मुख्य बातम्या

माजी खासदार शिवाजीराव आढळराव आणि बाप्पुसाहेब शिंदे यांच्यामुळे कारेगावकरांना मिळाले रोहीत्र

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व युवासेना जिल्हा प्रमुख बापुसाहेब शिंदे यांच्या माध्यमातून कारेगाव येथील यश ईन चौक परिसरात तात्काळ विद्युत रोहिञ उपलब्ध झाले असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्या सोनाली विकास नवले यांनी दिली.

अतिरिक्त भारामुळे येथील विद्युत ट्रान्सफार्मर काही दिवसांपुर्वी जळाला होता. सहा दिवस ऐन उकाड्यात नागरिकांना अंधारात काढावे लागले होते. काही स्थानिक नागरिकांनी लोकवर्गणी गोळा करुण विद्युत रोहिञ आणले माञ सदर रोहिञावर अतिरिक्त भार पडून येरे माझ्या मागल्या प्रमाणे पुन्हा अंधारात राहायची वेळ येऊ नये म्हणुन ग्रामपंचायत सदस्या सोनाली विकास नवले, प्रहारचे बापुसाहेब नवले, शरद नवले, दादासाहेब गवारे, भारतकुमार नवले, अविनाश नवले, बंटी नवले, प्रज्योत नवले, अभिजित गवारे, किरण गवारे आंदीनी सदर बाब बापुसाहेब शिंदे यांच्या कानावर घातली. या बाबीची दखल घेत बापुसाहेब शिंदे यांनी माजी खासदार आढळराव पाटील यांच्या माध्यमातून संबंधित अधिका-यांशी संर्पक साधुन फ्युजपेटी सह विद्युत रोहिञ उपलब्ध करुन दिले. या बाबत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याचा संदेश खोटा

मुंबई: मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याच्या माहितीत तथ्थ नाही. पाण्याच्या टाक्यांवर लोखंडी झाकणे बसवलेली…

3 तास ago

शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत मोठे प्रवेश; राष्ट्रवादीला धक्का

ठाणे: राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या भोवती वाढणारा जनाधार पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. “अपॉइंटमेंटशिवाय…

5 तास ago

लग्नाच्या आमिषाखाली फसवणूक? मुंबई महानगरपालिकेच्या सहायक आयुक्ताला अटक; प्रशासनात खळबळ

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या के-ईस्ट वॉर्डचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांना एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून…

6 तास ago

‘लोकल टू ग्लोबल’! खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा हार्वर्डमधील अभ्यास दौरा प्रेरणादायी

मुंबई: Dr. Shrikant Eknath Shinde यांनी अमेरिकेतील Harvard Kennedy School येथे आयोजित अभ्यासदौऱ्यात सहभागी होत…

6 तास ago

मेळघाटातील कुपोषणाचे भीषण वास्तव; वर्षभरात ९२ बालकांचा मृत्यू

अमरावती: राज्यातील प्रगत विकासाच्या दाव्यांना छेद देणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट…

8 तास ago

तुम्हीही रात्री मोबाईल उशीखाली घेऊन झोपता त्याचे होऊ शकतात गंभीर परिणाम

फोन आजकाल लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. फोन नसेल तर अनेकांची कामे रखडतात. सकाळी…

8 तास ago