नागपूर : शहरातील नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिघा आरोपींना ताब्यात घेतले असून त्यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली असून महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता अकरावीमध्ये शिक्षण घेणारी विद्यार्थिनी आहे. मुख्य आरोपी बारावीचा विद्यार्थी असून दोघांचा पूर्वीपासून परिचय होता. आरोपीने यापूर्वी तिच्याशी अश्लील वर्तन केल्याने ती त्याला टाळत होती. मात्र सतत येणाऱ्या संदेशांमुळे तिने अखेर त्याच्याशी बोलण्यास होकार दिला.
५ फेब्रुवारी रोजी आरोपीने तिला घरी भेटण्यासाठी बोलावले. घरात इतर सदस्य असतील, असा समज करून ती त्याच्याकडे गेली. मात्र प्रत्यक्षात घरात आरोपीसह त्याचे दोन अल्पवयीन मित्र उपस्थित होते. बोलण्याच्या बहाण्याने आरोपीने तिला एका खोलीत नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. बाहेर असलेल्या दोघांनी मोबाईलवर व्हिडिओ बनविल्याची धमकी देत तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची भीती दाखवली. या धमकीच्या जोरावर त्यांनीही तिच्यावर अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या घटनेमुळे पीडिता मानसिकदृष्ट्या हादरली होती. अखेर तिने धैर्य एकवटून कुटुंबीयांना संपूर्ण माहिती दिली. त्यानंतर नंदनवन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी त्वरित गुन्हा नोंदवून तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.
मुख्य आरोपीचा बारावीचा पहिला पेपर मंगळवारी होता. मात्र तो पोलिस कोठडीत असल्याने परीक्षेला बसू शकला नाही. दरम्यान, या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर आरोपीच्या वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याची माहिती समोर आली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, नागपूरमध्ये या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पोलिसांनी तपास वेगाने सुरू ठेवत पीडितेला आवश्यक मदत व संरक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे.
आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…
जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…
जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…
पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…
मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…