शिरूर तालुका

शिरूर तालुक्यात महिना संपला तरी रेशन धान्य वाटप नाही; भ्रष्टाचार…

मांडवगण फराटा (संपत कारकूड): महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारने गोर-गरिबांची दिवाळी गोड व्हावी म्हणून तातडीने घेतलेल्या निर्णयात आनंदाच्या शिध्यासह नियमित आणि मोफतचे रेशन सर्व रेशन दुकानदारांना वेळेत पाठवून देखील तालुक्यातील अनेक गावांतील गरीब नागरिकांना धान्य दुकानदारांकडून शंभर टक्के वाटपच झाले नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या सर्व प्रकारामध्ये अनेक भ्रष्टाचार झाल्याचा संशय नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.

कारोना काळात केंद्राकडून सुरु करण्यात आलेले ‘पीएमजेवाय’ मोफतचे धान्य तसेच कार्डधारकांचे नियमित होणारे वाटप आणि आनंदाचा शिधा असे तीन वेगवेगळे वाटप प्रत्येकाला होणे गरजेचे होते. मात्र, शिरूर तालुकयातील अनेक दुकानदारांनी आपले दुकान अद्याप मोकळे केले नसून, नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे देऊन माघारी पाठविण्याचे प्रकार घडलेले आहेत. भ्रष्टाचार रोखण्यासाठी तालुकयातील सर्व दुकानदारांना त्यांच्या ईपीएस प्रणालीमध्ये ऑक्टोबर महिन्याचा धान्य कोठा समाविष्ट केलेला ऑनलाईन दिसून येत आहे.

अनेक दुकानदारांनी महिना संपला तरी यातील अर्धा कोठा वाटपही पूर्ण केलेले नाही. आधारद्वारे वाटप होण्यासाठी पॉश मशीनवर अंगठे मॅच होणे आवश्यक असते. परंतु, ऐन दिवाळीच्या सणामध्ये काही गावात मशीनला प्रॉब्लेम सांगून नागरिकांना माघारी पाठविण्याचे प्रकार घडले आहेत. अनेक नागरिकांचे अंगठे अद्यापही घेतले गेले नाहीत. दुकानदारांनी मशीनचे कारण पुढे करून रेशनिंग वाटप न करता गरिबांची दिवाळी घालवली असून, नागरिक गावात एकमेकांना धान्य कधी वाटप होणार? असा प्रश्न विचारात आहेत. धान्य कधी येते, किती येते, केव्हा वाटप होते, आणि किती धान्य मिळणार? हे भोळ्या-भाबड्या नागरिकांना थांगपत्ता अनेक दुकानंदार लागू देते नाहीत. या महिन्यातील धान्य वाटपात मोठा घोटाळा व त्रुटी असल्यामुळे अधिकारी पुरवठा विभाग फक्त भग्याची भूमिका घेत आहे काय? असा संतप्त सवाल जनता करीत आहे.

शिरूर तालुका डॉट च्या पत्रकाराचा फोन घेत नाही…
दरम्यान, शिरूर येथील निवासी नायब तहसीलदार गिरीगोसावी यांच्याकडे रेशन वाटपाबाबत चौकशी केली असता, असा प्रकार होत असेल तर त्याची आम्ही माहिती घेऊ व चौकशी करू असे सांगितले. मात्र, पुरवठा विभागातीलच एका जबाबदार कर्मचाऱ्याला या प्रकारबाबत विचारणा केली असता दोन वर्षांपूर्वी वस्तुस्थितीबाबत दिलेल्या बातमीचा राग मनात धरून शिरूर तालुका डॉट च्या पत्रकाराचा फोन घेत नसल्याचे सांगितले. या प्रकाराबाबत पुरवठा विभाग आढी ठेऊन काम करीत आहे काय? असा सवाल यानिमित्त निर्माण झाला आहे.
(क्रमश:)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संसदेत चर्चा नाही, पण मंत्र्यांच्या दालनात महाराष्ट्राचे प्रश्न! तटकरे मैदानात; ४३८ कोटींच्या निधीसह कोकणासाठी मोठ्या मागण्या

मुंबई-गोवा महामार्गाच्या टोलनाक्यांपासून जलजीवन मिशनच्या ४३८ कोटींपर्यंत मुद्दे केंद्रीय मंत्र्यांकडे मांडले मुंबई: लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात…

4 तास ago

शिक्रापूर येथील सलूनमध्ये काम केलेल्या युवकाच्या कारस्थानाचा पर्दाफाश…

पुणे : हवाई दलाच्या एका मृत जवानाच्या नावाने बनावट ओळखपत्र बनवून सैन्याचा अधिकृत गणवेश मिळवण्याच्या…

7 तास ago

संसदेत पुढील आठवडा ठरणार निर्णायक

सीमांकन, महिला आरक्षण आणि FCRA विधेयकांवरून सरकार-विरोधक आमनेसामने नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा तिसरा…

9 तास ago

जळगावात शाळकरी विद्यार्थ्यावर चॉपरने हल्ला; जुन्या वादातून दहावीतील विद्यार्थ्याला गंभीर दुखापत

जळगाव : शहरातील अयोध्या नगर परिसरात शाळकरी विद्यार्थ्यांमधील जुन्या वादाला हिंसक वळण मिळाल्याची धक्कादायक घटना…

9 तास ago

परदेशात नोकरीचं आमिष; पोर्तुगालमध्ये महिलेला शरीरविक्रीसाठी दबाव? पुण्यात आंतरराष्ट्रीय रॅकेटचा गंभीर आरोप

पुणे : नोकरीच्या शोधात परदेशात जाणाऱ्या महिलांना चांगला पगार आणि उज्ज्वल भविष्याचं आमिष दाखवून त्यांची…

9 तास ago

व्यावसायिकावर गोळीबार करणारे उज्जैन येथून जेरबंद…

शिरूर: शिरसवडी (ता. हवेली) येथे जमीन व्यावसायिक संतोष गावडे यांची गाडी तिघांनी आपली गाडी बंद…

10 तास ago