आरोग्य

कोलेस्ट्रॉल नेहमीच कंट्रोलमध्ये ठेवणारे ६ पदार्थ- नियमितपणे खा आणि कोलेस्ट्रॉल वाढण्याचं टेन्शन विसरा

बैठ्या कामाचे वाढलेले तास, व्यायामाचा अभाव, स्ट्रेस, चुकीची आहारपद्धती या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम कोलेस्ट्रॉल वाढण्यावर होते. अनेकदा अनुवंशिकताही कोलेस्ट्रॉल वाढीसाठी कारणीभूत ठरते.

कोलेस्ट्रॉल वाढीचा संबंध थेट हृदयाशी. त्यामुळे ते कंट्रोलमध्ये ठेवणं अतिशय आवश्यक आहे. म्हणूनच आता असे काही पदार्थ पाहूया जे नियमितपणे खाल्ल्यास कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यास मदत होते.

यापैकी सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे बदाम. व्हिटॅमिन ई, ॲण्टीऑक्सिडंट्स, इसेंशियल ऑईल यांनी परिपूर्ण असलेले बदाम हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम आहेत. ६ ते ८ तास पाण्यात भिजवलेले आणि टरफलं काढून टाकलेले बदाम खाणं अधिक फायदेशीर.

दुसरं म्हणजे अक्रोड. प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, ओमेगा ३ फॅटी ॲसिड असणारे अक्रोड पाण्यात किंवा दुधात ६ ते ८ तास भिजत घालावेत आणि त्यानंतर खावेत. स्ट्रेस लेव्हल कमी करून मानसिकदृष्ट्या स्ट्राँग होण्यासाठीही अक्रोड फायदेशीर ठरतात.

चिया सिड्समध्येही हृदय आणि मेंदू या दोन्हींसाठी उपयुक्त ठरणारे ओमेगा ३ फॅटी ॲसिड असते. मधुमेह असणाऱ्यांसाठीही चिया सिड्स फायदेशीर ठरतात. कारण त्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो.

ओट्समध्ये असणारे सोल्यूबल फायबर बॅड कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्यास मदत करतात.

व्हिटॅमिन, मिनरल्स, प्रोटिन्स आणि नॅचरल ग्लुकोज असणारे खजूर खाणंही हृदयासाठी उपयुक्त आहे.

कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी ६ ते ८ तास पाण्यात भिजवलेल्या मनुका खाव्या.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पनवेलमध्ये ९ दिवसीय मोफत अभिनय प्रशिक्षण शिबिर; नोंदणी ५ मेपर्यंत

पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…

1 मिनिट ago

तेलंगणात एसटी विलीनीकरणाचा ऐतिहासिक निर्णय; महाराष्ट्र सरकारवर काँग्रेसची टीका

मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…

4 मिनिटे ago

VSI चे शिष्टमंडळ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर; संशोधन सहकार्याचा नवा मार्ग खुला होणार

पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…

2 तास ago

जन्मभूमीतून कर्मभूमीकडे! गोदा ते नर्मदा जलयात्रा; नारीशक्ती आणि विकासाचा नवा महामंत्र

अहिल्यानगर: नदी ही केवळ पाण्याचा प्रवाह नसून ऊर्जा, श्रद्धा आणि सृष्टीचा आधार आहे—आणि म्हणूनच नदी…

3 तास ago

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानावरून काँग्रेस आक्रमक

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यावरून राज्यातील राजकारण तापले असून, महाराष्ट्र प्रदेश…

3 तास ago

गोंधळ’ चित्रपटाचा प्रयोग हाऊसफुल

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत शुक्रवारी…

3 तास ago