पुणे: पवना धरणाच्या ठाकुरसाई रस्त्यावर दुचाकीवर आलेल्या अनोळखी इसमाने एका महिलेला निर्जन भागात नेऊन बळजबरीने अत्याचार केला. ही हृदयद्रावक घटना 15 जुलै रोजी दुपारी सुमारे दोनच्या सुमारास घडली.
पावसामुळे रस्ता सुनसान होता आणि नेमका याच परिस्थितीचा फायदा घेत आरोपीने अमानुष कृत्य केले. या प्रकरणात लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अवघ्या 24 तासांत आरोपीला अटक करून तत्परतेचे उदाहरण घडवले आहे. पीडित महिला एका डोंगरी भागात राहणाऱ्या कातकरी समाजातील असून, पावसात छत्री घेऊन रस्त्याच्या कडेला एकटी जात असताना आरोपीने तिचा पाठलाग केला. पुढे गाडी आडवी लावून तिला शेताच्या बांधाजवळील झुडपात नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. महिलेनं जीवाच्या आकांताने आरडाओरड केली, पण पावसामुळे कोणीही आसपास नव्हते. आरोपीने कृत्य केल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला.
घाबरलेली महिला थेट आपल्या पतीकडे गेली. पण दुर्दैवाने त्याने तिच्यावरच संशय घेतला आणि घराबाहेर काढले. नाइलाजाने ती आईकडे गेली आणि घटनेची माहिती दिली. त्यानंतर तिने 16 जुलै रोजी लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासाला वेग देण्याचे आदेश दिले. अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी अमोल मांडवे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश शिळीमकर आणि लोणावळा ग्रामीणचे निरीक्षक दिनेश तायडे यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन तपास पथके तयार केली.
विशेष म्हणजे पीडितेच्या मदतीने संशयिताचे रेखाचित्र तयार करण्यात आले. त्या चित्राची मदत घेऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी बाळू दत्तु शिर्के, रा. जिवन नं. 01, ता. मावळ, जि. पुणे, या नराधमाला 17 जुलै रोजी अटक केली.
पोलिसांची ही जलद कारवाई म्हणजे अत्याचार पीडितांसाठी मोठा दिलासा आहे. रेखाचित्र तयार करणाऱ्या अधिकाऱ्याने पीडितेला दिलेला मानसिक आधार, तिला दिलासा देण्याचा प्रयत्न, आणि संपूर्ण टीमने दाखवलेली संवेदनशीलता हे समाजासाठी प्रेरणादायी ठरले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला सहाय्यक निरीक्षक विजया म्हेत्रे करत असून, आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी बारामतीतील मतदारांचे आभार मानत विक्रमी मतदानाबद्दल मानाचा…
कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना मुख्यमंत्री Mamata Banerjee यांनी पहिली प्रतिक्रिया देत…
मुंबई : भोर तालुक्यातील नसरापूर येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला कठोरात कठोर…
मुंबई: काँग्रेस आघाडीच्या काळात शेतकऱ्यांना भरीव मदत मिळत होती, मात्र २०१४ नंतर भाजप सत्तेत आल्यानंतर…
बायपास सर्जरी म्हटले की हातपाय गाळायचे दिवस आता गेले. बायपास केल्यानंतरही योग्य ती काळजी घेऊन…
मुंबई: पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष ने साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर…