मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यात अतिरिक्त भारनियमनाने बळीराजा संकटात पिकांची होरपळ

शिरुर (तेजस फडके): सध्या उन्हाच्या झळांनी सर्वच पिकांची अवस्था केविलवाणी झालेली असुन विजेच्या अतिरिक्त भारनियमनाचाही फटका या पिकांना बसत आहे. पाणी असूनही भारनियमनामुळे पिकांची तहान भागवणे अवघड झाले असून, शेतातील पिकांची होरपळ होण्यापूर्वी वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शेतकरी करत आहेत.

शिरसगाव काटा, आलेगाव पागा, मांडवगण फराटा, न्हावरे येथील वीज उपकेंद्रांना शिरूर तालुक्यातील कुरुळी वीज केंद्रातून वीजपुरवठा होतो. काही दिवसांपासून विजेची मागणी वाढल्याने महावितरणकडून अचानक अतिरिक्त भारनियमन केले जात आहे. सध्या कडक उन्हाळ्यात पिकांची अवस्था बिकट असून, पाणी दिल्यानंतरही पिके कोमेजून जातात. अशा अवस्थेत शेतीपंपाना दिवसातून दोन तीन तास वीजपुरवठा होत आहे. त्यात – विजेच्या तांत्रिक अडचणी, लपंडावामुळे पिकांची तहान भागवणे अवघड झाले आहे. परिणामी, चारा पिके, ऊस, मका, मल्चिंगचा वापर करून घेतलेल्या टोमॅटो, कलिंगड, मिरची या पिकांची अवस्था केविलवाणी झाली आहे. महावितरणच्या संबंधित अधिका-यांना ही वीज कधी जाणार कधी येणार याची कल्पना नसल्याचे अधिकारी, कर्मचारी सांगतात. परिणामी, शेतकरी तीव्र संताप व्यक्त करत आहेत.

अस्मानी संकटाशी दोन हात करून पिकवलेल्या शेतमालाला अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने बळीराजा त्रस्त झाला आहे. आता विजेचा तुडवडा निर्माण होऊन उभ्या राहिलेल्या सुलतानी संकटांना तोंड देता देता बळीराजा अक्षरक्ष: मेटाकुटीला आला आहे. उभी पिके करपून गेल्यावर वीजपुरवठा सुरळीत करणार का, असा संताप शेतकरी व्यक्त करत आहेत.

एकीकडे शेतकरी दिवसा विजेची मागणी करत असताना विजेच्या संकटाने ऐन उन्हाळ्यात बळीराजाच्या समस्या तीव्र केल्या आहेत.पिकांना पाण्याच्या टंचाईने उत्पादनावर परिणाम होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न घटणार आहे. परिणामी, शेतकऱ्यांचे आर्थिक संकट गडद होणार आहे.शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात अनेक ठिकाणी अजूनही पाणीटंचाई जाणवत नसून पाणी असूनही वीज पुरवठा नियमित होत नसल्याने शेतकऱ्यांची कुचंबना होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

वाघाळे येथे अक्षय तृतीयेनिमित्त कृषी पूजनाने संस्कृतीचा जागर; बैलगाडीची भव्य शोभायात्रा…

शिरूर : शिरूर तालुक्यातील वाघाळे येथे १९ तारखेला पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या प्रेरणेतून कार्यरत स्वाध्याय…

6 मिनिटे ago

वाघोलीत घडली हृदयद्रावक घटना; उच्चशिक्षित महिलेने संपवलं आयुष्य…

वाघोली : वाघोलीतील 'रविनंदा कॉयलाईट' सोसायटीत एक हृदयद्रावक घटना घडली आहे. माहेरहून १० लाख रुपये…

35 मिनिटे ago

शिरुर; अरणगावच्या निकिताचा संघर्ष यशस्वी; मुंबई लोहमार्ग पोलीस दलात नियुक्ती

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील अरणगाव येथील अत्यंत गरीब कुटुंबातील निकिता संतोष मखर हिने जिद्द,…

23 तास ago

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

2 दिवस ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

2 दिवस ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

2 दिवस ago