क्राईम

हुंड्यासाठी लग्नाच्या 12 दिवसात नववधूला विष पाजलं; विवाहितेचा मृत्यू

नांदेड: नांदेडमध्ये एका नवविवाहितेचा हुंड्यासाठी बळी गेला. ताऊबाई चव्हाण नावाच्या एका महिलेला तिच्या सासरच्या लोकांनी विष देऊन मारल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत पतीसह सासू-सासऱ्याला अटक केली आहे. लग्नाच्या अवघ्या काही दिवसातच ही धक्कादायक घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हुंड्यात सांगितलेली रक्कम दिली नसल्याने विवाहितेला संपवलं

मुखेड तालुक्यातील वसुर तांडा येथील ताऊबाईचा विवाह २ जुलै रोजी राठोडवाडीच्या सुधाकर राठोडसोबत झाला होता. लग्नात हुंडा म्हणून ठरलेली रक्कम पूर्ण न दिल्याने सासरच्या लोकांनी तिला त्रास देण्यास सुरुवात केली, असा आरोप आहे. ताऊबाईच्या माहेरच्या लोकांनी सांगितलं की, लग्नाच्या वेळी ६ लाख रुपये हुंडा देण्याचं ठरलं होतं. त्यांनी ५ लाख रुपये दिले सुद्धा. मात्र, उर्वरित १ लाख रुपयांसाठी ताऊबाईला विष पाजण्यात आलं.

९ जुलै रोजी ताऊबाईला उलट्या होऊ लागल्या. तिला आधी मुखेडमध्ये आणि नंतर हैदराबादमध्ये उपचारासाठी दाखल केलं. परंतु, १३ जुलै रोजी तिचा मृत्यू झाला.

हुंड्यात कमी दिलेल्या १ लाखासाठी लेकीला मारलं, कुटुंबियांचा आरोप

ताऊबाईच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितलं की, हुंड्यासाठीच तिला विष देऊन मारण्यात आलं. या प्रकरणी मुखेड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत ताऊबाईचा पती, सासू आणि सासरे अशा तिघांना अटक केली आहे. पोलीस अधीक्षक अविनाशकुमार यांनी सांगितलं की, विवाहितेला विष पाजन्यात आलं? का तिने स्वतः विष प्राशन केलं याचा तपास सुरु आहे.

ताऊबाईच्या वडिलांनी कर्ज काढून तिच्या लग्नासाठी पैसे जमा केले होते. मात्र, केवळ एका लाख रुपयांसाठी तिच्या सासरच्या लोकांनी तिचा जीव घेतला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून परिसरात शोक व्यक्त होत आहे. वडिलाने नातेवाईकांकडून हात उसने पैसे घेऊन लेकीचा विवाह केला होता. मात्र एक लाखासाठी सासरच्या मंडळींनी तिचा खून केला असल्याचं ताऊबाईच्या नातेवाईकांनी सांगितलं.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबईत हरवलेली चिमुरडी पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुखरूप परत

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या गजबजलेल्या सबवेमध्ये औरंगाबादहून पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबातील एक ८ वर्षांची…

7 तास ago

प्रश्नपत्रिका लीक प्रकरणावर अ.भा.वि.प.चा संताप; जबाबदारांवर कारवाईची मागणी

मुंबई: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अ.भा.वि.प.) मुंबई महानगराच्या वतीने मुंबई विद्यापीठाच्या TY B.Com (Sem VI)…

7 तास ago

‘आम्ही सैनिक आहोत, खेळणं नाही’! होमगार्डचा आक्रोश; ४० हजार कुटुंबांचा जगण्याचा प्रश्न ऐरणीवर

मुंबई: “आम्ही सैनिक आहोत, खेळणं नाही... आम्हालाही सन्मानाने जगू द्या!” – ही हाक आहे महाराष्ट्रातील…

7 तास ago

साताऱ्याचे एसपी तुषार दोषी यांच्या बदल्यांवर वाद; शिवसेनेची चौकशीची मागणी

मुंबई: सातारा जिल्ह्याचे वादग्रस्त पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या सांगली येथील बदलीनंतर नवा वाद उफाळून…

7 तास ago

एसटी सौर ऊर्जेचा पहिला टप्पा सुरू; २.५७ मेगावॉट ग्रीड सोलर प्रकल्पास मंजुरी

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसस्थानके, कार्यालये, कार्यशाळा आणि आगारांच्या छतांवर सौरऊर्जेच्या माध्यमातून…

7 तास ago

काँग्रेसचे ‘पुतना मावशीचे प्रेम’; महिलांच्या प्रश्नांवर दुटप्पी भूमिका; डॉ. नीलम गोऱ्हे

महिला आरक्षणावर उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांचा काँग्रेस-समाजवादी पक्षावर हल्लाबोल मुंबई: ‘नारीशक्ती वंदन’ विधेयकाबाबत लोकसभेत स्पष्ट…

7 तास ago