मुख्य बातम्या

स्थगिती आदेश असूनही बांधकाम सुरूच; प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली

नगरपरिषद व बांधकाम व्यावसायिकांचे साटेलोटे उघड

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील बहुचर्चित आणि वादग्रस्त अशा शिरूर-गोलेगाव रोडवरील माव्र्हल एम्पायर सोसायटीमध्ये सुरू असलेल्या बांधकामाने नव्या वादाला तोंड फोडले आहे. गट नं. ३०९/१ या ठिकाणी तब्बल २ हेक्टर ४८ गुंठे जमिनीवर सुरू असलेल्या बांधकामावर प्रांताधिकारी पूनम अहिरे यांनी थेट स्थगिती आदेश दिला असतानाही, बांधकाम बेधडकपणे सुरूच ठेवण्यात येत आहे. विशेष म्हणजे या जमिनीवर न्यायालयीन दावा सुरु असूनही ५० पेक्षा अधिक प्लॉट्स विकले गेले आहेत, आणि हे सगळं सुरू आहे प्रशासनाच्या आदेशाच्या पूर्णतः विरोधात.

या संदर्भात तक्रारदार परशुराम पाचर्णे यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, नगरपरिषद आणि बांधकाम व्यावसायिकांनी प्रांतअधिकाऱ्यांच्या आदेशाला पूर्णतः दुर्लक्ष केले असून, नगरपरिषद ही या सगळ्या गैरप्रकारात सहभागी असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. त्यांनी ही जमीन नियमबाह्य पद्धतीने बिनशेतीमध्ये रूपांतरित झाल्याचा ठोस आरोप करत, याविरोधात अपील दाखल केले होते. यावर प्रांताधिकारी अहिरे यांनी “पुढील आदेश येईपर्यंत सर्व प्रकारचे कामकाज थांबवावे,” असा स्पष्ट स्थगनादेश जारी केला होता.

पाचर्णे यांनी पुढे सांगितले की, मंजूर ले-आऊटनुसार आयताकृती किंवा चौकोनी ओपन स्पेस राखणे बंधनकारक असताना येथे त्रिकोणी ओपन स्पेस दाखवण्यात आली. त्याचप्रमाणे, १५% अमिनिटी स्पेस देणे आवश्यक असताना केवळ ५% जागा दाखवण्यात आली, म्हणजेच बिनधास्त नियम धाब्यावर बसवले गेले. इतक्यावरच न थांबता नगरपरिषद अभियंता आणि मुख्याधिकारी यांनी चुकीच्या नकाशाला मंजुरी दिली, हे या सगळ्या प्रकरणातील गांभीर्य अधिकच वाढवणारे आहे.

तहसिल कार्यालयाने या वादग्रस्त ले-आऊटनुसार बिनशेती आदेश दिला आणि भूअभिलेख विभागाने पोटहिस्से करून ७/१२ उताऱ्यावर नोंदी घेतल्या. या प्रकारामुळे सारा दस्तऐवजच संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी अहिरे यांनी तहसिलदार व मुख्याधिकारी यांना सर्व संबंधित कागदपत्रांची सखोल पडताळणी करून लेखी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

या प्रकारामुळे अनेक नागरिकांची फसवणूक झाली असून त्यांनी एन.ए. ऑर्डर आणि अधिकृत ले-आऊटची प्रत मिळवलेलीच नाही, हे अधिक धक्कादायक बाब आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिक आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडले आहेत.

या प्रकरणात नगरपरिषद, तहसिल कार्यालय आणि भूअभिलेख विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट संकेत मिळत असून, लवकरच अनेक बड्या अधिकाऱ्यांवर कारवाईची शक्यता निर्माण झाली आहे. नागरिकांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोरदार केली असून, प्रकरणाचा तपास स्वतंत्र एजन्सीकडून करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.या पार्श्वभूमीवर न्याय मिळण्याच्या आशा पुन्हा पल्लवित होत असून, प्रशासनावर जनतेचा विश्वास पुन्हा निर्माण होईल का, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

दिवंगत अजितदादा पवारांना अभिवादन; विधानमंडळाची स्मृतीपत्रे सुनेत्रा अजित पवार यांच्या स्वाधीन.

बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…

3 तास ago

२०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य; ‘देवगिरी ते देवराई’ अभियानाचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…

3 तास ago

पिंपळे जगतापच्या पाषाण तलावात तरुणाचा मृतदेह; LCB सह विविध तपास पथके घटनास्थळी

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील पाषाण तलावात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून…

3 तास ago

‘ईशान सेतू’ने महाराष्ट्र-ईशान्य भारत जोडला; मणिपूरमध्ये सिद्धिविनायकाची प्रतिकृती उभारणार; एकनाथ शिंदे

ईशान्य भारतातील भाषांमध्ये रामायण, गीता, हनुमान चालीसाचे प्रकाशन; पवित्र ग्रंथांच्या मोफत वितरणाचा खर्च उचलण्याची शिंदेंची…

3 तास ago

मोदींनी सोनम वांगचुकांची भेट का घेतली नाही?; राम मंदिर चोरीवर भाजप-आरएसएसवर सपकाळांचा हल्लाबोल

मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केंद्र सरकार, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक…

3 तास ago

मोदींकडून बारामतीच्या नव्या रेल्वे स्थानकाचे लोकार्पण; पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला मिळाली नवी गती

बारामती : अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील ७५ आणि महाराष्ट्रातील बारामती व नांदुरा या दोन…

3 तास ago