suresh palande
न्हावरे (तेजस फडके): घोडगंगा साखर कारखान्यात विद्यमान अध्यक्ष आणि आमदार अशोक पवार यांनी 20 ते 25 वर्षात प्रचंड मोठया प्रमाणात भ्रष्टाचार करुन आपल्या नातेवाईकांना पुढे करुन खाजगी साखर कारखाना काढला आहे, असा आरोप अॅड सुरेश पलांडे यांनी आलेगाव पागा येथे केला.
घोडगंगा सहकारी कारखान्यानंतर चार वर्षांनी भीमाशंकर सहकारी साखर कारखाना सुरु झाला. सन 2018-19 साली घोडगंगा कारखान्याला एक पोत साखर तयार करण्यासाठी 1564 तर भिमाशंकर साखर कारखान्याला 706 रुपये खर्च आला. अडीच वर्षांपुर्वी विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर घोडगंगाला एक पोत साखर तयार करण्यासाठी 2240 तर भिमाशंकरला 757 खर्च आला. त्यामुळे आपल्या शेजारील कारखान्याच्या तुलनेत आपल्या कारखान्याला एका पोत्याला सुमारे 1500 रुपये खर्च जास्त कसा येतो? असा सवाल अॅड सुरेश पलांडे यांनी उपस्थित केला.
घोडगंगा साखर कारखान्यात विद्यमान अध्यक्ष आणि आमदार अशोक पवार यांनी 20 ते 25 वर्षात प्रचंड मोठया प्रमाणात भ्रष्टाचार करुन आपल्या नातेवाईकांना पुढे करुन खाजगी साखर कारखाना काढला असल्याचा आरोपही पलांडे यांनी केला.
दादापाटील फराटे म्हणाले, ‘आमदार अशोक पवार घोडगंगा साखर कारखान्याच्या विकासाबाबत बोलण्याऐवजी इतर मुद्यावर बोलतात. परंतु, सभासद शेतकऱ्यांच्या तरुण मुलांनी हि निवडणूक हातात घेतली आहे. आम्ही गेले अडीच वर्ष शेतकऱ्यांच्या हक्काचा कारखाना वाचावा म्हणून संघर्ष करत आहोत. त्यामुळे आमच्या घोडगंगा किसान क्रांती पॅनलला साथ द्या, असे आवाहन दादापाटील फराटे यांनी शेतकऱ्यांना केले.’
Video: आम्ही चर्चेला कधीही तयार, वेळ आणि ठिकाण तुम्हीचं सांगा: सुधीर फराटे
खाजगी कारखाना काढण्याच पाप अशोक पवारांनी केलं: दादा पाटील फराटे
शिंदोडी (तेजस फडके) शिंदोडी, ता. शिंदोडी येथील घोड धरणाच्या पात्रातुन शेतीच्या नावाखाली काळ्या मातीचा उपसा…
शिंदोडी (तेजस फडके) निमोणे (ता. शिरुर) येथे घोडनदीच्या पात्रातील पाण्याच्या बांधावरुन झालेल्या वादाचे रुपांतर थेट…
मुंबई: राज्यातील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डिजिटल तंत्रज्ञानाचे आधुनिक प्रशिक्षण देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग…
मुंबई: महाराष्ट्रात मान्सूनच्या प्रगतीला झालेल्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते जय पवार यांनी मुंबईतील प्रादेशिक…
शिवसेनेच्या हिरक महोत्सवी वर्धापन दिन सोहळ्यात शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल; विधान परिषदेत महायुती सर्व १७ जागा…
नाशिक: केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्ग रद्द करून तो नाशिक–शिर्डी–अहिल्यानगर मार्गे नेण्याची…