सातारा: ऐतिहासिक शाहूनगरीसह संपूर्ण सातारा जिल्ह्यात गांजा, बंटा, एमडी गोळ्या तसेच इतर अंमली पदार्थ आणि गुटखा विक्री राजरोसपणे सुरू असल्याचा आरोप करत संबंधितांवर तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी रक्षक प्रतिष्ठानने केली आहे. यासंदर्भात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना निवेदन सादर केले. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
रक्षक प्रतिष्ठानने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरी तसेच ग्रामीण भागात अल्पवयीन मुले गांजा व इतर अंमली पदार्थांचे सेवन करताना आढळत असून त्यामुळे गुन्हेगारी घटनांत वाढ होत असल्याची गंभीर चिंता निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील विविध भागांत खुलेआम गुटखा विक्री सुरू असल्याचा दावा करण्यात आला असून यासंदर्भातील काही व्हिडिओ पुरावे कार्यकर्त्यांकडे उपलब्ध असल्याचे संस्थापक अध्यक्ष सुशील मोझर यांनी सांगितले.
देशाची भावी पिढी असलेल्या शालेय विद्यार्थ्यांमध्ये गांजा, बंटा, एमडी गोळ्या आणि इतर नशेच्या पदार्थांचे आकर्षण वाढत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. बंदी असलेले पदार्थ सहज उपलब्ध होत असल्याने युवकांसह अल्पवयीन मुले नशेच्या विळख्यात अडकत असल्याबद्दल संस्थेने तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
बाजारपेठांमध्ये सर्रास अंमली पदार्थांची विक्री होत असताना पोलिसांकडून ठोस कारवाई का होत नाही, असा सवालही रक्षक प्रतिष्ठानने उपस्थित केला आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना माहिती मिळत असेल तर संबंधित यंत्रणांना ती का मिळत नाही, असा प्रश्न विचारत जिल्ह्यात विशेष मोहीम राबवून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील करडे परिसरात अवघ्या दिड महिन्याच्या कालावधीत गोळीबाराच्या दोन…
दौंड: घरातून रुसून आंध्र प्रदेशातील रेणुगुंठा रेल्वे स्थानकावरून मदुराई–मुंबई एक्स्प्रेसमध्ये बसून निघालेल्या पवन भाटी या…
सराईत गुन्हेगारांचा गावात सशस्त्र धुडगूस; प्रतिबंधक कारवाया कागदावरच राहिल्या का...? शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत असतानाच करडे गावात घडलेल्या गोळीबाराच्या…
बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…
मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…