जीव घेतला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून परिसरात शोक व्यक्त होत आहे. वडिलाने नातेवाईकांकडून हात उसने पैसे घेऊन लेकीचा विवाह केला होता. मात्र एक लाखासाठी सासरच्या मंडळींनी तिचा खून केला असल्याचं ताऊबाईच्या नातेवाईकांनी सांगितलं.
शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील प्रगतशील शेतकरी माऊली जगन्नाथ शेळेके (वय ६४) यांचे…
माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव…
श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: "येळकोट येळकोट जय मल्हार!" या घोषणेने…
मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि…
नागपूर: विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते Vijay Wadettiwar…
महायुतीचे सहा उमेदवार बिनविरोध; विकासकामांवर जनतेची मोहर असल्याचा दावा ठाणे: ठाणे-पालघर विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार…