मुख्य बातम्या

कोंढण ओढा पुलावर धोका कायम; दुरुस्तीच्या प्रतीक्षेत शिरूर-पाबळ रस्ता

सार्वजनिक बांधकाम विभागाचा ढिसाळ कारभार, सामाजिक कार्यकर्त्यांचा संतप्त इशारा

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर ते कोंढणओढ्यापर्यंत शिरूर सार्वजनिक बांधकाम विभागाने मातीमिश्रित मुरूम टाकून फक्त तात्पुरती मलमपट्टी केली असून आस्थाव्यस्थ पसरलेल्या मुरमामुळे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.तसेच शिरूर–पाबळ रस्त्यावरील कोंढण ओढ्याच्या पूलावरील रस्ता गेल्या अनेक महिन्यांपासून धोकादायक स्थितीत असूनही संपुर्ण दुरुस्तीचे काम सुरू झालेले नाही. शिरूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत येणाऱ्या या पुलाच्या दुरुस्तीसाठी आजवर मुहूर्तही मिळालेला नाही, हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे करत आहे.

मुळात हा पूल प्रवाहाची दिशा बदलून चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आला असल्याची तक्रार सुरुवातीपासूनच करण्यात येत होती. या गंभीर अनियमिततेविरोधात सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी काही महिन्यांपूर्वी उपोषण करून आंदोलनाचा मार्ग अवलंबला होता. मात्र, त्यानंतर दक्षता गुणनियंत्रण समितीचा अहवाल अद्यापपर्यंत उपलब्ध झाला नाही. परिणामी संबंधित अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही.

दरम्यान, पुलावरील रस्ता मोठ्या खड्ड्यांनी भरलेला असल्याने वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. वारंवार होणारे अपघात, उलटणारी वाहने आणि नागरिकांचा जीव धोक्यात घालणारी ही परिस्थिती असूनही सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र बेफिकीर आहे.

स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांच्या मते, सहाय्यक अभियंता अनिल जाधव यांनी या गंभीर समस्येकडे वारंवार दुर्लक्ष केले आहे. “ते अनेकदा कार्यालयात उपस्थित नसतात, शिरूरमध्ये निवासी राहत नाहीत तसेच नागरिकांचे फोनदेखील उचलत नाहीत,” असा आरोप निलेश वाळुंज यांनी केला आहे.याबाबत त्यांनी पुढे इशारा दिला की, “जर लवकरात लवकर कोंढण ओढा पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले नाही आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली नाही, तर मी पुन्हा एकदा उपोषणास बसणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

दिवंगत अजितदादा पवारांना अभिवादन; विधानमंडळाची स्मृतीपत्रे सुनेत्रा अजित पवार यांच्या स्वाधीन.

बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…

4 तास ago

२०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य; ‘देवगिरी ते देवराई’ अभियानाचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…

4 तास ago

पिंपळे जगतापच्या पाषाण तलावात तरुणाचा मृतदेह; LCB सह विविध तपास पथके घटनास्थळी

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील पाषाण तलावात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून…

4 तास ago

‘ईशान सेतू’ने महाराष्ट्र-ईशान्य भारत जोडला; मणिपूरमध्ये सिद्धिविनायकाची प्रतिकृती उभारणार; एकनाथ शिंदे

ईशान्य भारतातील भाषांमध्ये रामायण, गीता, हनुमान चालीसाचे प्रकाशन; पवित्र ग्रंथांच्या मोफत वितरणाचा खर्च उचलण्याची शिंदेंची…

4 तास ago

मोदींनी सोनम वांगचुकांची भेट का घेतली नाही?; राम मंदिर चोरीवर भाजप-आरएसएसवर सपकाळांचा हल्लाबोल

मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केंद्र सरकार, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक…

4 तास ago

मोदींकडून बारामतीच्या नव्या रेल्वे स्थानकाचे लोकार्पण; पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला मिळाली नवी गती

बारामती : अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील ७५ आणि महाराष्ट्रातील बारामती व नांदुरा या दोन…

5 तास ago