मुंबई: भारतीय युवा संघाने शुक्रवारी इंग्लंडला १९ वर्षांखालील वर्ल्ड कप २०२६ च्या अंतिम सामन्यात १०० धावांनी पराभूत करत इतिहास रचला. या विजयामुळे भारताने सहाव्यांदा १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे, तर संघाचा कर्णधार आयुष म्हात्रे आता मोहम्मद कैफ, विराट कोहली यांच्यासारख्या महान कर्णधारांच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे.
मुंबईच्या विरार येथील १८ वर्षीय आयुषने लहानपणापासूनच क्रिकेटमध्ये आपली वेगळी छाप पाडली आहे. त्याला मुंबईतील क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांच्याकडून मार्गदर्शन मिळाले, ज्यांनी रोहित शर्मा, शार्दुल ठाकूर यांसारख्या खेळाडूंनाही प्रशिक्षित केले आहे.
आयुषने २०२४ मध्ये मुंबईसाठी वरिष्ठ स्तरावर प्रथम श्रेणी, लिस्ट ए आणि टी२० क्रिकेट खेळण्याची संधी मिळवली. त्याच्या प्रतिभेमुळे चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल २०२५ मध्ये दुखापतग्रस्त ऋतुराज गायकवाडच्या जागी तो संघात सामील केला. तो चेन्नई संघातील सर्वात लहान खेळाडू आहे.
वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत आयुषच्या नेतृत्वाखाली भारताचा युवा संघ एकही सामना हरला नाही. फलंदाजीस सुरुवातीला फार मोठ्या धावांना पोहोचू शकला नाही, तरी उपांत्य फेरीत अफगाणिस्तानविरुद्ध ६२ आणि अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध ५३ धावा केल्या. गोलंदाजीमध्येही त्याने चमक दाखवली आणि ५ डावांत ७ विकेट्स घेतल्या.
आयुष हा भारताचा सहावा १९ वर्षांखालील विश्वविजेता कर्णधार ठरला आहे. भारताने आतापर्यंत २०००, २००८, २०१२, २०१८, २०२२ आणि २०२६ या सहा वर्षांत १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे, प्रत्येक वेळी वेगळ्या कर्णधाराखाली.
आयुष म्हात्रेची वरिष्ठ कारकिर्द:
प्रथम श्रेणी: १३ सामने, २ शतके, २ अर्धशतक, ६६० धावा
लिस्ट ए: ७ सामने, २ शतके, १ अर्धशतक, ४५८ धावा
टी२०: १३ सामने, २ शतके, २ अर्धशतक, ५६५ धावा
रोहित शर्माला आदर्श मानणारा आयुष, भारतीय युवा संघाचा भविष्यातील चमकता तारा म्हणून ओळखला जात आहे.
१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…
मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा…
मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार…
ठाणे: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात भारतातही पंतप्रधान Narendra Modi यांच्यावर…
मुंबई: राज्यात वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांबाबत करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या…
शिरूरमध्ये कामाठीपुरा येथील आश्रमशाळेत खळबळ; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथील कामाठीपुरा…