मुख्य बातम्या

कोंढण ओढा पुलावर धोका कायम; दुरुस्तीच्या प्रतीक्षेत शिरूर-पाबळ रस्ता

सार्वजनिक बांधकाम विभागाचा ढिसाळ कारभार, सामाजिक कार्यकर्त्यांचा संतप्त इशारा

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर ते कोंढणओढ्यापर्यंत शिरूर सार्वजनिक बांधकाम विभागाने मातीमिश्रित मुरूम टाकून फक्त तात्पुरती मलमपट्टी केली असून आस्थाव्यस्थ पसरलेल्या मुरमामुळे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.तसेच शिरूर–पाबळ रस्त्यावरील कोंढण ओढ्याच्या पूलावरील रस्ता गेल्या अनेक महिन्यांपासून धोकादायक स्थितीत असूनही संपुर्ण दुरुस्तीचे काम सुरू झालेले नाही. शिरूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत येणाऱ्या या पुलाच्या दुरुस्तीसाठी आजवर मुहूर्तही मिळालेला नाही, हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे करत आहे.

मुळात हा पूल प्रवाहाची दिशा बदलून चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आला असल्याची तक्रार सुरुवातीपासूनच करण्यात येत होती. या गंभीर अनियमिततेविरोधात सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी काही महिन्यांपूर्वी उपोषण करून आंदोलनाचा मार्ग अवलंबला होता. मात्र, त्यानंतर दक्षता गुणनियंत्रण समितीचा अहवाल अद्यापपर्यंत उपलब्ध झाला नाही. परिणामी संबंधित अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही.

दरम्यान, पुलावरील रस्ता मोठ्या खड्ड्यांनी भरलेला असल्याने वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. वारंवार होणारे अपघात, उलटणारी वाहने आणि नागरिकांचा जीव धोक्यात घालणारी ही परिस्थिती असूनही सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र बेफिकीर आहे.

स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांच्या मते, सहाय्यक अभियंता अनिल जाधव यांनी या गंभीर समस्येकडे वारंवार दुर्लक्ष केले आहे. “ते अनेकदा कार्यालयात उपस्थित नसतात, शिरूरमध्ये निवासी राहत नाहीत तसेच नागरिकांचे फोनदेखील उचलत नाहीत,” असा आरोप निलेश वाळुंज यांनी केला आहे.याबाबत त्यांनी पुढे इशारा दिला की, “जर लवकरात लवकर कोंढण ओढा पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले नाही आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली नाही, तर मी पुन्हा एकदा उपोषणास बसणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे बाहेरचे गुंड आणून दहशत करत फोडले जेसीबी मशिन

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…

10 तास ago

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत ॲग्रीबिझनेस अभ्यासक्रम सुरु; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…

16 तास ago

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता

मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…

16 तास ago

शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…

16 तास ago

शिरूर शहरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…

17 तास ago

एसटीचा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…

2 दिवस ago