निवडणूक पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांची ठोस कारवाई
शिरूर (अरुणकुमार मोटे): आगामी परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका,स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक शांततेत, भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात, यासाठी पुणे ग्रामीण पोलीस दलाने गुन्हेगारीविरोधात कडक पावले उचलली आहेत. त्याच अनुषंगाने शिरूर तालुक्यातील सराईत व धोकादायक इसमाला महाराष्ट्र प्रतिबंधक नजरकैद कायदा (एम.पी.डी.ए.) अंतर्गत कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणारे, वाळू तस्कर, महिलांविरोधातील गुन्हे करणारे, सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा आणणारे तसेच सराईत गुन्हेगारांविरुद्ध विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. याच मोहिमेअंतर्गत शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतील गोलेगाव येथील रहिवासी दिपक बबन गुंजाळ (वय ३३) याच्यावर एम.पी.डी.ए. अंतर्गत कारवाई करण्यात आली.
सदर व्यक्तीविरुद्ध यापूर्वी बेकायदेशीर अग्नीशस्त्र बाळगणे, संगनमत करून घातक हत्यारांनी मारहाण करणे, जबर दुखापत पोहोचवणे, शिवीगाळ व दमदाटी करणे अशा स्वरूपाचे तीन गंभीर गुन्हे दाखल होते. तो सराईत व धोकादायक असल्याने शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी त्याच्याविरुद्ध एम.पी.डी.ए. अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांकडे सादर केला होता.
या प्रस्तावाचे परीक्षण करून पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी तो पुढील कार्यवाहीसाठी पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे पाठविला. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पुणे जितेंद्र डुडी यांनी सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ नये, या दृष्टीने एम.पी.डी.ए. कायदा १९८१ (सुधारित अधिनियम २०२५) अन्वये दिपक गुंजाळ याला स्थानबद्ध करण्याचा आदेश पारित केला.
जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये शिरूर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या स्वतंत्र पथकांनी संयुक्त कारवाई करत दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी दिपक गुंजाळ यास ताब्यात घेऊन मध्यवर्ती कारागृह, नागपूर येथे दाखल केले. त्यामुळे शिरूर शहर व तालुक्यात गुन्हेगारी प्रवृत्तीवर मोठा आळा बसला असून नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.
ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अधिकारी-अंमलदारांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा कठोर कारवायांमुळे गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शिरूर तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस दल कटिबद्ध असल्याचा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.
मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि नाशिक कुंभमेळ्यानिमित्त तपोवन विकासासाठी आर्थिक…
नागपूर: महायुती सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही सरसकट नसून अनेक जाचक अटी-शर्तींनी युक्त असल्याने…
मुंबई: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत निर्माता…
मुंबई: "नेत्रदान हे मानवतेचे श्रेष्ठदान असून एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दृष्टीहीनांच्या आयुष्यात नवी पहाट निर्माण होऊ…
षण्मुखानंद सभागृहात दुपारी २ वाजता होणार कार्यक्रम; संघटन विस्ताराला प्राधान्य मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १०…
मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अर्थशास्त्र विभाग आणि ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस यांच्या संयुक्त…