suresh palande
न्हावरे (तेजस फडके): घोडगंगा साखर कारखान्यात विद्यमान अध्यक्ष आणि आमदार अशोक पवार यांनी 20 ते 25 वर्षात प्रचंड मोठया प्रमाणात भ्रष्टाचार करुन आपल्या नातेवाईकांना पुढे करुन खाजगी साखर कारखाना काढला आहे, असा आरोप अॅड सुरेश पलांडे यांनी आलेगाव पागा येथे केला.
घोडगंगा सहकारी कारखान्यानंतर चार वर्षांनी भीमाशंकर सहकारी साखर कारखाना सुरु झाला. सन 2018-19 साली घोडगंगा कारखान्याला एक पोत साखर तयार करण्यासाठी 1564 तर भिमाशंकर साखर कारखान्याला 706 रुपये खर्च आला. अडीच वर्षांपुर्वी विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर घोडगंगाला एक पोत साखर तयार करण्यासाठी 2240 तर भिमाशंकरला 757 खर्च आला. त्यामुळे आपल्या शेजारील कारखान्याच्या तुलनेत आपल्या कारखान्याला एका पोत्याला सुमारे 1500 रुपये खर्च जास्त कसा येतो? असा सवाल अॅड सुरेश पलांडे यांनी उपस्थित केला.
घोडगंगा साखर कारखान्यात विद्यमान अध्यक्ष आणि आमदार अशोक पवार यांनी 20 ते 25 वर्षात प्रचंड मोठया प्रमाणात भ्रष्टाचार करुन आपल्या नातेवाईकांना पुढे करुन खाजगी साखर कारखाना काढला असल्याचा आरोपही पलांडे यांनी केला.
दादापाटील फराटे म्हणाले, ‘आमदार अशोक पवार घोडगंगा साखर कारखान्याच्या विकासाबाबत बोलण्याऐवजी इतर मुद्यावर बोलतात. परंतु, सभासद शेतकऱ्यांच्या तरुण मुलांनी हि निवडणूक हातात घेतली आहे. आम्ही गेले अडीच वर्ष शेतकऱ्यांच्या हक्काचा कारखाना वाचावा म्हणून संघर्ष करत आहोत. त्यामुळे आमच्या घोडगंगा किसान क्रांती पॅनलला साथ द्या, असे आवाहन दादापाटील फराटे यांनी शेतकऱ्यांना केले.’
Video: आम्ही चर्चेला कधीही तयार, वेळ आणि ठिकाण तुम्हीचं सांगा: सुधीर फराटे
खाजगी कारखाना काढण्याच पाप अशोक पवारांनी केलं: दादा पाटील फराटे
मुंबई: मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याच्या माहितीत तथ्थ नाही. पाण्याच्या टाक्यांवर लोखंडी झाकणे बसवलेली…
ठाणे: राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या भोवती वाढणारा जनाधार पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. “अपॉइंटमेंटशिवाय…
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या के-ईस्ट वॉर्डचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांना एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून…
मुंबई: Dr. Shrikant Eknath Shinde यांनी अमेरिकेतील Harvard Kennedy School येथे आयोजित अभ्यासदौऱ्यात सहभागी होत…
अमरावती: राज्यातील प्रगत विकासाच्या दाव्यांना छेद देणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट…
फोन आजकाल लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. फोन नसेल तर अनेकांची कामे रखडतात. सकाळी…