सातारा: ऐतिहासिक शाहूनगरीसह संपूर्ण सातारा जिल्ह्यात गांजा, बंटा, एमडी गोळ्या तसेच इतर अंमली पदार्थ आणि गुटखा विक्री राजरोसपणे सुरू असल्याचा आरोप करत संबंधितांवर तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी रक्षक प्रतिष्ठानने केली आहे. यासंदर्भात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना निवेदन सादर केले. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
रक्षक प्रतिष्ठानने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरी तसेच ग्रामीण भागात अल्पवयीन मुले गांजा व इतर अंमली पदार्थांचे सेवन करताना आढळत असून त्यामुळे गुन्हेगारी घटनांत वाढ होत असल्याची गंभीर चिंता निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील विविध भागांत खुलेआम गुटखा विक्री सुरू असल्याचा दावा करण्यात आला असून यासंदर्भातील काही व्हिडिओ पुरावे कार्यकर्त्यांकडे उपलब्ध असल्याचे संस्थापक अध्यक्ष सुशील मोझर यांनी सांगितले.
देशाची भावी पिढी असलेल्या शालेय विद्यार्थ्यांमध्ये गांजा, बंटा, एमडी गोळ्या आणि इतर नशेच्या पदार्थांचे आकर्षण वाढत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. बंदी असलेले पदार्थ सहज उपलब्ध होत असल्याने युवकांसह अल्पवयीन मुले नशेच्या विळख्यात अडकत असल्याबद्दल संस्थेने तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
बाजारपेठांमध्ये सर्रास अंमली पदार्थांची विक्री होत असताना पोलिसांकडून ठोस कारवाई का होत नाही, असा सवालही रक्षक प्रतिष्ठानने उपस्थित केला आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना माहिती मिळत असेल तर संबंधित यंत्रणांना ती का मिळत नाही, असा प्रश्न विचारत जिल्ह्यात विशेष मोहीम राबवून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…
मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…
मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…
मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…
मुंबई: राज्यातील वाढत्या ड्रग्ज प्रकरणांवरून काँग्रेसने महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन…