क्राईम

शिरुरमध्ये दरवाजाचे कुलूप तोडून दागिने व रक्कम लंपास

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर शहरातील रामलिंग रोड येथील रुद्रा कॉलनी मधील एका व्यक्तीच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शिरुर शहरातील रामलिंग रोड येथील रुद्रा कॉलनी येथे राहणारे विलास घोलप हे घराला कुलूप लावून १६ डिसेंबर २०२२ रोजी गावाला गेलेले होते, ३ जानेवारी रोजी सायंकाळ च्या सुमारास घोलप गे गावाहून घरी आले असता त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले असल्याचे आणि कपाट उघडे व घरातील साहित्य अस्थाव्यस्थ पडलेले असल्याचे घोलप यांना दिसून आले. यावेळी घोलप यांनी घरातील कपाटाची पाहणी केली असता कपाटातील दीड तोळा वजनाचे सोन्याचे दागिने आणि रोख 3 हजार रुपये असा ऐवज चोरीला गेला असल्याचे घोलप यांना दिसले.

याबाबत विलास मोतीराम घोलप (वय ४०) रा. शिरुर रामलिंग रोड रुद्रा कॉलनी, साई नगर ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. जवळगा ता. निलंगा जि. लातूर यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिरुर पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक श्रीनाथ जगताप हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

11 तास ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

11 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

11 तास ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

12 तास ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

13 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

13 तास ago