नवी मुंबईतील वाशी येथील धक्कादायक घटना, आरोपी अटकेत
मुंबई: नवी मुंबईतील वाशी परिसरात वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना स्वतःला डॉक्टर म्हणून भासवून उपचार करणाऱ्या एका वॉर्डबॉयच्या चुकीच्या इंजेक्शनमुळे प्रचिती भिकुराम भुवड (वय 21) या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना 5 फेब्रुवारी रोजी घडली असून वाशी पोलिसांनी आरोपी संदेश पाष्टे (वय 30) याला अटक केली आहे.
वॉर्डबॉयचा डॉक्टर म्हणून वावर
आरोपी संदेश पाष्टे हा मूळचा मानखुर्द येथील रहिवासी असून तो अंधेरीतील एका नर्सिंग होममध्ये केवळ वॉर्डबॉय म्हणून काम करत होता. मात्र मानखुर्द आणि आसपासच्या परिसरात तो स्वतःची ओळख ‘डॉक्टर’ म्हणून करून रुग्णांवर उपचार करत असल्याचे तपासात उघड झाले आहे.
नेमकी घटना काय?
प्रचिती भुवड हिला हार्मोनल आजार असल्याने तिच्या वडिलांनी ओळखीच्या माध्यमातून संदेश पाष्टेला उपचारासाठी घरी बोलावले होते. 5 फेब्रुवारी रोजी पाष्टेने प्रचितीला घरी येऊन पहिले इंजेक्शन दिले. त्यानंतर तिची प्रकृती बिघडू लागल्याने त्याने दुसरे इंजेक्शन टोचले. मात्र दुसऱ्या इंजेक्शननंतर काही वेळातच प्रचितीची तब्येत अधिकच खालावली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.
धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने या उपचारासाठी कुटुंबाकडून तब्बल 15 हजार रुपये फी घेतली होती. प्रत्यक्षात अशा इंजेक्शनची बाजारातील किंमत केवळ 500 ते 1000 रुपयांदरम्यान असल्याचे तपासात समोर आले आहे.
आरोपीला बेड्या
मुलीचा मृत्यू संशयास्पद वाटल्याने प्रचितीचे वडील भिकुराम भुवड यांनी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी 6 फेब्रुवारी रोजी आरोपी संदेश पाष्टेला अटक केली.प्रचितीला नेमकी कोणती औषधे आणि इंजेक्शन देण्यात आली, याचा तपास सुरू असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
पोलिसांचे आवाहन
नागरिकांनी उपचार घेताना संबंधित व्यक्तीची वैद्यकीय पदवी, नोंदणी आणि पात्रतेची खात्री करून घ्यावी, असे आवाहन वाशी पोलिसांकडून करण्यात आले आहे.
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…
नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…