मुख्य बातम्या

शिरूर तालुक्यात निवडणूक जल्लोषानंतर शांतता अन् चर्चांना उधाण…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात गेल्या तीन महिन्यांपासून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून गावागावांत रात्रंदिवस प्रचार सुरू होता. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अनेक ठिकाणी जेवणाच्या पंगती, देवदर्शन यात्रा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि बैठका घेऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे गावांमध्ये सणासुदीचे वातावरण निर्माण झाले होते.

निवडणूक प्रचाराच्या काळात गावागावांत मोठा जल्लोष पाहायला मिळत होता. कार्यकर्त्यांची लगबग, प्रचारफेऱ्या, सभा आणि घोषणाबाजी यामुळे ग्रामीण भागातील वातावरण पूर्णपणे निवडणूकमय झाले होते. मात्र आता निकाल जाहीर झाल्यानंतर गावांमध्ये पुन्हा शांतता पसरलेली दिसत आहे. नागरिक आपापल्या दैनंदिन कामांमध्ये व्यस्त झाले असून, शेती-व्यवसाय आणि रोजगाराकडे लक्ष देताना दिसत आहेत.

दरम्यान, निवडणुकीचे निकाल आणि त्याचे राजकीय परिणाम यावर गावागावांमध्ये चर्चा रंगू लागल्या आहेत. कोणत्या उमेदवाराला अपेक्षित यश मिळाले, कोणाचे गणित चुकले आणि पुढील राजकीय समीकरणे कशी असतील याबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात आहेत.

मतदानाच्या काळात मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये ऐकायला मिळत आहे. त्यामुळे आगामी यात्रा-जत्रा आणि गावातील सण मोठ्या उत्साहात साजरे केले जाणार असल्याचेही बोलले जात आहे. एकूणच, निवडणुकीच्या गडबडीनंतर आता तालुक्यातील वातावरण शांत झाले असले तरी राजकीय चर्चा आणि सामाजिक हालचालींना वेग कायम असल्याचे चित्र दिसत आहे.

Live Result! शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीचा निकाल…

‘पैसा-जिंकला, माणूस हरला’! ‘दारू-ड्रग्जचा वापर झाला’; पराभवानंतर निर्मला नवले यांचा गंभीर आरोप

रांजणगाव-कारेगाव गटात कमळाचा झंझावात; घड्याळाची टिकटिक बंद…

शिरुर ग्रामीण-न्हावरे गटात घड्याळाची टिकटिक सुरुच; कमळ मात्र कोमेजले,मालती पाचर्णे यांचा निसटता पराभव  

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे बाहेरचे गुंड आणून दहशत करत फोडले जेसीबी मशिन

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…

10 तास ago

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत ॲग्रीबिझनेस अभ्यासक्रम सुरु; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…

16 तास ago

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता

मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…

16 तास ago

शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…

16 तास ago

शिरूर शहरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…

16 तास ago

एसटीचा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…

2 दिवस ago