क्राईम

नकुशा तांबे आत्महत्या प्रकरण; आरोपी निर्दोष मुक्त, वकिलांच्या संयमशील युक्तिवादाचे कौतुक

शिरूर (अरुणकुमार मोटे): फाकटे (ता. शिरूर) येथील नकुशा अनिल तांबे (वय २५) हिच्या आत्महत्येप्रकरणी तिचे पती अनिल चिंधू तांबे, सासरा चिंधू सिदू तांबे आणि सासू मुक्ताबाई चिंधू तांबे यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. या खटल्याचा निकाल सोमवारी (२१ जुलै २०२५) पुण्यातील एस. जी. जोशी यांच्या न्यायालयात जाहीर करण्यात आला.

नकुशाच्या दुर्दैवी मृत्यूनंतर २० नोव्हेंबर २०१९ रोजी तिचे वडील मालू गोपाळा करगळ यांनी शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद देत तिच्या पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता. त्यानुसार तीनही आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला होता.

या प्रकरणाचा सखोल तपास करून पोलिसांनी दोषारोपपत्र सादर केले होते. खटल्यादरम्यान अनेक साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली आणि त्यांची उलट तपासणीही झाली. न्यायालयीन प्रक्रियेत सर्व पुरावे तपासून घेण्यात आले. यामध्ये बचाव पक्षाच्या वतीने कोर्टात प्रभावी व तर्कशुद्ध युक्तिवाद सादर करण्यात आला.

बचाव पक्षाच्या वकिलांनी युक्तिवाद करताना नमूद केले की, मयत नकुशाला सासरी चांगली वागणूक मिळत होती. तिच्या चारित्र्यावर कुठलाही संशय घेण्याजोगा आधार नव्हता. त्या दिवशी नकुशा विहिरीवर पाणी भरताना अपघाताने तोल जाऊन विहिरीत पडली आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाला. या बाजूला विश्वासार्ह साक्षी व पुरावे जोडले गेले.

विशेष म्हणजे बचाव पक्षाने युक्तिवाद करताना मयत विवाहिता नकुशा तांबे हिच्याविषयी आदरपूर्वक भाष्य केले. कोणताही अपशब्द न वापरता, खटला संयमाने आणि कायद्याच्या चौकटीत रेटून नेण्यात आला. ही बाब न्यायालयीन वर्तुळात विशेष कौतुकास पात्र ठरली.या खटल्यात आरोपींच्या वतीने ॲड. स्वप्नील सातव, ॲड. मयूर करचे, ॲड. मृणाल भोईटे, ॲड. शुभम कावळे, ॲड. तृप्ती पवार, ॲड. तुषार तांदळे यांनी संयुक्तपणे अभ्यासपूर्ण आणि मुद्देसूद युक्तिवाद सादर केला. त्यांच्या संवेदनशील आणि कायदायुक्त युक्तिवादामुळे आरोपी निर्दोष सुटले.

न्यायालयाने स्पष्ट म्हटले की, आरोपींवर आरोप सिद्ध होण्यासाठी आवश्यक ठोस पुरावे सरकारी पक्ष सादर करू शकला नाही. त्यामुळे तिघांनाही निर्दोष मुक्त करण्यात येत आहे.हा निकाल पाच वर्षांच्या प्रदीर्घ न्यायप्रक्रियेनंतर आला असून, यामध्ये वकिलांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. मृत व्यक्तीविषयी आदर राखून चालवलेली न्यायालयीन प्रक्रिया हीच न्यायालयीन सन्मानाची खरी ओळख असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कल्याण वाहतूक कोंडीवर उपाययोजना, सॅटीस प्रकल्पाला गती; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कल्याण: कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कायमची सोडवण्यासाठी सॅटीस (SATIS) प्रकल्पाला गती देण्याचे…

13 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसचा भाजपावर हल्ला; चर्चेसाठी नरेंद्र मोदी यांनाही आणा; प्रणिती शिंदे

मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपावर जोरदार टीका करत सरकारला थेट चर्चेचे आव्हान दिले आहे.…

13 तास ago

मी उपमुख्यमंत्री नाही, भूमिपुत्र म्हणून आलो;  एकनाथ शिंदे

सातारा: “मी उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर या मातीचा भूमिपुत्र म्हणून आलो आहे; जिथे कोणी जात…

13 तास ago

नारी शक्ती वंदन की सत्ता शक्ती वंदन? महिला आरक्षणावरून भाजपवर टीका

मुंबई: महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवरून भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ता ॲड.…

23 तास ago

मुंबई युवक काँग्रेसचा SIR प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न; ‘गिग वर्कर्स न्याय अभियान’ पुस्तिकेचे प्रकाशन

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर…

23 तास ago

मोदींच्या भाषणावर वडेट्टीवारांचा हल्लाबोल; महिला आरक्षणावर भाजपवर ‘इव्हेंटबाजी’चा आरोप

नागपूर: Vijay Wadettiwar यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या कालच्या भाषणावर जोरदार टीका करत ते भाषण…

23 तास ago