मुंबई: भारतीय युवा संघाने शुक्रवारी इंग्लंडला १९ वर्षांखालील वर्ल्ड कप २०२६ च्या अंतिम सामन्यात १०० धावांनी पराभूत करत इतिहास रचला. या विजयामुळे भारताने सहाव्यांदा १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे, तर संघाचा कर्णधार आयुष म्हात्रे आता मोहम्मद कैफ, विराट कोहली यांच्यासारख्या महान कर्णधारांच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे.
मुंबईच्या विरार येथील १८ वर्षीय आयुषने लहानपणापासूनच क्रिकेटमध्ये आपली वेगळी छाप पाडली आहे. त्याला मुंबईतील क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांच्याकडून मार्गदर्शन मिळाले, ज्यांनी रोहित शर्मा, शार्दुल ठाकूर यांसारख्या खेळाडूंनाही प्रशिक्षित केले आहे.
आयुषने २०२४ मध्ये मुंबईसाठी वरिष्ठ स्तरावर प्रथम श्रेणी, लिस्ट ए आणि टी२० क्रिकेट खेळण्याची संधी मिळवली. त्याच्या प्रतिभेमुळे चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल २०२५ मध्ये दुखापतग्रस्त ऋतुराज गायकवाडच्या जागी तो संघात सामील केला. तो चेन्नई संघातील सर्वात लहान खेळाडू आहे.
वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत आयुषच्या नेतृत्वाखाली भारताचा युवा संघ एकही सामना हरला नाही. फलंदाजीस सुरुवातीला फार मोठ्या धावांना पोहोचू शकला नाही, तरी उपांत्य फेरीत अफगाणिस्तानविरुद्ध ६२ आणि अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध ५३ धावा केल्या. गोलंदाजीमध्येही त्याने चमक दाखवली आणि ५ डावांत ७ विकेट्स घेतल्या.
आयुष हा भारताचा सहावा १९ वर्षांखालील विश्वविजेता कर्णधार ठरला आहे. भारताने आतापर्यंत २०००, २००८, २०१२, २०१८, २०२२ आणि २०२६ या सहा वर्षांत १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे, प्रत्येक वेळी वेगळ्या कर्णधाराखाली.
आयुष म्हात्रेची वरिष्ठ कारकिर्द:
प्रथम श्रेणी: १३ सामने, २ शतके, २ अर्धशतक, ६६० धावा
लिस्ट ए: ७ सामने, २ शतके, १ अर्धशतक, ४५८ धावा
टी२०: १३ सामने, २ शतके, २ अर्धशतक, ५६५ धावा
रोहित शर्माला आदर्श मानणारा आयुष, भारतीय युवा संघाचा भविष्यातील चमकता तारा म्हणून ओळखला जात आहे.
शिंदोडी (तेजस फडके) शिंदोडी, ता. शिंदोडी येथील घोड धरणाच्या पात्रातुन शेतीच्या नावाखाली काळ्या मातीचा उपसा…
शिंदोडी (तेजस फडके) निमोणे (ता. शिरुर) येथे घोडनदीच्या पात्रातील पाण्याच्या बांधावरुन झालेल्या वादाचे रुपांतर थेट…
मुंबई: राज्यातील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डिजिटल तंत्रज्ञानाचे आधुनिक प्रशिक्षण देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग…
मुंबई: महाराष्ट्रात मान्सूनच्या प्रगतीला झालेल्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते जय पवार यांनी मुंबईतील प्रादेशिक…
शिवसेनेच्या हिरक महोत्सवी वर्धापन दिन सोहळ्यात शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल; विधान परिषदेत महायुती सर्व १७ जागा…
नाशिक: केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्ग रद्द करून तो नाशिक–शिर्डी–अहिल्यानगर मार्गे नेण्याची…