grampanchayat
शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात गेल्या तीन महिन्यांपासून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून गावागावांत रात्रंदिवस प्रचार सुरू होता. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अनेक ठिकाणी जेवणाच्या पंगती, देवदर्शन यात्रा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि बैठका घेऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे गावांमध्ये सणासुदीचे वातावरण निर्माण झाले होते.
निवडणूक प्रचाराच्या काळात गावागावांत मोठा जल्लोष पाहायला मिळत होता. कार्यकर्त्यांची लगबग, प्रचारफेऱ्या, सभा आणि घोषणाबाजी यामुळे ग्रामीण भागातील वातावरण पूर्णपणे निवडणूकमय झाले होते. मात्र आता निकाल जाहीर झाल्यानंतर गावांमध्ये पुन्हा शांतता पसरलेली दिसत आहे. नागरिक आपापल्या दैनंदिन कामांमध्ये व्यस्त झाले असून, शेती-व्यवसाय आणि रोजगाराकडे लक्ष देताना दिसत आहेत.
दरम्यान, निवडणुकीचे निकाल आणि त्याचे राजकीय परिणाम यावर गावागावांमध्ये चर्चा रंगू लागल्या आहेत. कोणत्या उमेदवाराला अपेक्षित यश मिळाले, कोणाचे गणित चुकले आणि पुढील राजकीय समीकरणे कशी असतील याबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात आहेत.
मतदानाच्या काळात मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये ऐकायला मिळत आहे. त्यामुळे आगामी यात्रा-जत्रा आणि गावातील सण मोठ्या उत्साहात साजरे केले जाणार असल्याचेही बोलले जात आहे. एकूणच, निवडणुकीच्या गडबडीनंतर आता तालुक्यातील वातावरण शांत झाले असले तरी राजकीय चर्चा आणि सामाजिक हालचालींना वेग कायम असल्याचे चित्र दिसत आहे.
Live Result! शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीचा निकाल…
‘पैसा-जिंकला, माणूस हरला’! ‘दारू-ड्रग्जचा वापर झाला’; पराभवानंतर निर्मला नवले यांचा गंभीर आरोप
पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…
आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…
सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…
धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…
लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…
पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…