मुंबई: विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर बुधवारी (दि. १६ जुलै ) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळखर यांच्यात उडालेल्या शाब्दिक चकमकीचे तीव्र पडसाद गुरूवारी (दि. १७ ) उमटले.
आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख आणि पडळकर यांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले यांच्यात शिवीगाळ झाली आणि त्यानंतर दोन्हीकडील कार्यकर्त्यांमध्ये प्रवेशद्वाराजवळील लॉबीत तुंबळ हाणामारी झाली.
आता काही व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यात पडळकर हे नितीन देशमुख यांच्याकडे पाहून कार्यकर्त्यांना निर्देश देताना दिसल्याचे दिसत आहेत. त्यामुळे पडळकर यांच्यावर संशय व्यक्त केला जात आहे. याबद्दल पडळकर यांना प्रश्न विचारला आहे. ते विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
नितीन देशमुख यांना खुणवून कार्यकर्त्यांना मारायचे आदेश दिले, असा आरोप आव्हाड यांनी केला आहे. याबद्दल विचारल्यावर पडळकर म्हणाले, “नितीन देशमुख हा माझ्या ओळखीचा कार्यकर्ता नाही. माझी लक्षवेधी होती. पण, मंत्री उपस्थित नसल्याने मी निघालो होतो. तेव्हा, तो प्रसंग घडला. मला अजिबात काही बोलायंच नाही.”
“माझी भूमिका व्यक्त केली आहे. अध्यक्षांकडे जाऊन दिलगिरी व्यक्त केली आहे. माझ्या सहकाऱ्यांकडून चूक झाली आहे. तुम्ही कारवाई करावी. त्यामुळे अध्यक्षांच्या अधिकारातील हा कट आहे. संबंधित कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. शेवटी कायदा सर्वश्रेष्ठ आहे. विधानसभा अध्यक्ष आणि सभापतींनी घेतलेली भूमिका त्यावर आमचं कुठलेही मत नाही. आम्ही कायद्याला मानणारे आहोत. जी कारवाई झाली, त्याला कोर्टात सामोरे जाऊ,” असे पडळकर यांनी सांगितलं.
तुम्ही मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांना अडवायला का गेला नाही? असा प्रश्न विचारल्यावर पडळकर यांनी काढता पाय घेण्याा प्रयत्न केला. ‘ठीक आहे..’ एवढंच म्हणत पडळकर यांनी हिंदीत बाईट देण्यास सुरूवात केली. तसेच, पडळकर हे विधिमंडळात निघून गेले.
मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…
नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…
पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…
मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…
पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…
अहिल्यानगर: नदी ही केवळ पाण्याचा प्रवाह नसून ऊर्जा, श्रद्धा आणि सृष्टीचा आधार आहे—आणि म्हणूनच नदी…