मुख्य बातम्या

माजी खासदार शिवाजीराव आढळराव आणि बाप्पुसाहेब शिंदे यांच्यामुळे कारेगावकरांना मिळाले रोहीत्र

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व युवासेना जिल्हा प्रमुख बापुसाहेब शिंदे यांच्या माध्यमातून कारेगाव येथील यश ईन चौक परिसरात तात्काळ विद्युत रोहिञ उपलब्ध झाले असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्या सोनाली विकास नवले यांनी दिली.

अतिरिक्त भारामुळे येथील विद्युत ट्रान्सफार्मर काही दिवसांपुर्वी जळाला होता. सहा दिवस ऐन उकाड्यात नागरिकांना अंधारात काढावे लागले होते. काही स्थानिक नागरिकांनी लोकवर्गणी गोळा करुण विद्युत रोहिञ आणले माञ सदर रोहिञावर अतिरिक्त भार पडून येरे माझ्या मागल्या प्रमाणे पुन्हा अंधारात राहायची वेळ येऊ नये म्हणुन ग्रामपंचायत सदस्या सोनाली विकास नवले, प्रहारचे बापुसाहेब नवले, शरद नवले, दादासाहेब गवारे, भारतकुमार नवले, अविनाश नवले, बंटी नवले, प्रज्योत नवले, अभिजित गवारे, किरण गवारे आंदीनी सदर बाब बापुसाहेब शिंदे यांच्या कानावर घातली. या बाबीची दखल घेत बापुसाहेब शिंदे यांनी माजी खासदार आढळराव पाटील यांच्या माध्यमातून संबंधित अधिका-यांशी संर्पक साधुन फ्युजपेटी सह विद्युत रोहिञ उपलब्ध करुन दिले. या बाबत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पारोडीतील जिओ टॉवर रात्री बंद; संतप्त ग्रामस्थांचा टॉवरवर चढून आंदोलनाचा इशारा

शिक्रापूर (ओमकार भोरडे): पारोडी हद्दीतील एनएच-५४८ महामार्गालगत उभारण्यात आलेला जिओ कंपनीचा मोबाईल टॉवर वारंवार बंद…

30 मिनिटे ago

आठवडे बाजारातील चोऱ्यांना आळा घालण्यासाठी शिक्रापूर पोलिसांची विशेष मोहीम

नवनियुक्त पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची प्रत्यक्ष बाजारात भेट; साध्या वेशातील पथके तैनात होणार शिक्रापूर…

2 तास ago

महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका अध्यक्षपदी सागर रोकडे; उपाध्यक्षपदी सुनिल जिते यांची निवड

शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका कार्यकारिणीची बैठक नुकतीच शिरूर येथे उत्साहात…

3 तास ago

जास्त वेळ झोपल्याने शरीरावर काय होतो परिणाम

सामान्यपणे एक्सपर्ट दिवसातून ७-८ तास झोप घेण्याचा सल्ला देत असतात. कारण इतकी झोप शरीरासाठी गरजेची…

3 तास ago

रुद्राक्षाचं पाणी पिण्याचे फायदे

रुद्राक्षाला हिंदू धर्मात फार धार्मिक महत्व आहे. रुद्राक्षाला भगवान शिवाचा आशीर्वाद मानलं जातं. त्यामुळे जास्तीत…

3 तास ago

फडणवीसांना खोटे बोलण्यातील नोबेल पुरस्कार द्यावा; मोदी सरकारच्या दाव्यांवर सपकाळांचा हल्लाबोल

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खोटे बोलण्यात पटाईत असून त्यांना खोटे बोलण्यातील नोबेल पुरस्कारच दिला…

3 तास ago