समृद्धी महामार्ग की अपघातांचा सापळा…
औरंगाबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 डिसेंबर 2022 रोजी नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केले होते. हा महामार्ग सुरु होऊन आज 100 दिवस झाले. या कालावधीत महामार्गावर छोटे मोठे 900 अपघात झाले तर या अपघातामध्ये 31 नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले.
धक्कदायक बाब म्हणजे 46 टक्के अपघात हे मेकँनिक ब्रेक डाऊन झाल्यामुळे झाल्याचं समोर आले आहे. तर 15 टक्के अपघात टायर पंक्चरमुळे झाल्यामुळे झाले. तर 12 टक्के अपघात टायर फुटल्याने झाले आहेत. तर काही अपघातामध्ये वन्यप्राण्यांनाही दुखापत झाली आहे. बहुतांश वन्यप्राण्यांना वाहनाची धडक लागल्याने त्यांचा जीवही गेला आहे. त्यामुळे या महामार्गावरील वन्यप्राण्यांचा वावरबाबत निर्णय घेण्याची गरज आहे.
अपघात टाळण्यासाठी काय करायला हवं?
1) वेगाचे उल्लंघन करणार्या ,लेन शिस्त न पळणार्या, टायर बाबत माहिती साठी वाहन चालकासाठी 8 ठिकाणी समुपदेशन केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.
2) रस्ता सुरक्षा बाबत माहिती देणारे फलक अधिक प्रमाणात लावणे
3) सर्वे टोल नाक्यावर PA system सुरू करणे करणे
4) truck चालकांची विश्रांतीची पार्किंग ची व्यवस्था निर्माण करणे
दुचाकीचा वावर…
समृद्धी महामार्गावर दुचाकीस्वार यांना परवानगी देण्यात आलेली नाही. मोठ्या गाड्यांच्या वेग पाहता या महामार्गावर दुचाकी चालवण्यास बंदी आहे. मात्र असे असतांना देखील या महामार्गावर अनेक ठिकाणी दुचाकीस्वार प्रवास करतांना पाहायला मिळत आहे. त्यामुळे देखील अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. अचानक दुचाकी समोर आल्यावर वेगावर नियंत्रण मिळवणे अवघड होत असल्याची तक्रारी देखील समोर येत आहेत.
शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) पुणे-नगर महामार्गावर अपघातांची मालिका काही केल्या थांबत नसुन शिक्रापुर (ता. शिरुर) येथील…
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…
मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…
मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…
मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…