मुलगा-सून भाजपचे, मुली ZP मध्ये विजयी
पुणे: वडगाव शेरीचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार बापूसाहेब पठारे यांच्या कुटुंबातील राजकीय समीकरणांनी राज्याच्या राजकारणात नवा ‘पठारे पॅटर्न’ तयार केला आहे. एकाच घरातून राष्ट्रवादी आणि भाजप या दोन प्रमुख पक्षांचे प्रतिनिधी निवडून आल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
बापूसाहेब पठारे स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार आहेत. 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. तुतारी चिन्हावर निवडणूक लढवत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे यांचा पराभव केला होता.
मात्र, त्यानंतर अवघ्या वर्षभरातच त्यांचे पुत्र सुरेंद्र पठारे आणि सून ऐश्वर्या पठारे यांनी भाजपची वाट धरत नगरसेवकपदाची निवडणूक लढवली. मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत दोघेही भाजपचे नगरसेवक झाले.
आता जिल्हा परिषद निवडणुकीत बापूसाहेब पठारे यांच्या दोन्ही मुलींनीही विजय मिळवला आहे. त्यांची मुलगी रुपाली अमोल झेंडे या पुरंदर तालुक्यातील ‘दिवे गराडे’ गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून विजयी झाल्या आहेत. रुपाली झेंडे या आयपीएस अधिकारी अमोल झेंडे यांच्या पत्नी आहेत.
तर दुसरी मुलगी दिपाली राहुल गव्हाणे या शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे–रांजणगाव सांडस जिल्हा परिषद गटातून भाजपकडून निवडणूक लढवत विजयी झाल्या आहेत. दिपाली गव्हाणे सध्या डिंग्रजवाडी ग्रामपंचायतीच्या सदस्या असून त्यांचे पती राहुल गव्हाणे हे उद्योजक आहेत.
थोडक्यात, एकाच घरात आमदार, नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य — तेही वेगवेगळ्या पक्षांचे — अशी दुर्मिळ राजकीय परिस्थिती पाहायला मिळत आहे. बापूसाहेब पठारे राष्ट्रवादीत, मुलगा-सून भाजपमध्ये आणि दोन्ही मुली राष्ट्रवादी व भाजपकडून विजयी झाल्याने ‘पठारे पॅटर्न’ची चर्चा सध्या संपूर्ण राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहे.
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…
नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…