नाशिक: नाशिकच्या दिंडोरीत कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात तीन महिला, तीन पुरुष आणि एका बालकाचा मृत्यू झाला आहे. मुलाचा वाढदिवस साजरा करुन कुटुंबीय आपल्या घरी निघाले होती. त्यावेळी धक्कादायक प्रकार घडला.
नाशिकच्या दिंडोरी-वणी रोडवर मध्यरात्री अल्टो कार आणि मोटर सायकलचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात अल्टो कारमधील 7 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर अल्टो कार रस्त्याशेजारील नाल्यात पलटली होती. नाकातोंडात पाणी गेल्याने कारमधील सर्व जणांचा जागीच मृत्यू झाला. तर मोटर सायकलवरील दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीत कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर वनी नाशिक रोडवर अल्टो गाडी क्रमांक mh 04 dy 6642 व एका मोटर सायकलचा अपघात झाला. या अपघातानंतर अल्टो गाडी रस्त्याच्या बाजूच्या पाणी असलेला नाल्यामध्ये पलटी झाली. या अपघातात आल्टो गाडीमधील 1)देविदास पंडित गांगुर्डे, वय 28, 2) मनीषा देविदास गांगुर्डे, वय 23 वर्षे, 3)उत्तम एकनाथ जाधव, वय 42 वर्षे, 4) अल्का उत्तम जाधव, वय 38 वर्षे, 5)दत्तात्रेय नामदेव वाघमारे, वय 45 वर्षे, 6)अनुसया दत्तात्रय वाघमारे, वय 40 वर्षे, 7)भावेश देविदास गांगुर्डे, वय 02 अशी मृतांची नावं आहेत.
तर मोटर सायकलवरील तरुण मंगेश यशवंत कुरघडे वय-25, 2) अजय जगन्नाथ गोंद वय -18 वर्षे जखमी झाले असून पुढील उपचारासाठी सिविल हॉस्पिटल नाशिक येथे दाखल करण्यात आले आहे. यातील अल्टो गाडीतील मृतांचे नातेवाईकाचे मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाकरिता नाशिक येथे गेले होते. ते परत त्यांचे गावी जात असताना हा अपघात झाला. अपघातानंतर अल्टो गाडी रस्त्याच्या बाजूला पाणी असलेल्या नालीमध्ये पलटी झाली होती. यात गाडी लॉक झाली होती. त्यांना बाहेर निघता न आल्याने त्यांच्या नाका-तोंडात पाणी गेलं. तर बुडून सात जणांचा मृत्यू झाल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे.
मुंबई: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम…
मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…
नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…
पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…
मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…
पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…